शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट'

By योगेश पांडे | Updated: June 23, 2025 13:05 IST

Nagpur : नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

योगेश पांडेनागपूर : पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' पराबविल्यानंतर देशात हेरगिरीची काही प्रकरणे समोर आली. त्याच काळात एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील सुनीता नावाच्या एका महिलेची हेरगिरीच्याच आरोपांवरून चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्येक संकटात नवीन संधी शोधणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता 'हेरगिरी' हाच धागा पकडून नवीन जाळे विणले आहे. नागरिकांना फोन करून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करतात व स्वतःला एटीएस किंवा जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून खंडणी उकळत आहेत. हा प्रकार चिंताजनक असून राज्यासोबतच देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला. तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली होती. याच्या चौकशीसाठी अगदी एनआयए, जम्मू-काश्मीर पोलिसदेखील समोर आले. या घटनेनंतर सायबर गुन्हेगारदेखील वेगळ्या पद्धतीने सक्रिय झाले. त्यांनी देशातील काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. मुंबईतीलच गिरगाव येथील एका वृद्ध महिलेलादेखील असाच फोन गेला. दिल्ली एटीएस तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचारी असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला. तिला अज्ञात नंबरवरून तीन कॉल आले. कॉल करणाऱ्याने स्वतःला दिल्ली एटीएसमधील अधिकारी प्रेम कुमार गुप्ता" असल्याचे भासवले. पाकिस्तानशी संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी बतावणी त्याने केली. तिने दाव्यांवर विश्वास ठेवावा यासाठी तिच्या फोनवर महिलेसोबतचा त्याचा ओळखपत्राचा फोटोही शेअर केला. काहीही केले नसले तरी पोलिस आपल्याला अडकवतील या भीतीपोटी घाबरलेल्या महिलेने त्याला २२ लाख रुपये वळते केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला. देशातील इतर काही शहरांतदेखील अशा प्रकारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला.

तुरुंगवासाची दाखवितात भीतीनागरिकांचा पाकिस्तानसोबत दुरान्वये संबंध नसतानादेखील नागरिक अलगदपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. फसवणूक करणारे अगोदर पोलिस अधिकारी असल्याचे बोगस आयकार्ड पाठवितात. त्यानंतर हेरगिरीसाठी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड लागेल अशी धमकी देतात. त्यामुळे नागरिक घाबरतात. गुन्हेगारांकडून आता एआयचादेखील वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आपली काहीही चूक नसल्याचे नागरिकांना माहीत असताना त्यांनी न घाबरता थेट सायबर सेलकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम