शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमांसंदर्भात उपेक्षाच : अरुणकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 21:02 IST

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सीमेची नेहमी उपेक्षाच केली. याचाच फायदा पाकिस्तान व चीन हे देश घेत गेले. आजही आपल्या देशाच्या अधिपत्याखाली नेमकी किती बेटं येतात याची माहिती नाही. जगभरात सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती बदलत आहे. त्या हिशेबाने दुसऱ्या  देशांचा अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमार यांनी केले.

ठळक मुद्दे‘राष्ट्रीय सुरक्षा-वर्तमान परिस्थिती’वर व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशात धर्मसंस्कृतीसंदर्भात समाजात प्रचंड अभ्यास व जागरुकता आहे मात्र हाच दृष्टिकोन सीमेबद्दल दिसून येत नाही हे दुर्दैव आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने सीमेची नेहमी उपेक्षाच केली. याचाच फायदा पाकिस्तान व चीन हे देश घेत गेले. आजही आपल्या देशाच्या अधिपत्याखाली नेमकी किती बेटं येतात याची माहिती नाही. जगभरात सुरक्षेसंदर्भातील परिस्थिती बदलत आहे. त्या हिशेबाने दुसऱ्या  देशांचा अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख अरुणकुमार यांनी केले. हिंदू धर्म-संस्कृती मंदिरातर्फे अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा : वर्तमान परिस्थिती व समाजाचे कर्तव्य’ या विषयावर उद्बोधन केले.सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, हिंदू धर्म-संस्कृती मंदिरचे अध्यक्ष गुरुनाथ (बापू) भागवत हे प्रामुख्याने उपस्थित होते. सुरक्षा हा गुंतागुंतीचा विषय होत आहे. केवळ युद्ध, आक्रमण यांच्याभोवतीच आता सुरक्षेची व्याप्ती राहिलेली नाही. सीमेच्या पलिकडून देशाच्या आत वातावरण कलुषित करून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. आपल्या देशाला मोठी सागरी सीमा आहे व येथे हजारो द्वीप आहेत. मात्र नेमके बेट व द्वीप किती याची संख्या राज्यकर्त्यांकडे नाही. चीनमध्ये भारताच्या विविध क्षेत्रांचे अध्ययन करण्यासाठी ५०० हून अधिक अध्ययन केंद्र आहेत. तेथील बुद्धिवंत लोक भारताचा सखोल अभ्यास करत आहेत. आपल्याकडे मात्र बुद्धिवंत म्हणजे केवळ चर्चासत्र, कार्यशाळा, भाषणे यापुरतेच मर्यादित आहेत. बुद्धिवंतांनी देशाची सुरक्षा हा आपला विषय मानला पाहिजे, असे प्रतिपादन अरुणकुमार यांनी केले. प्रकाश एदलाबादकर यांनी संचालन केले तर बापू भागवत यांनी आभार मानले.पाक-चीनबाबत स्पष्ट धोरण का नाही ?स्वातंत्र्यापासून राज्यकर्त्यांनी कधीही पाकिस्तान व चीनबाबत स्पष्ट धोरण स्पष्ट केले नाही. भारत हा आपला शत्रू आहे व त्याला हरतऱ्हेने  कमकुवत करायचे आहे, हे पाकिस्तानचे धोरण स्पष्ट आहे. चीनचेदेखील यासंदर्भात धोरण स्पष्ट आहे. मग या देशांसंदर्भात आतापर्यंत आपणच धोरण स्पष्ट का ठेवले नाही, असा प्रश्न अरुणकुमार यांनी उपस्थित केला.पाक-चीनकडून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्नआता देशाची शक्ती जगात दिसत असताना पाक व चीनकडून देशविघातक शक्तींना बळ देऊन भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत व पुढील काळात हे प्रयत्न आणखी ताकदीने होतील, असेदेखील ते म्हणाले. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून मनोवैज्ञानिक युद्धनीतीचा वापर करण्यात येत असून नागरिकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. जलीकट्टूचा विरोध करणाऱ्या ४७ ‘फेसबुक पेजेस’पैकी २७ पाकिस्तानमधून संचालित होत होते. काश्मीरमध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या २०० ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’चे ‘अ‍ॅडमिन’ पाकिस्तानमधील होते. चीन व पाकिस्तानकडून शहरी भागातील नक्षलवादाला खतपाणी घालण्यात येत आहे. पुढील काळात हे प्रकार वाढतील, असे प्रतिपादन यावेळी अरुणकुमार यांनी केले.समलैंगिकांच्या विवाहावर चर्चा कशाला ?पाकिस्तान व चीनकडून आपल्या संस्कृतीवर आघात घालण्याचेदेखील मनसुबे समोर येत असून समलैंगिकांचे विवाह हादेखील त्यातीलच प्रकार असल्याचे भाष्य त्यांनी केले. समलैंगिकांच्या विवाहाच्या मुद्द्यावर देशाच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमध्येदेखील बातम्या रंगल्या. मात्र ही देशाची संस्कृती नाही. देशाच्या मूल्यांवर प्रहार करण्याचे प्रयत्न ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून सीमेपलीकडून होत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ