शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन होईल

By admin | Updated: May 28, 2017 02:35 IST

शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर,...

बनवारीलाल पुरोहित : नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्रामुळे नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. कोरडवाहू शेती करणारा शेतकरीही प्रगती करू शकेल. या केंद्रातून मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडून येईल, असा विश्वास आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केला. नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल मुताने, खा. अशोक नेते, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. डॉ. अनिल बोंडे, आ. डॉ. सुनील देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अमरावतीचे महापौर संजय नरोणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, किशोर धारिया, उद्योगपती दिलीप गोसल, सुधाकर शेट्टी उपस्थित होते. बनवारीलाल पुरोहित म्हणाले, आज पाण्याचा सिंचनासाठी अत्यंत काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे या विकास केंद्राने पाण्याच्या वापरासोबतच संत्रा, मोसंबी, टमाटर यासह अन्य फळे व पिकांवर प्रक्रिया करण्याची तसेच त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी जे पिकते ते विकण्यापेक्षा जे विकते ते पिकविण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या डोक्यात सदैव शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार घोळत असतो. ते रस्त्याचे लोकार्पण करायला जरी आले असले तरी त्यामागे त्यांचा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू असतो. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देशातील उद्योगपत्यांपेक्षा मोठे होऊ शकतात. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्र करणार आहे. शेतकऱ्यांनी ते विकते तेच पिकविले पाहिजे. गिरीश गांधी हे ध्येयवेडे आहेत. त्यांनी ही नितीन गडकरी यांना दिलेली सर्वोत्तम भेट होय, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य नेत्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर बंडोपंत उमरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी, कारंजा (घाडगे), आर्वी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्पादकता वाढविण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक - पालकमंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणत्याही बाबीची उत्पादकता वाढविण्यासाठी त्याचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. याला शेतीक्षेत्रही अपवाद नाही. गिरीश गांधी यांनी नेमकी हीच बाब हेरून या विकास केंद्राची निर्मिती केली. यासाठी त्यांनी कोणतीही शासकीय मदत घेतली नाही. या विकास केंद्राचा फायदा संपूर्ण विर्दभातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात दोन मेगावॅट क्षमतेचे छोटेछोटे सौरऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील पहिला प्रकल्प हा नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे होणार असल्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.