शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

नागपुरात शेतकऱ्यांचा कृषिमाल थेट ग्राहकांसाठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:02 IST

शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे ब्लॅक राईस, पार्वती सूत तांदळाला ग्राहकांची पसंतीफळे, भाजीपाला व विविध कृषिमाल उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांकडून उत्पादित कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करून देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करून देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषिमालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.कृषी विद्यापीठ परिसरात शनिवारपासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू झाला असून, या ठिकाणी शेतमाल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा महोत्सव बुधवार १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, उद्घाटनाच्या दिवशी नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद देत कृषिमालाची खरेदी केली. भरपूर पोषणतत्त्व आणि राज्यात प्रथमच पिकविण्यात आलेल्या ब्लॅक राईसला ग्राहकांनी प्रथम पसंती दिली आहे.या ठिकाणी कृषी उत्पादित मालासोबतच गृहोद्योग आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषीउत्पादनावर प्रक्रिया करून विविध प्रकारची चटणी, लोणचे, फळांचे मुरब्बे, पापड, कुरडया, फळे, भाजीपाला, मध, पपई, विविध वाणांचा तांदूळ, गहू, हरभरा, बटाटे, संत्री, मोसंबी यासह अनेकविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचे २०० वर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, कृषी पणन, फुलशेती, खादी ग्रामोद्योग, कापूस संशोधन केंद्र, महाबीज आदी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे कृषीशी निगडित विभागांचेही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत.या जिल्हा कृषी महोत्सवाचे आमदार नागो गाणार व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. विजय वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या. या महोत्सवात सर्व दिवस विविध कृषितज्ज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.या महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, भारत संचार निगम, जिल्हा परिषद, संशोधन संस्था आदी स्टॉल आहेत. या महोत्सवात ४६ शेतकऱ्यांच्या सेंद्रिय गटांकडून सेंद्रिय माल प्रदर्शन व विक्रीकरिता ठेवण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले शेतकरी, प्रगतिशील शेतकरी, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गटसंस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर