शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कृषीमंत्र्यांनी मोसंबी उत्पादकांना न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 10:56 IST

संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवंगत पांडुरंगजी फुंडकर यांच्या नंतर राज्यात जवळपास दोन-अडीच वर्ष स्वतंत्र कृषी मंत्री नव्हते. आता विदर्भातील भाजपाचे नेते डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रिपद दिले आहे. ते स्वत: संत्रा व मोसंबीचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या सर्व समस्या माहिती आहते. यामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांना डॉ. बोंडे यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.मागील साडेचार-पाच वर्षापासून संत्रा व मोसंबी उत्पादक मेटाकुटीस आला आहे. नोटाबंदीच्या काळात तर उत्पादन होऊन संत्र्याला मातीमोल भाव मिळाला होता. वाहतुकीचा सुध्दा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी संत्रा व मोसंबी रस्त्यावर फेकली होती. दुष्काळामुळे यावर्षी संत्रा व मोसंबीचे उत्पादनच झाले नाही. राज्य सरकारच्या वतीने बहुवार्षिक पिकांना मदत जाहीर करण्यात आली. कृषी मंत्री बोंडे यांच्या वरुड व मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानाची मदत मिळाली. परंतु या मदतीपासून नागपूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. आता तर पाण्याअभावी संत्रा व मोसंबीची झाडे मोठ्या प्रमाणात वाळली आहेत. परंतु याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश अद्यापही देण्यात आलेले नाहीत.२०१२ मध्ये मराठवाड्यातील जालना जिल्हात दुष्काळ पडला असता तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी संत्राबागा वाचविण्यासाठी प्रति हेक्टर ३० हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत ६० हजार रुपयाची मदत दिली होती. अशीच मदत भाजपा सरकार करेल अशी अपेक्षा होती. परंतु याकडे सुध्दा केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांचा मतदारसंघ संत्रा व मोसंबीसाठी प्रसिध्द आहे. बोंडे यांनीच यापूर्वी संत्रा, मोसंबीसाठी आवाज उठविला आहे. त्यामुळे आता ते न्याय देतील, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :agricultureशेतीAnil Deshmukhअनिल देशमुख