शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही आदिवासींवर अन्यायच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:16 IST

ब्रिटिशांनी वन विभाग स्थापन करून आदिवासींचे अधिकार हिरावले आणि त्यांच्यावरील अन्यायाचे सत्र सुरू झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु आदिवासींवरील हा अन्याय मात्र कायम राहिला.

ठळक मुद्देजागतिक आदिवासी अधिकार दिवस : फेलिक्स पॅडेल यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्रिटिशांनी वन विभाग स्थापन करून आदिवासींचे अधिकार हिरावले आणि त्यांच्यावरील अन्यायाचे सत्र सुरू झाले. भारत स्वतंत्र झाला, परंतु आदिवासींवरील हा अन्याय मात्र कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर आजही आदिवासींचे अधिकार हिरावले जात असून, त्यांच्यावर अन्याय सुरू आहे. विकासाच्या नावावर जल,जंगल, जमीन नष्ट केली जात आहे, असे प्रतिपादन मानव उत्क्रांतीवादाचे जनक डार्विन यांचे पणतू आणि मानववंश शास्त्रज्ज्ञ डॉ. फेलिक्स पॅडेल यांनी येथे केले.आदिवासी समाजातील देशभरातील विविध सामाजिक संस्थांच्या एकीकृत मंच असलेल्या आदिवासी समन्वय मंच, अ.भा.आदिवासी परधान समाज संघटन, आदिवासी विद्यार्थी संघ आणि विविध आदिवासी संघटनांच्यावतीने अकरावा जागतिक आदिवासी अधिकार दिवसानिमित्त बुधवारी धंतोली येथील बचत भवन सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पॅडेल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री खा. फग्गनसिंह कुलस्ते, राजस्थानचे माजी मंत्री महेंद्रजितसिंग मालविया, ओडिशाचे आमदार भोला मुंडारी, प्रभू टोकिया, अशोक बाबुल, साधना मीना, राजमाता राज राजेश्वरी, मुकेश बिरवा, आनंदराव कोवे, अमित कोवे, दिनेश मडावी, शिव भानुसिंग मंडलोई, इंदिरा मरकाम, मुकुंदा उईके आदी व्यासपीठावर होते.डॉ. पॅडेल म्हणाले, जल, जमीन, जंगल नष्ट केले जात आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींना हटविले जात आहे. आदिवासी आजही शिक्षणात मागे आहेत; कारण स्वातंत्र्यानंतर त्यांची संस्कृती व भाषा ही शाळेत उपलब्धच करून देण्यात आलेली नाही. देशभरातील आदिवासी आपल्या अधिकारासाठी लढत आहेत. देशात विविध ठिकाणी आदिवासींचे आंदोलन सुरू आहे. परंतु या आंदोलनाला विकास विरोधी आंदोलन ठरविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. पॅडेल यांनी ओडिशातील आदिवासी भाषेतील एक गीतही व्हायोलिनवर सादर केले. अशोक चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शांतिकर वसावा यांनी संचालन केले. एच.सी. माथे यांनी आभार मानले.ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल आदिवासींची मागितली जाहीर माफीआदिवासी समाजावर जगभरात अन्याय केला जात आहे. आॅस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी मोठे मन दाखवून त्यांच्या देशात आदिवासींवर झालेल्या अन्यायाबाबत जाहीर माफी मागितली. भारतातील आदिवासींवर ब्रिटिशांनी अन्याय केला. त्यांच्या भांडवलवादी धोरणामुळेच आदिवासींवर अन्याय झाला. आजही तो अन्याय सुरू आहे, त्यामुळे एक ब्रिटिश नागरिक या नात्याने मी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागत असल्याचे डॉ. फेलिक्स पॅडेल यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले.देशभरातील आदिवासींनी एकजूट व्हावेयावेळी माजी मंत्री खा. फग्गनसिंह कुलस्ते यांनी आदिवासींनी आपल्या अधिकारांसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. देशभरातील आदिवासी एकत्र आले तर त्यांचे अधिकार कुणीही हिरावू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दिनेश मडावी यांनी सुद्धा आदिवासींनी आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन केले. राजमाता राजेश्वरी, महेंद्रजित सिंग मालविया, भोला मुंडारी, प्रभू टोकीया,आदींनीही आपले विचार व्यक्त केलेआदिवासी भाषा-संस्कृतीचे रक्षण व्हावेआदिवासी भाषा आणि संस्कृती ही अतिशय जुनी व समृद्ध आहे. आदिवासीतील काही शब्द इंग्रजीमध्ये सुद्धा आलेले आहेत. परंतु ही भाषा आणि संस्कृती नष्ट होत चालली आहे, त्याचे रक्षण करण्याची गरज आहे, असे डॉ. फेलिक्स पॅडेल म्हणाले.