शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा मिळाला, सुविधा कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 12:06 IST

रेल्वे अर्थसंकल्पात चार वर्षांपूर्वी अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन अजनी रेल्वेस्थानकाचे नाव भारतीय रेल्वेच्या नकाशात समाविष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देस्टेशनला नव्या गाड्यांची प्रतीक्षा रेल्वे प्रशासनाची उदासीनता

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात चार वर्षांपूर्वी अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन अजनी रेल्वेस्थानकाचे नाव भारतीय रेल्वेच्या नकाशात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर अजनी रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा पालटण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली. परंतु केवळ सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन रेल्वे प्रशासन गप्प बसले आहे. प्रत्यक्षात अजनीवरून एकच रेल्वेगाडी सोडण्यात येत असून अजनी रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी ४० ते ४५ हजार प्रवाशांची वर्दळ असते. इतक्या मोठ्या प्रमाणावर नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे येथे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. यात अजनी रेल्वेस्थानकावर आणखी दोन प्लॅटफार्म वाढविण्याची रेल्वे प्रशासनाची योजना होती. अजनी रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मची संख्या वाढली असती तर येथून नव्या गाड्या सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु सॅटेलाईट टर्मिनलच्या घोषणेनंतर एकही नवा प्लॅटफार्म तयार करण्यात आला नाही. यामुळे सद्यस्थितीत अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस वगळता एकही गाडी अजनीवरून सोडण्यात येत नसल्याची स्थिती आहे. दक्षिण नागपुरातील नागरिकांना अजनी रेल्वेस्थानक सोयीचे आहे. त्यामुळे अजनीचा सॅटेलाईट टर्मिनलच्या रुपाने विकास केल्यास नागपूर रेल्वेस्थानकाचा भार हलका होऊन प्रवाशांनाही सोयीचे होणार असून अजनी रेल्वेस्थानकाचा विकास करण्याची मागणी होत आहे.

गाड्यांना थांबे देण्याची गरजअजनी रेल्वेस्थानकावर फक्त १४ रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आला आहे. इतर गाड्या थेट नागपूर रेल्वेस्थानकावर थांबतात. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दीचे चित्र अनुभवावयास मिळते. याशिवाय पार्किंगसाठीही नागपूर स्थानकावर जागा अपुरी आहे. अजनीला रेल्वेगाड्यांचा थांबा दिल्यास नागपूर रेल्वेस्थानकावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

एस्क्लेटरअभावी गैरसोयनागपूर रेल्वेस्थानकावर सर्वच प्लॅटफार्मवर एस्क्लेटर (स्वयंचलित पायऱ्या) लावण्यात येत आहेत. परंतु सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन अजनी रेल्वेस्थानकावर एकही एस्क्लेटर बसविण्यात आले नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना उंच असलेल्या फूट ओव्हरब्रीजवरून सामान घेऊन एका प्लॅटफार्मवरून दुसºया प्लॅटफार्मवर जावे लागत आहे. यात ज्येष्ठ प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे.

कशा मिळतील नव्या गाड्या ?सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा दिल्यानंतर अजनी रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मची संख्या वाढविण्याची गरज होती. प्लॅटफार्मची संख्या वाढली असती तर रेल्वे अर्थसंकल्पात अजनी रेल्वेस्थानकावरून गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असता. परंतु पुरेसे प्लॅटफार्मच नसल्यामुळे केवळ एकच गाडी अजनी स्थानकावरून सोडण्यात येत असून अजनीला नव्या गाड्या मिळण्याची अपेक्षा भंग झाली आहे.

अजनीचा विकास महत्त्वाचा‘नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून येथे पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. अजनीचा सॅटेलाईट टर्मिनलच्या रुपाने विकास झाल्यास नागपूर रेल्वेस्थानकावरील भार कमी होऊन प्रवाशांनाही सुविधा मिळतील. त्यामुळे अजनी रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.’-प्रवीण डबली, माजी सदस्य, प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती, दपूम रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वे