शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अमेरिकेने टाळ्या वाजविल्यावर भारताने विवेकांनद स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:33 IST

भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देमुकुल कानिटकर : नागपुरातील खासदार महोत्सवात ‘स्वामी विवेकांनद’ विषयावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतावर कायम पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे. हेच कारण आहे की स्वामी विवेकांनद या भारतीय प्रज्ञावंतालाही भारताने तेव्हाच स्वीकारले जेव्हा अमेरिकेने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या विद्वतेचा सन्मान केला, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. खासदार महोत्सवात शुक्रवारी युवादिनी आयोजित ‘स्वामी विवेकांनद’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. कानिटकर पुढे म्हणाले, शिकागोच्या सर्वधर्म सभेत स्वामी विवेकानंदानी पहिल्यांदा बंधू-भगिनींनो म्हटले म्हणून त्यांचे भाषण गाजले असे सांगितले जाते. परंतु ते खोटे आहे. विवेकानंदाच्याही बºयाच आधी तीन व्यक्तींनी बंधू-भगिनींनो उच्चारले होते. शिकागोची ती सभा विवेकानंदांनी जिंकली याचे कारण वेगळे होते. ते जेव्हा दीड महिन्याचा सागरी प्रवास करून अमेरिकेत पोहोचले तेव्हा चोराने त्यांची बॅग पळवली. पुढचे अनेक दिवस त्यांनी संन्यासाच्या एका कपड्यावर अमेरिकेत भिक्षा मागत दिवस काढले. परंतु या देशात इतकी उपेक्षा सहन करूनही जेव्हा त्यांनी शिकागोच्या सभेत अमेरिकावासीयांना बंधू-भगिनींनो संबोधले तेव्हा तेथील लोकांना त्यांच्या मनाचा मोठेपणा कळला आणि पुढे अवघी अमेरिका त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेली. विवेकानंदांनी जगाला विज्ञानवाद दिला. त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याही अनेक गोष्टी ते तर्काच्या कसोटीवर पडताळल्याशिवाय स्वीकारत नव्हते. यासाठी त्यांनी अनेकदा गुुरुंची परीक्षा घेतली. म्हणूनच आज १५० वर्षानंतरही समाज विवेकानंदांचे स्मरण करतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्याख्यानाच्या प्रारंभी खा. अजय संचेती, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, राजेश लोया, विजय सालंगकर, डॉ. उपेंद्र कोठेकर व कैलाश चुटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक