शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर बस रेल्वेही हाऊसफुल्ल()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

दररोज प्रवासी ९८८० रेल्वे फेऱ्या - ८५ प्रवासी - १०,५०० लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक ...

दररोज प्रवासी ९८८०

रेल्वे फेऱ्या - ८५

प्रवासी - १०,५००

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाली आहे. वाहतूक सेवा सुरू होताच प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेल्वे आणि बस हाऊसफुल्ल चाालत आहेत.

नागपूर जिल्ह्यात एकूण एसटीच्या ४५० फेऱ्या सुरू आहे. यातून दररोज ९८८० प्रवासी प्रवास करीत आहेत, तर रेल्वेतर्फे ८५ फेऱ्या सुरू असून, दररोज १०,५०० प्रवासी प्रवासी करीत आहेत. एकूणच अनलॉकनंतर सार्वजनिक वाहतूक सेवेला प्रवाशांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता बस व रेल्वे सेवा लवकरच सुरळीत हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसटी सुरू झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दुकानदार व व्यापारीही उत्साहात आहेत.

बॉक्स

रेल्वेने बिहार राजस्थान, कोलकाता, तर बसने अमरावती, यवतमाळकडे जाणारे प्रवासी अधिक

सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये बिहार, राजस्थान, मुंबई आणि कोलकाता येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये अमरावती, यवतमााळ, भंडारा व गडचिरोलीला अधिक पसंती असल्याचे दिसून येते.

बॉक्स

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

प्रवाशांची गर्दी वाढली असून, अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक प्रवास करीत असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्थानकातील काही प्रवाशांना याबाबत विचारणा केली असता ही बाब दिसून आली.

कोट

माझा मोठा भाऊ भंडाऱ्याला राहतो. त्याची मुलगी म्हणजे माझ्या पुतणीचे लग्न ठरले आहे. ११ तारखेला लग्न आहे. त्यासाठी जाणे आवश्यक आहे. आता सर्व वाहतूक सुरू झाल्याने सहजपणे जाणे शक्य झाले आहे.

संतोष निमसरकार

आम्ही मुंबईला राहतो. नागपूरला नातेवाईक राहतात. काही दिवसांपूर्वी एका नातेवाइकाचा मृत्यू झाला होता. त्यासाठी आलो होतो. आता परत जात आहोत.

अंजली देशपांडे

बॉक्स

बसेसच्या फेऱ्या वाढविल्या

‘शासनाने अनलॉक केल्यानंतर एसटीची प्रवासी संख्या वाढली. त्यामुळे आम्ही एसटी बसेसच्या फेऱ्यांत वाढ केली आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

बॉक्स

प्रवाशांची संख्या वाढत आहे

‘महाराष्ट्रात अनलॉक झाल्यापासून प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही काळजी घेत आहोत. प्रवाशांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.‘

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी