शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ब्रिटीशांनी १९१० साली सुरू केलेले कृषी संशोधन केंद्र मरणासन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:48 IST

ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे.

ठळक मुद्देखर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी अनास्थेमुळे शेतीपयोगी साहित्य धूळ खात

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि लाभ व्हावा, त्यातून शेतीमालाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, विविध पिकांवर संशोधन करून अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उदात्त हेतूने ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे.या केंद्राच्या निर्मितीमुळे ब्रिटिशांची दूरदृष्टी व कल्पकतेची प्रचिती येते. सन १९१८ मध्ये या केंद्राचे शासकीय प्रायोगिक क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यात आले.

वर्षाकाठी १७ लाखांचा तोटाया कृषी संशोधन केंद्रावर वर्षाकाठी सरासरी २५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जातो. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि मजुरांच्या मजुरीचा समावेश आहे. शिवाय, या केंद्राला दरवर्षी २ लाख ३५ हजार रुपयांचे आकस्मिक अनुदान दिले जाते. या केंद्राच्या मालकीच्या शेतीतून वर्षाकाठी अधिकाधिक सरासरी ८ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे या केंद्राला वर्षाकाठी १६ लाख ९७ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.

दर्जेदार बियाण्याची निर्मितीया केंद्रात दर्जेदार बियाण्याची निर्मिती केली जाते. सन २०१७-१८ मध्ये येथील पाच हेक्टरवर ‘पीके व्ही-एचएमटी’ या धानाच्या प्रमाणित वाणाचे पाच हेक्टरमध्ये ८२.१५ क्विंटल उत्पादन झाले. ‘पीकेव्ही-एचएमटी’ सत्यप्रत (फाऊंडेशन सीड) वाणाचे १.४० हेक्टरमध्ये ४.६८ क्विंटल उत्पादन झाले. ‘पीकेव्ही-किसान’ सत्यप्रत वाणाचे दोन हेक्टरमध्ये १३.६८ क्विंटल उत्पादन झाले. हे सर्व बियाणे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची तपासणी केल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते. या केंद्रातील गहू प्रति किलो ३० रुपये, तूर ११० रुपये, बोरू व ढेंचा ४० रुपये जवस ६० रुपये आणि हरभरा ९० रुपये प्रतिकिलोने विकला जातो. हा दर बाजारभावापेक्षा अधिक आहे. तरीही या केंद्राला दरवर्षी तोटा होतो.

किमती अवजारे गंजलीया केंद्राच्या इमारतीवर १० वर्षांत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. येथे महागडी शेतीपयोगी अवजारेदखील आहेत. परंतु, अनास्थेमुळे ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टीवेटर, पेरणीयंत्र, बैलगाडी, मल्चर यासह अन्य शेतीपयोगी साहित्य व जीप उघड्यावर सडत आहे. येथील रोटावेटर हे २५ वर्षांपूर्वीचे आहे. इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून, खिडक्यांचा काचा फुटल्या आहेत. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती