शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नागपुरात शेतकऱ्यांचा कृषिमाल थेट ग्राहकांसाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:02 IST

शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे ब्लॅक राईस, पार्वती सूत तांदळाला ग्राहकांची पसंतीफळे, भाजीपाला व विविध कृषिमाल उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.कृषी विद्यापीठ परिसरात शनिवारपासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू झाला असून, या ठिकाणी शेतमाल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा महोत्सव बुधवार १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, उद्घाटनाच्या दिवशी नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद देत कृषिमालाची खरेदी केली. भरपूर पोषणतत्त्व आणि राज्यात प्रथमच पिकविण्यात आलेल्या ब्लॅक राईसला ग्राहकांनी प्रथम पसंती दिली आहे.या ठिकाणी कृषी उत्पादित मालासोबतच गृहोद्योग आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषीउत्पादनावर प्रक्रिया करून विविध प्रकारची चटणी, लोणचे, फळांचे मुरब्बे, पापड, कुरडया, फळे, भाजीपाला, मध, पपई, विविध वाणांचा तांदूळ, गहू, हरभरा, बटाटे, संत्री, मोसंबी यासह अनेकविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचे २०० वर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, कृषी पणन, फुलशेती, खादी ग्रामोद्योग, कापूस संशोधन केंद्र, महाबीज आदी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे कृषीशी निगडित विभागांचेही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत.या जिल्हा कृषी महोत्सवाचे आमदार नागो गाणार व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. विजय वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या. या महोत्सवात सर्व दिवस विविध कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.या महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, भारत संचार निगम, जिल्हा परिषद, संशोधन संस्था आदी स्टॉल आहेत. या महोत्सवात ४६ शेतकऱ्यांच्या सेंद्रिय गटांकडून सेंद्रिय माल प्रदर्शन व विक्रीकरिता ठेवण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गटसंस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर