शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड; 'तो' सैतान बनला अन् 'त्यांच्या' किंकाळ्या गारठल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 07:00 IST

Nagpur News १० वर्षांचा वृषभ अन् पाच वर्षांची टिया भयानक वेदनांनी ओरडू पाहात होते. मात्र, कधी प्रेमाने घास भरविणारा त्यांचा बाप जणू सैतानच बनला होता. मुलांनी ओरडू नये म्हणून त्याने त्यांचे तोंडही दाबले असावे.

ठळक मुद्देतेथे मृत्यूही ओशाळला असावा क्रूरकर्म्याने वेदनांचीही केली मुस्कटदाबी

नरेश डोंगरे 

नागपूर : गारठा भरविणाऱ्या थंडीत जन्मदाताच काळ बनून समोर होता. तो चाकूचे सपासप घाव घालत होता अन् त्यांच्या किंकाळ्या गारठल्या होत्या. १० वर्षांचा वृषभ अन् पाच वर्षांची टिया भयानक वेदनांनी ओरडू पाहात होते. मात्र, कधी प्रेमाने घास भरविणारा त्यांचा बाप जणू सैतानच बनला होता. मुलांनी ओरडू नये म्हणून त्याने त्यांचे तोंडही दाबले असावे. त्यामुळे काळ बनलेल्या बापासमोर या दोन निरागस जीवांनी तडफडतच प्राण सोडला असावा.

मंगळवारी, १८ जानेवारीला उघडकीस आलेल्या जरीपटक्यातील तिहेरी हत्याकांडाने अनेकांच्या मनाचा थरकाप उडविला आहे. आपल्या व्यसनासाठी गोड संसाराची राखरांगोळी करणारा क्रूरकर्मा मदन अग्रवाल (वय ३९) याने ज्या पद्धतीने पत्नी आणि पोटच्या मुलांना संपविले त्याची कल्पनाच काळजाचे पाणी करणारी ठरावी.

वृषभ आणि टिया या दोघांच्याही पोटावर चाकूचे अनेक घाव आहेत. तर, पत्नी किरणचा गळा कापलेला आहे. त्याने आधी झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरला असावा. ती शांत झाल्यानंतर मुलाच्या पोटावर चाकूचे घाव घातले असावे अन् नंतर चिमुकल्या टियाच्याही पोटावर चाकूचे सपासप वार केले असावे. पोटात घाव घातल्या गेल्यामुळे बराच वेळेपर्यंत हे चिमुकले जीव वेदनांनी तडफडत असावे अन् काळासारखा क्रूरकर्मा बाप पाहून कदाचित त्यांच्या तीव्र झालेल्या वेदनांना कवटाळत त्यांनी जीव सोडला असावा. जन्मदाता असा असेल तर कशाला जगायचे, असा प्रश्नही या बिचाऱ्यांना अंतिम क्षणी पडला असावा अन् त्यावेळी तेथे मृत्यूही ओशाळला असावा.

उपराजधानीतील यापूर्वीची अमानुषता

उपराजधानीत यापूर्वीही असे काही थरारक हत्याकांड घडले. सात महिन्यांपूर्वी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तत्पूर्वी कोराडी, तहसील, नंदनवन आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचे क्राैर्य घडले होते.

((१))

तहसील -

आलोक ऊर्फ चंदू अशोक माटूरकर (वय ४२) नामक क्रूरकर्म्याने १९ जून २०२१ ला पत्नी विजू ऊर्फ विजया, बिन्टी ऊर्फ परी (मुलगी, वय १४), साहिल (मुलगा, वय ११), लक्ष्मी देविदास बोबडे (सासू, वय ५५) आणि अमिषा (मेहुणी, वय २१) यांची हत्या केली. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती.

((२))

कोराडी

- १८ ऑगस्ट २०२० डॉ. सुषमा राणे हिने मुलगा ध्रुव, मुलगी लावण्या आणि पती धीरज राणे यांना जेवणातून विषाक्त इंजेक्शन टोचले. त्यांची हत्या करून स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती.

((३))

नंदनवन -

१० जून २०१८

विवेक पालटकर नामक आरोपीने त्याचा स्वत:चा मुलगा कृष्णा, सख्खी बहीण अर्चना पवनकर, भाची वेदांती, जावई कमलाकर आणि त्यांची आई मीराबाई पवनकर या पाच जणांची हत्या केली होती.

((४))

तहसील

साधारणत: ८ ते १० वर्षांपूर्वी बिहारचे मूळ निवासी असलेल्या एका कुटुंबातील महिलेने पती आणि मुलाला विषाक्त भोजन देऊन त्यांची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली होती.

((५))

गिट्टीखदान

- डिसेंबर २०२०

लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०. रा. हजारी पहाड) आणि यश मोहन धुर्वे (वय १०) या आजी-नातूची हत्या करून एका अल्पवयीन आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केली होती.

 

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी