शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

थंडीपाठोपाठ संक्रांतीची चाहूल लागली पण तिळाची लागेना; भावही वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 19:10 IST

Nagpur News संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्दे१८० रुपये किलो दराने होतेय विक्रीवर्तमानातील दर चढतीवर

नागपूर : मकर संक्रमण उत्सवाची नांदी लागताच ‘तिळगूळ खा गोड गोड बोला’च्या सरावास सुरुवात होतो. मात्र, यंदाच्या तिळगुडावर महागाईचा ठोसा पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत. सद्य:स्थितीत १८० रुपये किलोच्या आसपास तीळ विकले जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.८ हेक्टरने लागवड कमी

विदर्भात नागपूर जिल्ह्यात तीळ पीक घेतले जाते. इतर जिल्ह्यात हे पीक घेण्याचे प्रमाण नगण्य आहे. एका अर्थाने केवळ कौटुंबिक उपयोगासाठी म्हणून हे पीक इतर पिकांसोबत घेतले जाते. नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ७२ हेक्टरवर तीळ पीक घेतले गेले होते. यंदा मात्र पीक क्षेत्र २०.८ हेक्टरने घटले असून केवळ ५१.२ हेक्टर जमिनीवरच तिळाचे पीक घेतले गेले आहे. त्याचाही परिणाम यंदा तिळाचे दर वाढण्याला कारणीभूत ठरणार आहे.

नागपूर जिल्ह्यात मिश्र पीक म्हणून घेतले जाते तीळ

तिळाच्या उत्पादनात राजस्थान देशात क्रमांक १चे राज्य आहे. महाराष्ट्रातही हे पीक घेतले जाते. खरीप व रब्बी हंगामात हे पीक घेण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तीळ हे मिश्र पीक अर्थात इतर पिकांच्या संगतीला धुऱ्यावर किंवा एखाद्या बांदीमध्ये हे पीक घेतले जाते. नागपूर जिल्ह्यातही तिळाच्या बाबतीत मिश्र पिकाचीच संकल्पना राबविली जाते. सलग पीक कुठेही घेतले जात नाही.

लाल व पांढरे तीळ

लाल, पांढरा व काळा असे तिळाचे पीक असते. नागपूर जिल्ह्यात लाल व पांढरा पीक घेतले जात असून, पांढरा तिळाच्या लागवडीचे प्रमाण अधिक आहे. नागपुरात खरीप हंगामात म्हणजेच जून-जुलैमध्ये हे पीक पेरले जाते आणि डिसेंबरमध्ये कापणी केली जाते. रब्बी अर्थात उन्हाळ्यात हे पीक नागपुरात घेण्याची परंपरा नाही.

मध्यप्रदेश, बुलढाणा येथून आवक

नागपुरात व विदर्भातील इतर जिल्ह्यात बुलढाणा व मध्यप्रदेशातून तिळाची आवक होते. राजस्थानमधूनही तिळाची तूट भरून काढण्याचे प्रयत्न केले जाते. एका अर्थाने नागपूर व विदर्भ पूर्णत: तिळाच्या आयातीवरच निर्भर असल्याचे स्पष्ट होते.

तिळाचे दर बहुदा स्थिरच

तिळाचे दर बहुतांश करून स्थिरच असतात. खरीप लागवडीनंतर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने तिळाचे दर कमी होतात. त्यानंतर दरामध्ये स्थैर्य असते. रबी हंगामाच्या लागवडीनंतर मार्च-एप्रिलमध्ये तिळाची आवक होत असल्याने दरामध्ये फारसा फरक पडत नाही. नागपूरच्या बाजारात सद्य:स्थितीत तिळाचे दर प्रतिकिलोला १८० रुपये आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० ते ५० रुपयांनी अधिक आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढल्यावर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मागणीही मोठी असल्याने दर कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. तिसऱ्या आठवड्यापासून मात्र त्यात घसरण होण्याची शक्यता आहे.

तिळाचे दर (प्रतिकिलो)

२०२० - १०० ते ११० रुपये

नोव्हेंबर २०२१ - १६५ ते १७० रुपये

डिसेंबर २०२१ - १८० रुपये

.............

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी