शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

घरचे साधे पाणी परवडले; पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:06 AM

- लॉकडाऊनचा परिणाम : शुद्धीकरणाचे प्रकल्प बंद नागपूर : उन्हाळ्यात लग्नकार्य असो वा कोणताही समारंभ किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जारमध्ये ...

- लॉकडाऊनचा परिणाम : शुद्धीकरणाचे प्रकल्प बंद

नागपूर : उन्हाळ्यात लग्नकार्य असो वा कोणताही समारंभ किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये जारमध्ये भरलेल्या शुद्ध पाण्याची विक्री वाढते. पण, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जारची विक्री मंदावली आहे. लॉकडाऊनमध्ये लग्नकार्य होत नसल्याने आणि प्रतिष्ठाने बंद असल्याने जारची विक्री जवळपास बंदच झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. पण, मालकांनी कोरोनाकाळात जार नको, घरचे पाणी पिण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांनी पाणी शुद्धीकरणाचे लहान-मोठे प्रकल्प बंद केले आहेत. त्यामुळे जारमध्ये भरलेल्या पाण्याची विक्री बंद झाली आहे. विक्रेत्यांनी सांगितले, दरवर्षी मार्च ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लग्नकार्य असल्याने जारची (एक जार १८ लिटर शुद्ध पाणी) सर्वाधिक विक्री होते. पण, यंदा लग्नकार्य २५ जणांच्या उपस्थितीत होत असल्याने जार बोलविण्याच्या भानगडीत कुणीही पडत नाही. नागपूर शहरात नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत जवळपास ५०० पेक्षा जास्त प्रकल्प आहेत. ८० ते ९० टक्के प्रकल्प सुरू आहेत. प्रत्येक प्रकल्पात दररोज २०० पेक्षा जास्त जारची निर्मिती होते. एका जारची किंमत २५ ते ३० रुपये असून, त्यानुसार उन्हाळ्यात दररोज ३० लाखांचा व्यवसाय होतो. त्या उद्योगावर अडीच ते ३ हजार जणांना रोजगार मिळतो. पण, सध्या हा व्यवसाय बंद असल्याने रोजगार बुडाला आहे. त्यामुळे प्रकल्पांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

सध्याच्या ट्रेंडनुसार नागपुरातील प्रत्येक प्रतिष्ठानमध्ये दररोज एक वा दोन जार मागविले जातात. शिवाय, लग्नकार्य आणि अन्य समारंभात मागणी वेगळी असते. त्यानुसार दररोज ६ ते ७ हजार जारची विक्री होते. पण, सध्या लग्नकार्याअभावी आणि प्रतिष्ठाने बंद असल्याने संपूर्ण व्यवसायच ठप्प झाला आहे. अनेकांनी लाखो रुपये कर्ज काढून प्रकल्प उभे केले आहेत. गेल्या वर्षी पाच ते सहा महिने आणि यंदा मार्चपासून विक्री बंद असल्याने कर्जाचा भरणा अनेकांना कठीण होत आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. बँक कर्ज भरण्यासाठी तगादा लावत आहे. अशा कठीण परिस्थितीतून या उद्योगाची वाटचाल सुरू आहे.

मनपाकडे १२७ प्रकल्पांची नोंद

मनपाने एक वर्षापासून जारमध्ये भरलेल्या पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पाची नोंदणी आणि मान्यता देणे बंद केले आहे. पण, त्यापूर्वी १२७ प्रकल्पांची नोंद आहे. याशिवाय शहरात अनेक अनोंदणीकृत प्रकल्प सुरू आहेत. बीआयएसने अधिसूचना काढून नियमबाह्य आणि नोंदणी नसलेल्या प्रकल्पांना बंद करण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्पासाठी बीआयएसने परवाना बंधनकारक केला आहे. बीआयएसने जवळपास २२ प्रकल्पांवर कारवाई केली आहे.

जारचे पाणी बंद

५ मार्चपासून दुकानाच्या अनियमित वेळा आणि १५ मार्चपासून प्रतिष्ठान बंद असल्याने जारचे पाणी बोलवित नाही. शिवाय, पुढेही दुकान कितीवेळ सुरू राहील, यावर अनिश्चितता असल्याने घरच्या पाण्यावर भर राहील.

अशोक आमधरे, ऑटोमोबाईल विक्रेते.

जारच्या पाण्याला नकार

लॉकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने जारचे पाणी बोलविण्याचा प्रश्न नाही. पूर्वी दुकानात दररोज दोन जार लागायचे. पण, आता बोलविणे बंद केले आहे. जारच्या पाण्याऐवजी घरचे पाणी केव्हाही चांगले आहे.

राकेश माटे, हार्डवेअर विक्रेते.

लॉकडाऊनमुळे बहुतांश प्रकल्प बंद

लॉकडाऊनचा फटका पाणी शुद्धीकरणाच्या प्रकल्पांना बसला आहे. निर्मिती बंद असल्याने जार विक्रीचा प्रश्नच नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा उन्हाळ्यात जार विक्री व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. प्रत्येकावर बँकांच्या कर्जाचा बोजा वाढला आहे. अनेकांचे हप्ते आणि प्रतिष्ठानाचे भाडे थकले आहे. काम करणाऱ्या युवकांचा रोजगार गेला आहे. कोरोना महामारीने सर्वांवर संकट आले आहे.

विमल अग्रवाल, संचालक, आरओ प्रकल्प.

शहरात जार निर्मितीचे प्रकल्प :

मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी विक्री - ६ ते ७ हजार जार

मार्च २०२० मध्ये दररोज होणारी विक्री - ४ ते ५ हजार

मार्च २०२१ मध्ये दररोज होणारी विक्री - ५०० ते ६००