शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या असमतोलाने बिघडविले शेतीचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:11 IST

राज्यातील पीक परिस्थिती नाशिक विभाग : १९.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका व ज्वारीवर लष्करी अळी, सोयाबीनवर ...

राज्यातील पीक परिस्थिती

नाशिक विभाग :

१९.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका व ज्वारीवर लष्करी अळी, सोयाबीनवर खोडमाशी, अमेरिकन बोंड अळी, पाने खाणाऱ्या अळींचा तसेच उंट अळी, कापसावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे.

पुणे विभाग :

७.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग आणि महापुराने पिकांचे प्रचंड नुकसान. मका पिकावर लष्करी अळी, ज्वारीवर खोडकीड, उसावर हुमणी व लोकरी मावा. भुईमूग पिकावर हुमणी व तांबेरा रोग तसेच सोयाबीनवर चक्रीभुंगा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव.

औरंगाबाद विभाग :

२७.३० लाख हेक्टरवर पीक पेरणी. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान. मका पिकावर लष्करी अळी, कापूस पिकावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळी. सोयाबीनवर खोडकीड, उंट अळी, चक्रीभुंगा. तंबाखूवर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव.

अमरावती विभाग :

३१.४५ लाख हेक्टरवर पीक पेरणी. अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान. कापसावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळी, सोयाबीनवर उंट अळी, चक्रीभुंगा, खोडमाशी. येलो वहेन मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव.

नागपूर विभाग :

पीक पेरणी क्षेत्र १९.११ लाख हेक्टर. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान. भाताचे क्षेत्र घटले. या पिकावर पिवळी खोडकीड, गाद माशी. कापसावर गुलाबी बोंड अळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे. सोयाबीनवर मावा, तुडतुडे, उंट अळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव. दमट वातावरण, पावसाचा अयोग्य निचरा यामुळे संत्रा आणि मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू.

...................

कोट (हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकारी)

यंदा अंदाज चुकले. मान्सून ब्रेक झाला. सामान्यापेक्षा बंगालच्या खाडीत महिन्यात किमान चार वेळा दबाव निर्माण होतो. यावेळी महिन्यातून दोन वेळाच निर्माण झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड निगेटिव्ह असल्याने पाऊस कमी झाला. अद्यापही तो निगेटिव्हच आहे. बंगालच्या खाडीत ५ सप्टेंबरनंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल, त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील.

- दामोदर पायी

प्रमुख, क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस, आयएमडी, पुणे

....................

कोट (शासकीय सेवेत नसलेल्या हवामान तज्ज्ञ)

अलीकडे जमिनीचे तापमान अनिश्चित झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर निर्माण व्हायला हवे. ते बदलत असल्याने जमिनीवर पाऊस पडायला आर्द्रता तयार होत नाही. शहरीकरण, निर्वणीकरण, प्रदूषण वाढीमुळे भिन्न तापमानाचे क्षेत्र तयार झाले.

- सुरेश चोपणे

पर्यावरण अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

........................