शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट'

By योगेश पांडे | Updated: June 23, 2025 13:05 IST

Nagpur : नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

योगेश पांडेनागपूर : पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' पराबविल्यानंतर देशात हेरगिरीची काही प्रकरणे समोर आली. त्याच काळात एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील सुनीता नावाच्या एका महिलेची हेरगिरीच्याच आरोपांवरून चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्येक संकटात नवीन संधी शोधणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता 'हेरगिरी' हाच धागा पकडून नवीन जाळे विणले आहे. नागरिकांना फोन करून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करतात व स्वतःला एटीएस किंवा जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून खंडणी उकळत आहेत. हा प्रकार चिंताजनक असून राज्यासोबतच देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला. तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली होती. याच्या चौकशीसाठी अगदी एनआयए, जम्मू-काश्मीर पोलिसदेखील समोर आले. या घटनेनंतर सायबर गुन्हेगारदेखील वेगळ्या पद्धतीने सक्रिय झाले. त्यांनी देशातील काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. मुंबईतीलच गिरगाव येथील एका वृद्ध महिलेलादेखील असाच फोन गेला. दिल्ली एटीएस तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचारी असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला. तिला अज्ञात नंबरवरून तीन कॉल आले. कॉल करणाऱ्याने स्वतःला दिल्ली एटीएसमधील अधिकारी प्रेम कुमार गुप्ता" असल्याचे भासवले. पाकिस्तानशी संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी बतावणी त्याने केली. तिने दाव्यांवर विश्वास ठेवावा यासाठी तिच्या फोनवर महिलेसोबतचा त्याचा ओळखपत्राचा फोटोही शेअर केला. काहीही केले नसले तरी पोलिस आपल्याला अडकवतील या भीतीपोटी घाबरलेल्या महिलेने त्याला २२ लाख रुपये वळते केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला. देशातील इतर काही शहरांतदेखील अशा प्रकारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला.

तुरुंगवासाची दाखवितात भीतीनागरिकांचा पाकिस्तानसोबत दुरान्वये संबंध नसतानादेखील नागरिक अलगदपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. फसवणूक करणारे अगोदर पोलिस अधिकारी असल्याचे बोगस आयकार्ड पाठवितात. त्यानंतर हेरगिरीसाठी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड लागेल अशी धमकी देतात. त्यामुळे नागरिक घाबरतात. गुन्हेगारांकडून आता एआयचादेखील वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आपली काहीही चूक नसल्याचे नागरिकांना माहीत असताना त्यांनी न घाबरता थेट सायबर सेलकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम