शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते : रमेश मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:19 IST

भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधिलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद असायाला हवा, असे मत ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’चे (बीएपीआयओ) अध्यक्ष व ‘जीएपीआयओ’चे जागतिक अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देरुग्ण-डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ‘रुग्णसेवा ही ईश्वरसेवा’असे संबोधले जाते. समाजात आजही डॉक्टरला देवमाणूस, देवदूत, ईश्वर अशी विशेषणे लावून त्यांची महती वर्णिली जाते. परंतु याउलट अमेरिका, इंग्लंड यासारख्या प्रगत देशात रुग्णालाच ‘ईश्वर’ समजले जाते. यामुळे डॉक्टर-रुग्ण या नात्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये संवादासोबतच संवेदनशीलता वाढण्याची आणि माणुसकीशी बांधिलकी मानून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचा आदर करण्याची मानसिकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी डॉक्टर व रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद असायाला हवा, असे मत ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’चे (बीएपीआयओ) अध्यक्ष व ‘जीएपीआयओ’चे जागतिक अध्यक्ष डॉ. रमेश मेहता यांनी येथे व्यक्त केले.‘ग्लोबल असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियन ओरिजीन’तर्फे (जीएपीआयओ) ‘अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस’, नागपूरच्यावतीने दहावी वार्षिक परिषद ‘गॅपीओ-२०२०’ चे आयोजन ३ ते ५ जानेवारी २०२० मध्ये नागपुरात करण्यात आले आहे. या परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ‘जीएपीआयओ’च्या ब्रिटन शाखेचे संचालक डॉ. अशोक खंडेलवाल, डॉ. उदय बोधनकर, डॉ. राजू खंडेलवाल, डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. शरद देशमुख, डॉ. प्रकाश खेतान, डॉ. हरीश वरभे आदी उपस्थित होते.रुग्णाशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यकडॉ. मेहता म्हणाले, साडेचार वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शरीरविज्ञानाच्या बारीकसारीक बाबींसोबतच डॉक्टरांना रुग्णांशी संवाद कसा साधायचा, याचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना रुजविण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.डॉक्टर-रुग्णांमध्ये विश्वास रुजविण्याची गरज : डॉ. खंडेलवालडॉ. अशोक खंडेलवाल म्हणाले, डॉक्टर आणि रुग्णाचा संबंध हा विश्वासावर आधारित आहे. हा विश्वास रुजविण्यासाठी दोघांमध्ये वेळेची गरज आहे. परंतु ही वेळच डॉक्टर आणि रुग्णांकडे नाही. त्यामुळे वादाला तोंड फुटते. यामागील कारणांचा शोध घेतला असता, अनेकदा रुग्णाला त्याच्यावर नेमके काय उपचार केले जात आहेत, त्याची माहिती मिळत नाही. डॉक्टर आपल्या रुग्णाला पाहत नाहीत, हा त्यांचा गैरसमज संवादातून दूर करता येतो. पण डॉक्टरांना प्रत्येक रुग्णासोबत आणि त्याच्या नातेवाईकांसोबत संवादासाठी वेळ देणे दुरापास्त होते. यामुळे यातून मार्ग काढणे म्हणजेच दोघांमध्ये संवाद घडवून आणणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर