शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अखेर मृत्यूनंतर १९ वर्षांनी शेतकऱ्याला मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:41 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टातील प्रकरण : जमिनीचा मोबदला वाढवून दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आहे.व्यंकटराव देशमुख असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते चिंचोली, जि. यवतमाळ येथील रहिवासी होते. अरुणावती प्रकल्पासाठी त्यांची १४ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. जमिनीचा समाधानकारक मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी १९९५ मध्ये उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. अपील प्रलंबित असताना त्यांचा ३ आॅगस्ट १९९९ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर २०१७ मध्ये न्यायालयाने देशमुख यांच्या आठही मुलींना वारसदार म्हणून रेकॉर्डवर घेऊन अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल केले होते. त्यावर गेल्या १८ जानेवारी रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता अपीलकर्त्यांना एक लाख रुपये हेक्टर मोबदला व व्याजासह अन्य लाभ देण्यात यावेत असा आदेश राज्य शासनाला दिला. अपीलकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण देशमुख यांनी बाजू मांडली.३८०५ दिवसांचा विलंब क्षमापितया प्रकरणाची देशमुख यांच्या मुलींना माहिती नव्हती. लग्नानंतर त्या सासरी राहात होत्या. देशमुख यांच्या मृत्यूनंतर एका आदेशाचे पालन न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने २००७ मध्ये अपील खारीज केले होते. मुलींना २०१७ मध्ये या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून नावे रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ३८०५ दिवसांचा विलंब क्षमापित करून आठही मुलींना रेकॉर्डवर घेतले होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी