शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 22:20 IST

Nagpur News वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींच्या या प्रकल्पावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देराज्यात होणाऱ्या २२ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी नेत्यांमध्येच समन्वयाचा अभावभुजबळांचा नाशिकवर तर फडणवीस-गडकरींचा नागपूरवर भर, सामंत यांनी तर घोषणाही केली होती

 

कमल शर्मा

नागपूर : वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान २२ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणत्या शहरात यावा, यावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकल्प आपापल्या शहरात व्हावा यावर नेत्यांकडून अधिक भर दिला जात असल्यानेच एअरबस प्रकल्पाने महाराष्ट्राला टाटा केल्याचे सर्वात मोठे कारण ठरल्याचे मानले जात आहे.

या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय वायुसेना व टाटा समूहाला घ्यायचा होता; परंतु आता महाराष्ट्रात नागपूर व नाशिकमध्ये संघर्ष व गुजरातमध्ये वडोदरासाठी एकमत होणे या प्रकल्पासाठी निर्णायक बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणूक करण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’कडे भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत आहे. या पत्रात त्यांनी राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री या नात्याने टाटा एअरबसचा प्रकल्प नाशिकमध्ये सर्वाधिक उपयुक्त स्थान असल्याचे म्हटले होते. येथे अगोदरच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चा प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत, असेही सांगितले होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हा प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी तर मागच्या महिन्यातच टाटा एयअरबससंदर्भात दिल्लीत जाऊन चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून टाटा समूहाला मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. त्यांनी यात एअरबसचा उल्लेख केला नव्हता; परंतु टाटाच्या सर्व कंपन्यांचा उल्लेख मात्र केला हाता. याचदरम्यान एकनाथ शिंदे गटाचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर हा प्रकल्प मिहानमध्ये येत असल्याचे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते. आता नेत्यांचा असा तर्क आहे की, आपापल्या क्षेत्राची चिंता करणे यात काहीही चुकीचे नाही.

तर विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसाय विकसित झाला असता

वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. एअरबस प्रकल्प नागपुरात आला असता तर त्याला प्रोत्साहन मिळाले असते. विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसायही विकसित झाला असता. आता विदर्भात कुठल्याही परिस्थितीत रिफायनरीसह पेट्रोकेमिकल प्रकल्प यायला हवा.

एअरबस प्रकल्पावर एक दृष्टिक्षेप

- वायुसेनेसाठी टाटा एअरबस सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करणे

- वायुसेनेसाठी विमान बनवणारा पहिला खासगी प्रकल्प

- नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली होती.

- आता गुजरातच्या वडोदरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑक्टोबर रोजी याचे भूमिपूजन करतील.

- सी-२९५ विमानाची क्षमता ५ ते १० टन आहे.

-३००० नोकऱ्या निर्माण होणार, ६०० तज्ज्ञांचा सहभाग

टॅग्स :Tataटाटा