शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट'

By योगेश पांडे | Updated: June 23, 2025 13:05 IST

Nagpur : नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

योगेश पांडेनागपूर : पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' पराबविल्यानंतर देशात हेरगिरीची काही प्रकरणे समोर आली. त्याच काळात एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील सुनीता नावाच्या एका महिलेची हेरगिरीच्याच आरोपांवरून चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्येक संकटात नवीन संधी शोधणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता 'हेरगिरी' हाच धागा पकडून नवीन जाळे विणले आहे. नागरिकांना फोन करून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करतात व स्वतःला एटीएस किंवा जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून खंडणी उकळत आहेत. हा प्रकार चिंताजनक असून राज्यासोबतच देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला. तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली होती. याच्या चौकशीसाठी अगदी एनआयए, जम्मू-काश्मीर पोलिसदेखील समोर आले. या घटनेनंतर सायबर गुन्हेगारदेखील वेगळ्या पद्धतीने सक्रिय झाले. त्यांनी देशातील काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. मुंबईतीलच गिरगाव येथील एका वृद्ध महिलेलादेखील असाच फोन गेला. दिल्ली एटीएस तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचारी असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला. तिला अज्ञात नंबरवरून तीन कॉल आले. कॉल करणाऱ्याने स्वतःला दिल्ली एटीएसमधील अधिकारी प्रेम कुमार गुप्ता" असल्याचे भासवले. पाकिस्तानशी संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी बतावणी त्याने केली. तिने दाव्यांवर विश्वास ठेवावा यासाठी तिच्या फोनवर महिलेसोबतचा त्याचा ओळखपत्राचा फोटोही शेअर केला. काहीही केले नसले तरी पोलिस आपल्याला अडकवतील या भीतीपोटी घाबरलेल्या महिलेने त्याला २२ लाख रुपये वळते केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला. देशातील इतर काही शहरांतदेखील अशा प्रकारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला.

तुरुंगवासाची दाखवितात भीतीनागरिकांचा पाकिस्तानसोबत दुरान्वये संबंध नसतानादेखील नागरिक अलगदपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. फसवणूक करणारे अगोदर पोलिस अधिकारी असल्याचे बोगस आयकार्ड पाठवितात. त्यानंतर हेरगिरीसाठी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड लागेल अशी धमकी देतात. त्यामुळे नागरिक घाबरतात. गुन्हेगारांकडून आता एआयचादेखील वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आपली काहीही चूक नसल्याचे नागरिकांना माहीत असताना त्यांनी न घाबरता थेट सायबर सेलकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम