शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अखेर चित्रपटगृहाला तामिळ-तेलगु सिनेमाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 11:09 IST

Nagpur News cinema चित्रपटगृहांनी गुरुवारी नवा चित्रपट प्रदर्शित केला आहे. संसर्गाचा धोका ओसरत असल्याने प्रेक्षकही सिनेमागृहांकडे वळू लागतील, अशी आशा आहे.

ठळक मुद्देप्रेक्षक अजूनही लांबच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दीर्घकालीन टाळेबंदीनंतर सांस्कृतिक क्षेत्राला मिळालेल्या मोकळीकीनंतरही चित्रपटगृहांची स्थिती सुधारलेली नाही. प्रदर्शनासाठी सिनेमेच नसल्याने चित्रपटगृहांत शांतता अनुभवता येत आहे. ही शांतता भंग करण्याच्या हेतूने चित्रपटगृहांनी गुरुवारी नवा चित्रपट प्रदर्शित केला आहे. संसर्गाचा धोका ओसरत असल्याने प्रेक्षकही सिनेमागृहांकडे वळू लागतील, अशी आशा आहे.

मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी ५ नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक क्षेत्राला टाळेबंदीतून मुक्त केले. त्या आनुषंगाने टाळेबंदीत भरडले गेलेल्या चित्रपटगृहांना सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रदर्शनासाठी नवे सिनेमेच नसल्याने आणि प्रेक्षक येतील की नाही, ही शंका असल्याने जवळपास सर्वच निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांचे प्रदर्शन रोखून धरले आहे. त्यामुळे, मधल्या काळात ‘सुरज पे मंगल भारी’, ‘शकीला’ सारखे सिनेमे प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने पुन्हा एकदा चित्रपटगृहांवर अघोषित टाळेबंदी लागू झाली होती. मात्र, आता स्वत:च पुढाकार घेण्याच्या आनुषंगाने शहरातील चित्रपटगृहमालकांनी दक्षिणेतील चित्रपटांना प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिणेत तुफान गर्दी केलेला नवा कोरा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. शहरातील विविध सिनेमागृहांमध्ये ‘विजय मास्टर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकही यायला लागले आहेत. मात्र, ही गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

सध्या ट्रायलच म्हणूयात - प्रतीक मुणोत

अशा अवघडलेल्या काळात आम्हाला ट्रायल करण्याशिवाय पर्याय नाही. आज सिनेते प्रदर्शित करू तर उद्याची वाट मोकळी होणार आहे. त्याच आनुषंगाने दक्षिणेतील सिनेमाने शुभारंभ केला आहे. दुपारच्या शोला ३०-४० प्रेक्षक होते म्हणून शो चालविला. एक-दोन महिन्यांत स्थिती सुधारण्याची अपेक्षा असल्याची भावना पंचशील सिनेमाचे प्रतीक मुणोत यांनी सांगितले.

टॅग्स :cinemaसिनेमा