शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वातानुकुलित खोलीत तयार होणाऱ्या योजना वास्तवात उतरत नाहीत : अनसूया उईके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 20:12 IST

आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत. महिला आयोगावर माझी नेमणूक झाली तेव्हा वास्तवाची जाण नसलेले लोक योजना तयार करत असत, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील, असा सवाल उपस्थित करतानाच छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी योजनाकारांनी ग्रासरुटवर जाऊन, वास्तवाची जाणीव करवून घेऊन योजना साकाराव्या असे आवाहन केले.

रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सहकार भारतीच्या द्वितीय महिला अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल उईके बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या कुलपती शशी वंजारी, स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, सहकार भारतीच्या शताब्दी पांडे, रमेश वैद्य, उदय जोशी, संध्या कुळकर्णी, नीलिमा बावणे उपस्थित होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिला मेढे व सहकार भरतीच्या विजया भुसारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.वर्षानुवर्षे महिलांसाठीच्या योजना या एकसारख्याच बनत असत. महिलांना मदत म्हणून कुठवर शिलाई मशीनचेच वाटप करणार? याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना, या विचारप्रक्रियेत बदल घडविण्याचे आवाहन केले असता, त्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आणि महिला जशा विचार करतात तशा योजना त्यांच्यासाठी अमलात आणण्याची सूचना आयोगाला केल्याचे उईके यांनी यावेळी सांगितले. त्यातूनच ‘आदिवासी सशक्त योजना’ सारखे उपक्रम सादर झाले आणि परिवर्तन घडायला लागले. सहकार भारतीने आदिवासी भागातही पोहोचावे आणि बस्तरसारख्या भागातील आदिवासी महिलांना या कामात जोडून घ्यावे. सहकार भारती ही संस्था भारतीय संस्कृतीची मूळभाषा बोलते. ते वास्तवातही उतरवण्याची किमया साधण्याचे आवाहन राज्यपाल अनसूया उईके यांनी यावेळी केले. संचालन रेवती शेंदुर्णीकर यांनी केले तर आभार नीलिमा बावणे यांनी मानले.

महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याची गरज - शांताक्कामहिलांचे सक्षमीकरण करताना त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी समाजात काम करण्याची गरज आहे. त्यांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार भारतीने काम करण्याची गरज आहे. स्त्री ही शक्तिस्वरुपा आहे आणि ती समाजात परिवर्तन घडवू शकते म्हणून महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याचे आवाहन शांताक्का यांनी यावेळी केले.राज्यपालांनी घेतले स्मारकाचे दर्शनउद्घाटनापूर्वी राज्यपाल अनसूया उईके यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. सहकार भारतीचे हे आयोजन महिलांना सशक्त आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे उईके यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर