शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 22:20 IST

Nagpur News वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींच्या या प्रकल्पावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देराज्यात होणाऱ्या २२ हजार कोटींच्या प्रकल्पासाठी नेत्यांमध्येच समन्वयाचा अभावभुजबळांचा नाशिकवर तर फडणवीस-गडकरींचा नागपूरवर भर, सामंत यांनी तर घोषणाही केली होती

 

कमल शर्मा

नागपूर : वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. दरम्यान २२ हजार कोटींचा हा प्रकल्प कोणत्या शहरात यावा, यावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकल्प आपापल्या शहरात व्हावा यावर नेत्यांकडून अधिक भर दिला जात असल्यानेच एअरबस प्रकल्पाने महाराष्ट्राला टाटा केल्याचे सर्वात मोठे कारण ठरल्याचे मानले जात आहे.

या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय वायुसेना व टाटा समूहाला घ्यायचा होता; परंतु आता महाराष्ट्रात नागपूर व नाशिकमध्ये संघर्ष व गुजरातमध्ये वडोदरासाठी एकमत होणे या प्रकल्पासाठी निर्णायक बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणूक करण्याची विनंती केली होती. ‘लोकमत’कडे भुजबळ यांनी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी टाटा समूहाचे तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत आहे. या पत्रात त्यांनी राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री या नात्याने टाटा एअरबसचा प्रकल्प नाशिकमध्ये सर्वाधिक उपयुक्त स्थान असल्याचे म्हटले होते. येथे अगोदरच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चा प्रकल्प आहे. पायाभूत सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत, असेही सांगितले होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे हा प्रकल्प नागपुरात आणण्यास उत्सुक होते. फडणवीस यांनी तर मागच्या महिन्यातच टाटा एयअरबससंदर्भात दिल्लीत जाऊन चर्चाही केली होती. नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून टाटा समूहाला मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. त्यांनी यात एअरबसचा उल्लेख केला नव्हता; परंतु टाटाच्या सर्व कंपन्यांचा उल्लेख मात्र केला हाता. याचदरम्यान एकनाथ शिंदे गटाचे नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तर हा प्रकल्प मिहानमध्ये येत असल्याचे सप्टेंबरमध्येच जाहीर केले होते. आता नेत्यांचा असा तर्क आहे की, आपापल्या क्षेत्राची चिंता करणे यात काहीही चुकीचे नाही.

तर विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसाय विकसित झाला असता

वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले की, मिहानमध्ये संरक्षण उपकरणाच्या काही कंपन्या आहेत. एअरबस प्रकल्प नागपुरात आला असता तर त्याला प्रोत्साहन मिळाले असते. विदर्भात संरक्षणाशी संबंधित व्यवसायही विकसित झाला असता. आता विदर्भात कुठल्याही परिस्थितीत रिफायनरीसह पेट्रोकेमिकल प्रकल्प यायला हवा.

एअरबस प्रकल्पावर एक दृष्टिक्षेप

- वायुसेनेसाठी टाटा एअरबस सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करणे

- वायुसेनेसाठी विमान बनवणारा पहिला खासगी प्रकल्प

- नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली होती.

- आता गुजरातच्या वडोदरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० ऑक्टोबर रोजी याचे भूमिपूजन करतील.

- सी-२९५ विमानाची क्षमता ५ ते १० टन आहे.

-३००० नोकऱ्या निर्माण होणार, ६०० तज्ज्ञांचा सहभाग

टॅग्स :Tataटाटा