शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

चंद्रपूर वीज केंद्रातील वायू प्रदुषणाचा विळखा नागपूर, नांदेड, रायपूरच्याही पलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 08:00 IST

Nagpur News चंद्रपुरातील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाचा विळखा केवळ चंद्रपूरपर्यंतच मर्यादित राहिला नसून, नागपुरातील नागरिकांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे६ ठिकाणी २८० आकस्मिक मृत्यूआजारी रजा ६५ हजारांवरमध्य भारतात सर्वाधिक परिणाम

 

गोपालकृष्ण मांडवकर

नागपूर : चंद्रपुरातील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणाचा विळखा केवळ चंद्रपूरपर्यंतच मर्यादित राहिला नसून, नागपुरातील नागरिकांच्याही आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. २०२०-२१ या वर्षात येथील प्रदूषणामुळे चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, मुंबई, तसेच पुणे आणि नांदेडमध्ये २८० अकाली मृत्यू झाले, तर नागपूर व चंद्रपूरमध्ये आजारी रजेचे ६५ हजार दिवस नोंदविण्यात आले आहेत. या प्रदूषणाचे प्रभावक्षेत्र चंद्रपूर, नागपूरसह रायपूरपर्यंत असल्याची बाब ‘द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सीआरईए)च्या अहवालातून पुढे आली आहे.

सीआरईएने २०२०-२१ मधील सीटीपीएसच्या परिस्थितीचे अवलोकन केले. ‘कोळशावर आधारित चंद्रपुरातील ऊर्जा प्रकल्पाचे आरोग्यावरील परिणाम’ या अहवालातून यावर प्रकाश टाकला आहे. दगडी कोळशावर चालणारा हा प्रकल्प नागपूरपासून १५० किमी अंतरावर आहे. २,९२० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पातील संचांमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असून, चंद्रपूर आणि नागपूर येथील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे यात म्हटले आहे.

अकाली मृत्यू वाढले

या अहवालानुसार, सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे २०२०-२१ मध्ये मध्य भारतातील अनेक शहरांमध्ये अकाली मृत्यू झाल्याची नोंद आहे. चंद्रपूरमध्ये ८५, नागपूरमध्ये ६२, यवतमाळमध्ये ४५, मुंबईमध्ये ३०, तसेच पुणे आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २९ असे २८० अकाली मृत्यू झाल्याचे यात म्हटले आहे.

हवेची गुणवत्ता आणि नियमांचे स्पष्ट उल्लंघन

सीआरईएने केलेला हा अभ्यास नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या पार्श्वभूमीवर केला आहे. यानुसार, सीटीपीएसने जानेवारी-२०२२ पूर्वीपर्यंत हवेच्या गुणवत्तेचे आणि इतर नियमांचे स्पष्ट उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. या केंद्रामुळे आरोग्याच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे निर्देश नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने सीटीपीएसला दिले होते, मात्र त्याचे पालन झाले नाही.

आजारी रजेचे दिवस वाढले

या प्रकल्पातून होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या श्वसनाच्या आजारावर परिणाम झाला. यामुळे आजारी रजेचे दिवस वाढल्याची नोंद अहवालात आहे. २०२०-२१ या वर्षात कर्मचाऱ्यांचे चंद्रपूरमध्ये ३४ हजार आणि नागपुरात ३० हजार आजारी रजेचे दिवस नोंदविले आहेत.

 

सीटीपीएसमधील वायू प्रदूषणाचा परिणाम श्वसनावर झाल्याने आजारांचे प्रमाण वाढलेले आढळले. आजारी रजेचे प्रमाण वाढले, यावरून लोकांची उत्पादकता कशी घटत आहे, हे दिसते.

- सुनील दहिया, अहवाल अभ्यासक, मुंबई

या प्रकल्पाच्या वायू प्रदूषणाचा परिणाम फक्त आसपासच्या लोकांवरच नसून, दूरपर्यंत आहे. हवेच्या दिशेसोबत दक्षिण-उत्तर आणि उत्तर-दक्षिण असे प्रदूषण पसरल्याने मोठ्यांसह वृद्ध, मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम आहे.

- सुरेश चोपणे, अहवाल अभ्यासक, चंद्रपूर

टॅग्स :pollutionप्रदूषण