शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पावसाच्या असमतोलाने बिघडविले शेतीचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:11 IST

राज्यातील पीक परिस्थिती नाशिक विभाग : १९.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका व ज्वारीवर लष्करी अळी, सोयाबीनवर ...

राज्यातील पीक परिस्थिती

नाशिक विभाग :

१९.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका व ज्वारीवर लष्करी अळी, सोयाबीनवर खोडमाशी, अमेरिकन बोंड अळी, पाने खाणाऱ्या अळींचा तसेच उंट अळी, कापसावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे.

पुणे विभाग :

७.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग आणि महापुराने पिकांचे प्रचंड नुकसान. मका पिकावर लष्करी अळी, ज्वारीवर खोडकीड, उसावर हुमणी व लोकरी मावा. भुईमूग पिकावर हुमणी व तांबेरा रोग तसेच सोयाबीनवर चक्रीभुंगा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव.

औरंगाबाद विभाग :

२७.३० लाख हेक्टरवर पीक पेरणी. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान. मका पिकावर लष्करी अळी, कापूस पिकावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळी. सोयाबीनवर खोडकीड, उंट अळी, चक्रीभुंगा. तंबाखूवर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव.

अमरावती विभाग :

३१.४५ लाख हेक्टरवर पीक पेरणी. अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान. कापसावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळी, सोयाबीनवर उंट अळी, चक्रीभुंगा, खोडमाशी. येलो वहेन मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव.

नागपूर विभाग :

पीक पेरणी क्षेत्र १९.११ लाख हेक्टर. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान. भाताचे क्षेत्र घटले. या पिकावर पिवळी खोडकीड, गाद माशी. कापसावर गुलाबी बोंड अळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे. सोयाबीनवर मावा, तुडतुडे, उंट अळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव. दमट वातावरण, पावसाचा अयोग्य निचरा यामुळे संत्रा आणि मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू.

...................

कोट (हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकारी)

यंदा अंदाज चुकले. मान्सून ब्रेक झाला. सामान्यापेक्षा बंगालच्या खाडीत महिन्यात किमान चार वेळा दबाव निर्माण होतो. यावेळी महिन्यातून दोन वेळाच निर्माण झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड निगेटिव्ह असल्याने पाऊस कमी झाला. अद्यापही तो निगेटिव्हच आहे. बंगालच्या खाडीत ५ सप्टेंबरनंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल, त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील.

- दामोदर पायी

प्रमुख, क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस, आयएमडी, पुणे

....................

कोट (शासकीय सेवेत नसलेल्या हवामान तज्ज्ञ)

अलीकडे जमिनीचे तापमान अनिश्चित झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर निर्माण व्हायला हवे. ते बदलत असल्याने जमिनीवर पाऊस पडायला आर्द्रता तयार होत नाही. शहरीकरण, निर्वणीकरण, प्रदूषण वाढीमुळे भिन्न तापमानाचे क्षेत्र तयार झाले.

- सुरेश चोपणे

पर्यावरण अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी

........................