शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

नागपूर जिल्ह्यात ब्रिटीशांनी १९१० साली सुरू केलेले कृषी संशोधन केंद्र मरणासन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:48 IST

ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे.

ठळक मुद्देखर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी अनास्थेमुळे शेतीपयोगी साहित्य धूळ खात

अशोक हटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि लाभ व्हावा, त्यातून शेतीमालाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, विविध पिकांवर संशोधन करून अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उदात्त हेतूने ब्रिटिशांच्या काळात अर्थात १९१० मध्ये तारसा (ता. मौदा) कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. पुढे या केंद्राला सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. एकेकाळी मान-सन्मान प्राप्त करणारे हेच कृषी संशोधन केंद्र आज मरणासन्न झाले आहे.या केंद्राच्या निर्मितीमुळे ब्रिटिशांची दूरदृष्टी व कल्पकतेची प्रचिती येते. सन १९१८ मध्ये या केंद्राचे शासकीय प्रायोगिक क्षेत्रामध्ये रूपांतर करण्यात आले.

वर्षाकाठी १७ लाखांचा तोटाया कृषी संशोधन केंद्रावर वर्षाकाठी सरासरी २५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जातो. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि मजुरांच्या मजुरीचा समावेश आहे. शिवाय, या केंद्राला दरवर्षी २ लाख ३५ हजार रुपयांचे आकस्मिक अनुदान दिले जाते. या केंद्राच्या मालकीच्या शेतीतून वर्षाकाठी अधिकाधिक सरासरी ८ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे या केंद्राला वर्षाकाठी १६ लाख ९७ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.

दर्जेदार बियाण्याची निर्मितीया केंद्रात दर्जेदार बियाण्याची निर्मिती केली जाते. सन २०१७-१८ मध्ये येथील पाच हेक्टरवर ‘पीके व्ही-एचएमटी’ या धानाच्या प्रमाणित वाणाचे पाच हेक्टरमध्ये ८२.१५ क्विंटल उत्पादन झाले. ‘पीकेव्ही-एचएमटी’ सत्यप्रत (फाऊंडेशन सीड) वाणाचे १.४० हेक्टरमध्ये ४.६८ क्विंटल उत्पादन झाले. ‘पीकेव्ही-किसान’ सत्यप्रत वाणाचे दोन हेक्टरमध्ये १३.६८ क्विंटल उत्पादन झाले. हे सर्व बियाणे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची तपासणी केल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते. या केंद्रातील गहू प्रति किलो ३० रुपये, तूर ११० रुपये, बोरू व ढेंचा ४० रुपये जवस ६० रुपये आणि हरभरा ९० रुपये प्रतिकिलोने विकला जातो. हा दर बाजारभावापेक्षा अधिक आहे. तरीही या केंद्राला दरवर्षी तोटा होतो.

किमती अवजारे गंजलीया केंद्राच्या इमारतीवर १० वर्षांत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. येथे महागडी शेतीपयोगी अवजारेदखील आहेत. परंतु, अनास्थेमुळे ट्रॅक्टर, रोटावेटर, कल्टीवेटर, पेरणीयंत्र, बैलगाडी, मल्चर यासह अन्य शेतीपयोगी साहित्य व जीप उघड्यावर सडत आहे. येथील रोटावेटर हे २५ वर्षांपूर्वीचे आहे. इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून, खिडक्यांचा काचा फुटल्या आहेत. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती