शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 15:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यांनी आज आरोग्य उपसंचालकाच्या कार्यालयापुढे दिवसभर धरणे दिले.नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागात ७०० च्या वर एनआरएचएमचे कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे ...

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान(एनआरएचएम)कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले एनआरएचएमच्या कर्मचाºयांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. अनेक उपकेंद्राला गुरुवारी टाळे ठोकले होते. या कर्मचाऱ्यांनी आज आरोग्य उपसंचालकाच्या कार्यालयापुढे दिवसभर धरणे दिले.नागपूर जिल्ह्यात आरोग्य विभागात ७०० च्या वर एनआरएचएमचे कर्मचारी कार्यरत आहेत. एकीकडे आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील यंत्रणा सुरळीत सुरू आहे. सरकार आता ही यंत्रणासुद्धा बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी काही अटी आणि शर्ती शासनाने टाकल्या आहेत. या अटीनुसार या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन होणार असून, त्यांना मानांकन देण्यात येणार आहे. त्यातून वेतनवाढ होणार आहे. परंतु ही अट कर्मचाऱ्यांना जाचक वाटत आहे. यात कर्मचाऱ्यांना घरी बसण्याचीसुद्धा वेळ येणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांची सहा-सहा महिन्याची पुनर्नियुक्ती प्रक्रिया शासनाने राबविली आहे. यालाही कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर’लागू केले आहे. त्यानुसार त्यातही त्रुटी आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे. २००५ पासून एनआरएचएमच्या माध्यमातून हे कर्मचारी आरोग्य विभागात सेवा देत आहेत. बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यात ही यंत्रणा सक्षम ठरली आहे. लसीकरण, प्रसूती, ग्रामीण भागातील आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ही यंत्रणा प्रयत्नरत आहे.आरोग्य विभागातील रिक्त जागांची जबाबदारी या यंत्रणेने अतिशय सक्षमपणे सांभाळली आहे. परंतु शासनाने त्यांच्यावर लादलेल्या जाचक अटी व शर्तींच्या विरोधात हे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे. त्याचा परिणाम गुरुवारपासून ग्रामीण भागात दिसायला लागला आहे. आज बहुतांश उपकेंद्रे बंद होती. शासनाने या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर समायोजन करावे, समायोजन होईपर्यंत समान काम, समान वेतन द्यावे, अशा मागण्या या कर्मचाºयांच्या आहेत. एनआरएचएम अधिकारी-कर्मचारी महासंघ नागपूरचे अध्यक्ष नीलेश सोनवणे, उपाध्यक्ष रज्जू परिपगार, कांचन राऊत, उन्मेश कापसे, लता माहुरे, माला काकडे, मीना महाजन, रत्ना कांबळे यांच्या नेतृत्वात  आंदोलन करण्यात आले.हक्काच्या घरात आंदोलनाची परवानगी नाकारलीजि.प.च्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर आहे. परंतु यांना जि.प.मध्ये आंदोलन करण्याची परवानगी सीईओंनी नाकारली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यagitationआंदोलन