शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होईल

By admin | Updated: May 28, 2017 02:35 IST

शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर,...

बनवारीलाल पुरोहित : नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कोरडवाहू शेती करणारा शेतकरीही प्रगती करू शकेल. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून येईल, असा विश्वास आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला. नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल मुताने, खा. अशोक नेते, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अमरावतीचे महापौर संजय नरोणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, किशोर धारिया, उद्योगपती दिलीप गोसल, सुधाकर शेट्टी उपस्थित होते. बनवारीलाल पुरोहित म्हणाले, आज पाण्याचा सिंचनासाठी अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या विकास केंद्राने पाण्याच्या वापरासोबतच संत्रा, मोसंबी, टमाटर यासह अन्य फळे व पिकांवर प्रक्रिया करण्याची तसेच त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकण्यापेक्षा जे विकते ते पिकविण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात सदैव शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार घोळत असतो. ते रस्त्याचे लोकार्पण करायला जरी आले असले तरी त्यामागे त्यांचा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू असतो. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देशातील उद्योगपत्यांपेक्षा मोठे होऊ शकतात. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्र करणार आहे. शेतकऱ्यांनी ते विकते तेच पिकविले पाहिजे. गिरीश गांधी हे ध्येयवेडे आहेत. त्यांनी ही नितीन गडकरी यांना दिलेली सर्वोत्तम भेट होय, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर बंडोपंत उमरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी, कारंजा (घाडगे), आर्वी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्पादकता वाढविण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक - पालकमंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणत्याही बाबीची उत्पादकता वाढविण्यासाठी त्याचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. याला शेतीक्षेत्रही अपवाद नाही. गिरीश गांधी यांनी नेमकी हीच बाब हेरून या विकास केंद्राची निर्मिती केली. यासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतली नाही. या विकास केंद्राचा फायदा संपूर्ण विर्दभातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात दोन मेगावॅट क्षमतेचे छोटेछोटे सौरऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हा नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे होणार असल्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.