शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:24 IST

एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले.हजच्या उड्डाणासाठी एअर इंडियाने विमानाला नागपूर-मुंबई आणि विशाखापट्टणम-मुंबई एकत्रित करून चालविले. याच कारणामुळे नागपुरातून परतीनंतर विमानाच्या क्रमांकात बदल केला नाही. एआय६२९ दररोज नागपुरातून मुंबईला परत जाताना ६३० क्रमांकाने उड्डाण भरते. सोमवारी हेच विमान मुंबईहून विशाखापट्टणम मार्गे नागपुरात आले होते.एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, हज उड्डाणासाठी विमानाच्या व्यवस्थेत सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांसाठी बदल केला आहे. एअर इंडियाचे सकाळचे मुंबई-नागपूर-मुंबई उड्डाण १ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत आठवड्यात तीन दिवस बंद राहील आणि चार दिवस सुरू राहील. या कालावधीत एआय६२७ मुंबई-नागपूर व एआय ६२८ नागपूर-मुंबई विमान आठवड्यात सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला उपलब्ध राहील. आठवड्यात अन्य दिवसात ही उड्डाणे रद्द राहतील. हज उड्डाणांसाठी काही शेड्यूल विमानांचे संचालन अस्थायीरीत्या बंद करण्यात आले आहे. देशात हजकरिता महत्त्वपूर्ण एम्बॉर्केशन पाईंटवरून एक वा दोन उड्डाणांमध्ये वाढ झाली आहे. याच कारणामुळे एअर इंडियाने वेळापत्रकात बदल केला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबई