शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

अजनी रेल्वे पुलावर रोज होतो अनेकांच्या जीविताशी खेळ; वाहतुकीची कोंडी, ॲम्ब्युलन्स अडकून पडतात

By नरेश डोंगरे | Updated: October 17, 2022 20:54 IST

अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात.

नागपूर :

अजनी रेल्वे पुलावर वाहतुकीच्या कोंडीमुळे रोज अनेकांच्या जीविताशी खेळ होत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्ण घेऊन मेडिकलकडे येणाऱ्या अनेक रुग्णवाहिका येथे रोज अडकून पडतात. अत्यंत गंभीर असा हा प्रकार अनेकांसाठी प्रचंड मनस्तापाचा विषय ठरला आहे. मात्र, हा सर्व प्रकार लक्षात येऊनही त्याकडे संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

अजनीचा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोक्याचा आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहने जाऊ नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरावर लोखंडी पोल रोवण्यात आले. कार, जीप व अशीच लाईट वेट वाहने त्या पोलमधून जातील, अशी ही व्यवस्था आहे. मात्र, या व्यवस्थेने रोज हजारो नागरिकांचा त्रास वाढवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला शाळा, महाविद्यालय आहे. एका बाजूला रेल्वेस्थानक तसेच अनेक सरकारी आणि खासगी कार्यालये तर दुसऱ्या बाजूला मेडिकल आणि विविध कार्यालये आहेत. त्यामुळे रोज सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५.३० वाजतापासून वाहनचालकांची प्रचंड वर्दळ असते. सकाळी ही वर्दळ लवकर संपत असली तरी सायंकाळी मात्र रात्री ९ ते १० वाजेपर्यंत पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहने मुंगीच्या गतीने सरकतात. त्यामुळे महत्त्वाचे काम करण्यासाठी निघालेल्यांना या कोंडीत अडकून पडल्यामुळे प्रचंड त्रास होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार रोजचाच झाला आहे.

पोलिसांच्या नियंत्रणाबाहेरची स्थितीविशेष म्हणजे, मेडिकलमध्ये दूरदूरवरून अनेक अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णांना घेऊन दिवसभरात शंभरावर रुग्णवाहिका येतात. सायंकाळी अनेक रुग्णवाहिका वाहनांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी येथे ट्रॅफिक पोलीस असतात. मात्र, टी-पॉईंट असलेल्या या पुलावर वाहनांची संख्या एवढी मोठी असते की स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हा प्रकार फारच वेदनादायी ठरला आहे.

मोठा धोका होण्याची भीतीजड वाहनांच्या वजनामुळे पुलावर धोका होण्याची भीती असल्याने महापालिकेने येथे ही उपाययोजना केली असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. मात्र, अनेक छोट्या-मोठ्या, कार, जीप, दुचाकी आणि अशीच काही वाहने एकाच वेळी या पुलावर जमा होऊन रेंगाळत असल्याने त्यांच्या वजनाने या पुलावर एखाद वेळी मोठा धोका होऊ शकतो. संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात हा धोका वारंवार येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दुर्घटना घडल्यावरच संबंधित प्रशासन याबाबत उपाययोजना करेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूर