शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

वातानुकुलित खोलीत तयार होणाऱ्या योजना वास्तवात उतरत नाहीत : अनसूया उईके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 20:12 IST

आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी भागातील लोक, तेथील महिला कशा जगतात, सर्वसामान्य महिलांच्या चेतना काय असतात, याचा विचार न करता थेट दिल्लीमध्ये वातानुकूलित खोलीत बसून योजना तयार झाल्या की त्या वास्तवात उतरत नाहीत. महिला आयोगावर माझी नेमणूक झाली तेव्हा वास्तवाची जाण नसलेले लोक योजना तयार करत असत, त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील, असा सवाल उपस्थित करतानाच छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके यांनी योजनाकारांनी ग्रासरुटवर जाऊन, वास्तवाची जाणीव करवून घेऊन योजना साकाराव्या असे आवाहन केले.

रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात सहकार भारतीच्या द्वितीय महिला अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल उईके बोलत होत्या. व्यासपीठावर राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, मुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयाच्या कुलपती शशी वंजारी, स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, सहकार भारतीच्या शताब्दी पांडे, रमेश वैद्य, उदय जोशी, संध्या कुळकर्णी, नीलिमा बावणे उपस्थित होते. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिला मेढे व सहकार भरतीच्या विजया भुसारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.वर्षानुवर्षे महिलांसाठीच्या योजना या एकसारख्याच बनत असत. महिलांना मदत म्हणून कुठवर शिलाई मशीनचेच वाटप करणार? याबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना, या विचारप्रक्रियेत बदल घडविण्याचे आवाहन केले असता, त्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आणि महिला जशा विचार करतात तशा योजना त्यांच्यासाठी अमलात आणण्याची सूचना आयोगाला केल्याचे उईके यांनी यावेळी सांगितले. त्यातूनच ‘आदिवासी सशक्त योजना’ सारखे उपक्रम सादर झाले आणि परिवर्तन घडायला लागले. सहकार भारतीने आदिवासी भागातही पोहोचावे आणि बस्तरसारख्या भागातील आदिवासी महिलांना या कामात जोडून घ्यावे. सहकार भारती ही संस्था भारतीय संस्कृतीची मूळभाषा बोलते. ते वास्तवातही उतरवण्याची किमया साधण्याचे आवाहन राज्यपाल अनसूया उईके यांनी यावेळी केले. संचालन रेवती शेंदुर्णीकर यांनी केले तर आभार नीलिमा बावणे यांनी मानले.

महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याची गरज - शांताक्कामहिलांचे सक्षमीकरण करताना त्यांचे आर्थिक हित साधण्यासाठी समाजात काम करण्याची गरज आहे. त्यांची व्याप्ती वाढविणे आवश्यक असून, ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार भारतीने काम करण्याची गरज आहे. स्त्री ही शक्तिस्वरुपा आहे आणि ती समाजात परिवर्तन घडवू शकते म्हणून महिलांनी शक्तिस्वरूपा बनण्याचे आवाहन शांताक्का यांनी यावेळी केले.राज्यपालांनी घेतले स्मारकाचे दर्शनउद्घाटनापूर्वी राज्यपाल अनसूया उईके यांनी हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. सहकार भारतीचे हे आयोजन महिलांना सशक्त आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे उईके यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर