शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:24 IST

एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.हजच्या उड्डाणासाठी एअर इंडियाने विमानाला नागपूर-मुंबई आणि विशाखापट्टणम-मुंबई एकत्रित करून चालविले. याच कारणामुळे नागपुरातून परतीनंतर विमानाच्या क्रमांकात बदल केला नाही. एआय६२९ दररोज नागपुरातून मुंबईला परत जाताना ६३० क्रमांकाने उड्डाण भरते. सोमवारी हेच विमान मुंबईहून विशाखापट्टणम मार्गे नागपुरात आले होते.एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, हज उड्डाणासाठी विमानाच्या व्यवस्थेत सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांसाठी बदल केला आहे. एअर इंडियाचे सकाळचे मुंबई-नागपूर-मुंबई उड्डाण १ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत आठवड्यात तीन दिवस बंद राहील आणि चार दिवस सुरू राहील. या कालावधीत एआय६२७ मुंबई-नागपूर व एआय ६२८ नागपूर-मुंबई विमान आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला उपलब्ध राहील. आठवड्यात अन्य दिवसात ही उड्डाणे रद्द राहतील. हज उड्डाणांसाठी काही शेड्यूल विमानांचे संचालन अस्थायीरीत्या बंद करण्यात आले आहे. देशात हजकरिता महत्त्वपूर्ण एम्बॉर्केशन पाईंटवरून एक वा दोन उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. याच कारणामुळे एअर इंडियाने वेळापत्रकात बदल केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबई