शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अनलॉकनंतर बस रेल्वेही हाऊसफुल्ल()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

दररोज प्रवासी ९८८० रेल्वे फेऱ्या - ८५ प्रवासी - १०,५०० लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक ...

दररोज प्रवासी ९८८०

रेल्वे फेऱ्या - ८५

प्रवासी - १०,५००

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाली आहे. वाहतूक सेवा सुरू होताच प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेल्वे आणि बस हाऊसफुल्ल चाालत आहेत.

नागपूर जिल्ह्यात एकूण एसटीच्या ४५० फेऱ्या सुरू आहे. यातून दररोज ९८८० प्रवासी प्रवास करीत आहेत, तर रेल्वेतर्फे ८५ फेऱ्या सुरू असून, दररोज १०,५०० प्रवासी प्रवासी करीत आहेत. एकूणच अनलॉकनंतर सार्वजनिक वाहतूक सेवेला प्रवाशांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता बस व रेल्वे सेवा लवकरच सुरळीत हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसटी सुरू झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दुकानदार व व्यापारीही उत्साहात आहेत.

बॉक्स

रेल्वेने बिहार राजस्थान, कोलकाता, तर बसने अमरावती, यवतमाळकडे जाणारे प्रवासी अधिक

सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये बिहार, राजस्थान, मुंबई आणि कोलकाता येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये अमरावती, यवतमााळ, भंडारा व गडचिरोलीला अधिक पसंती असल्याचे दिसून येते.

बॉक्स

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

प्रवाशांची गर्दी वाढली असून, अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक प्रवास करीत असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्थानकातील काही प्रवाशांना याबाबत विचारणा केली असता ही बाब दिसून आली.

कोट

माझा मोठा भाऊ भंडाऱ्याला राहतो. त्याची मुलगी म्हणजे माझ्या पुतणीचे लग्न ठरले आहे. ११ तारखेला लग्न आहे. त्यासाठी जाणे आवश्यक आहे. आता सर्व वाहतूक सुरू झाल्याने सहजपणे जाणे शक्य झाले आहे.

संतोष निमसरकार

आम्ही मुंबईला राहतो. नागपूरला नातेवाईक राहतात. काही दिवसांपूर्वी एका नातेवाइकाचा मृत्यू झाला होता. त्यासाठी आलो होतो. आता परत जात आहोत.

अंजली देशपांडे

बॉक्स

बसेसच्या फेऱ्या वाढविल्या

‘शासनाने अनलॉक केल्यानंतर एसटीची प्रवासी संख्या वाढली. त्यामुळे आम्ही एसटी बसेसच्या फेऱ्यांत वाढ केली आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

बॉक्स

प्रवाशांची संख्या वाढत आहे

‘महाराष्ट्रात अनलॉक झाल्यापासून प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही काळजी घेत आहोत. प्रवाशांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.‘

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी