शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

प्रौढ मतिमंद, दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:44 IST

१२३ अंध, मतिमंद, दिव्यांग व बेवारस मुलामुलींचे पालकत्त्व स्वीकारून त्यांच्या आजीवन पुनर्वसनासाठी झटणाऱ्या वझरच्या शंकरबाबा पापळकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. संत गाडगेबाबांनी दिलेली घोंगडी खांद्यावर घेत, सर्वांना प्रेमभावाने अभिवादन करीत कपड्यांचीही तमा न बाळगता केवळ कामात रमणाऱ्या या अवलियाला मुलाखतीचा शिष्टाचार कसा कळणार ? मुलाखतकारांनी एक प्रश्न विचारल्यावर दुसऱ्या प्रश्नाची वाट न पाहता भावविभोर झालेल्या बाबांनी भडाभडा मनातील भावना बोलल्या. सत्काराने मी आनंदी आहे. मात्र अशा कार्यक्रमातून माणसे घडली पाहिजेत. अनाथ बालकांना १८ वर्षानंतर संस्थांमध्ये ठेवता येत नाही. मग ही मतिमंद, अंध, अनाथ मुले कुठे जातील? त्यामुळे १८ वर्षावरील अनाथांच्या आजीवन पुनर्वसनाचा कायदा सरकारने करावा, यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनिक साद घातली.

ठळक मुद्देशंकरबाबा पापळकर यांची भावनिक साद : ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १२३ अंध, मतिमंद, दिव्यांग व बेवारस मुलामुलींचे पालकत्त्व स्वीकारून त्यांच्या आजीवन पुनर्वसनासाठी झटणाऱ्या वझरच्या शंकरबाबा पापळकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. संत गाडगेबाबांनी दिलेली घोंगडी खांद्यावर घेत, सर्वांना प्रेमभावाने अभिवादन करीत कपड्यांचीही तमा न बाळगता केवळ कामात रमणाऱ्या या अवलियाला मुलाखतीचा शिष्टाचार कसा कळणार ? मुलाखतकारांनी एक प्रश्न विचारल्यावर दुसऱ्या प्रश्नाची वाट न पाहता भावविभोर झालेल्या बाबांनी भडाभडा मनातील भावना बोलल्या. सत्काराने मी आनंदी आहे. मात्र अशा कार्यक्रमातून माणसे घडली पाहिजेत. अनाथ बालकांना १८ वर्षानंतर संस्थांमध्ये ठेवता येत नाही. मग ही मतिमंद, अंध, अनाथ मुले कुठे जातील? त्यामुळे १८ वर्षावरील अनाथांच्या आजीवन पुनर्वसनाचा कायदा सरकारने करावा, यासाठी सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशी भावनिक साद घातली.ग्रामायण प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते व विचारवंत मा. गो. वैद्य यांच्या हस्ते बुधवारी शंकरबाबा पापळकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शंकरबाबांनी आपल्या संस्थेचे कार्य पाहणारा मानसपुत्र विदुर याच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. मी धोब्याचा मुलगा. आईवडिलांसह मीही कपडे धुण्याचे काम केले, गरिबीत राहिलो. मतिमंद मुलांची व्यथा पाहून यासाठी कार्य करण्याचा निर्धार केला. या कार्यात बहुतेकांचे प्रेम मिळाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.देशात १८ वर्षावरील १ लाखाच्यावर अनाथ मुलेमुली अनाथालयातून बाहेर पडतात. ते पुढे कोणत्या अवस्थेत जगतात, याची जाणीव सरकारला व समाजाला नाही. त्यामुळे सरकारने आजीवन पुनर्वसनाचा कायदा करावा. यासाठी त्यांच्या व अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे एक लाख स्वाक्षऱ्यांची मोहीम राबविली होती. या स्वाक्षऱ्यांचे फार्म बाबांनी ग्रामायण प्रतिष्ठानकडे सोपविले. सरकार अशा मुलांसाठी योजना चालविते, कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. सरकारने अशा मुलांना आधार कार्ड, मतदानकार्ड द्यावा व त्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करावा, असे आवाहन त्यांनी केले. बाबांच्या मुलाखत मंजुषा व चंद्रकांत यांनी घेतली.याप्रसंगी मंचावर मा.गो. वैद्य यांच्या पत्नी सुनंदा वैद्य, व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक श्रीकांत चेंडगे, आशुतोष देशपांडे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यात अनाथ, अंध, अपंग, मूकबधिर व मतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या पाच संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जयश्री वटे व श्रीकांत गाडगे यांनी केले. प्रास्ताविक ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी केले. सचिव संजय सराफ यांनी आभार मानले.शंकरबाबांसारख्यांमुळेच ‘मेरा देश महान’ : वैद्य‘सौ मेसे ९९ बेईमान फिर भी मेरा देश महान’ असे उपहासाने म्हटले जाते. मात्र ज्या एक टक्क्यांमुळे हा देश महान आहे, त्यामध्ये शंकरबाबांसारखे लोक मोडतात, असे मनोगत मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले. ते नेहमी प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले. अशा योग्य माणसाचा सत्कार केल्याबद्दल ग्रामायण संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले. हा स्वत:च्या मृत्यूची तयारी करणारा व मृत्यूचेही स्वागत करणारा विलक्षण माणूस आहे. आपल्या देशाला मोठे करणारी अशी माणसे आहेत. त्यांची ओळख नाही, परिचय नाही, असे सांगत त्यांनी काही आठवणी नमूद केल्या. शंकरबाबांनी वझरच्या उजाड टेकडीवर झाडांची हिरवाई आणि अनाथ मुलांचे नंदनवन फुलविले आहे. त्यामुळे एकदातरी वझरला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Shankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकरnagpurनागपूर