शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; नागपूर-वर्धा महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:22 IST

राज्यात मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देरस्त्यावर मेंढ्या सोडल्या सरकारविरोधात भाजप खासदार रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात मराठा आंदोलनानंतर धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी नागपूर-वर्धा महामार्गावर डोंगरगाव येथे धनगर समाज संघर्ष समिती नागपूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक खा. डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर मेंढ्या सोडल्याने नागपूर-वर्धा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली.राज्यातील धनगर जमातीस अनुसूचित जमातीच्या सवलतीच्या अंमलबजावणी करण्यासासाठी अनेक आंदोलन, मोर्चे आणि मेळाव्याद्वारे शासनाचे आजवर वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले. मात्र चार वर्षांचा कालावधी होऊनही आरक्षणाच्या अंमलबजावणीचे शिफारस पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविले नसल्याची माहिती यावेळी खा. महात्मे यांनी दिली. धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यास शासनाने विलंब केल्यास पुढील काळात धनगर समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महात्मे यांनी याप्रसंगी दिला. शासनाच्या दुर्लक्षामुळे समाजात संतापधनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने धनगर समजात तीव्र संताप पसरला आहे. सोमवारी महाराष्ट्र धनगर समाज महासंघातर्फे प्रदेश सचिव युवराज घोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.धनगर समाजाला संविधानाने आरक्षण दिले आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा उल्लेख संविधानाच्या परिशिष्ट-२ मधील अनुसूचित जमाती (एसटी)च्या यादीमध्ये ३६ व्या क्रमांकावर आहे, तरीही महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळत नसल्याने समाज मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे धनगर समाज आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेने आंदोलन करीत आहे, असे घोडे यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी बारामती येथे घोषणा केली होती, की त्यांचे सरकार येताच कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षणाची सुविधा देण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येईल. त्यांचे सरकार येऊन चार वर्षे झाली. परंतु राज्य सरकारने आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. तेव्हा दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :agitationआंदोलन