शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कृषीमंत्र्यांनी मोसंबी उत्पादकांना न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 10:56 IST

संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवंगत पांडुरंगजी फुंडकर यांच्या नंतर राज्यात जवळपास दोन-अडीच वर्ष स्वतंत्र कृषी मंत्री नव्हते. आता विदर्भातील भाजपाचे नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रिपद दिले आहे. ते स्वत: संत्रा व मोसंबीचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या सर्व समस्या माहिती आहते. यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.मागील साडेचार-पाच वर्षापासून संत्रा व मोसंबी उत्पादक मेटाकुटीस आला आहे. नोटाबंदीच्या काळात तर उत्पादन होऊन संत्र्याला मातीमोल भाव मिळाला होता. वाहतुकीचा सुध्दा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी संत्रा व मोसंबी रस्त्यावर फेकली होती. दुष्काळामुळे यावर्षी संत्रा व मोसंबीचे उत्पादनच झाले नाही. राज्य सरकारच्या वतीने बहुवार्षिक पिकांना मदत जाहीर करण्यात आली. कृषी मंत्री बोंडे यांच्या वरुड व मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानाची मदत मिळाली. परंतु या मदतीपासून नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. आता तर पाण्याअभावी संत्रा व मोसंबीची झाडे मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. परंतु याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत.२०१२ मध्ये मराठवाड्यातील जालना जिल्हात दुष्काळ पडला असता तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी संत्राबागा वाचविण्यासाठी प्रति हेक्टर ३० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत ६० हजार रुपयाची मदत दिली होती. अशीच मदत भाजपा सरकार करेल अशी अपेक्षा होती. परंतु याकडे सुध्दा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांचा मतदारसंघ संत्रा व मोसंबीसाठी प्रसिध्द आहे. बोंडे यांनीच यापूर्वी संत्रा, मोसंबीसाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे आता ते न्याय देतील, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :agricultureशेतीAnil Deshmukhअनिल देशमुख