शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

थंडीपाठोपाठ संक्रांतीची चाहूल लागली पण तिळाची लागेना; भावही वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 19:10 IST

Nagpur News संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्दे१८० रुपये किलो दराने होतेय विक्रीवर्तमानातील दर चढतीवर

नागपूर : मकर संक्रमण उत्सवाची नांदी लागताच ‘तिळगूळ खा गोड गोड बोला’च्या सरावास सुरुवात होतो. मात्र, यंदाच्या तिळगुडावर महागाईचा ठोसा पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत. सद्य:स्थितीत १८० रुपये किलोच्या आसपास तीळ विकले जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.८ हेक्टरने लागवड कमी

विदर्भात नागपूर जिल्ह्यात तीळ पीक घेतले जाते. इतर जिल्ह्यात हे पीक घेण्याचे प्रमाण नगण्य आहे. एका अर्थाने केवळ कौटुंबिक उपयोगासाठी म्हणून हे पीक इतर पिकांसोबत घेतले जाते. नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ७२ हेक्टरवर तीळ पीक घेतले गेले होते. यंदा मात्र पीक क्षेत्र २०.८ हेक्टरने घटले असून केवळ ५१.२ हेक्टर जमिनीवरच तिळाचे पीक घेतले गेले आहे. त्याचाही परिणाम यंदा तिळाचे दर वाढण्याला कारणीभूत ठरणार आहे.

नागपूर जिल्ह्यात मिश्र पीक म्हणून घेतले जाते तीळ

तिळाच्या उत्पादनात राजस्थान देशात क्रमांक १चे राज्य आहे. महाराष्ट्रातही हे पीक घेतले जाते. खरीप व रब्बी हंगामात हे पीक घेण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तीळ हे मिश्र पीक अर्थात इतर पिकांच्या संगतीला धुऱ्यावर किंवा एखाद्या बांदीमध्ये हे पीक घेतले जाते. नागपूर जिल्ह्यातही तिळाच्या बाबतीत मिश्र पिकाचीच संकल्पना राबविली जाते. सलग पीक कुठेही घेतले जात नाही.

लाल व पांढरे तीळ

लाल, पांढरा व काळा असे तिळाचे पीक असते. नागपूर जिल्ह्यात लाल व पांढरा पीक घेतले जात असून, पांढरा तिळाच्या लागवडीचे प्रमाण अधिक आहे. नागपुरात खरीप हंगामात म्हणजेच जून-जुलैमध्ये हे पीक पेरले जाते आणि डिसेंबरमध्ये कापणी केली जाते. रब्बी अर्थात उन्हाळ्यात हे पीक नागपुरात घेण्याची परंपरा नाही.

मध्यप्रदेश, बुलढाणा येथून आवक

नागपुरात व विदर्भातील इतर जिल्ह्यात बुलढाणा व मध्यप्रदेशातून तिळाची आवक होते. राजस्थानमधूनही तिळाची तूट भरून काढण्याचे प्रयत्न केले जाते. एका अर्थाने नागपूर व विदर्भ पूर्णत: तिळाच्या आयातीवरच निर्भर असल्याचे स्पष्ट होते.

तिळाचे दर बहुदा स्थिरच

तिळाचे दर बहुतांश करून स्थिरच असतात. खरीप लागवडीनंतर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने तिळाचे दर कमी होतात. त्यानंतर दरामध्ये स्थैर्य असते. रबी हंगामाच्या लागवडीनंतर मार्च-एप्रिलमध्ये तिळाची आवक होत असल्याने दरामध्ये फारसा फरक पडत नाही. नागपूरच्या बाजारात सद्य:स्थितीत तिळाचे दर प्रतिकिलोला १८० रुपये आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० ते ५० रुपयांनी अधिक आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढल्यावर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मागणीही मोठी असल्याने दर कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. तिसऱ्या आठवड्यापासून मात्र त्यात घसरण होण्याची शक्यता आहे.

तिळाचे दर (प्रतिकिलो)

२०२० - १०० ते ११० रुपये

नोव्हेंबर २०२१ - १६५ ते १७० रुपये

डिसेंबर २०२१ - १८० रुपये

.............

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी