शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त

By निशांत वानखेडे | Updated: October 10, 2023 17:50 IST

दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  

नागपूर : दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  अशा एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या ७ व्या फेरीपासून सुरू करण्यात आली आहे. ही अंतिम फेरी आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्या आटोपल्या आहेत. 

अंतिम फेरी ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेशाचा भाग-२ म्हणजे महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरून लॉक करायचा आहे. भाग १ भरताना विद्यार्थ्यांनी सहा विषयाच्या ६०० पैकी मिळालेले गुण नोंदवायचे आहेत. याशिवाय आधी कॉलेज मिळाल्यानंतरही प्रवेश न केल्याने प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजतापर्यंत भाग २ भरून अर्ज लॉक करायचा आहे. १४ ऑक्टोबर  रोजी प्रवेश यादी तयार करून १६ ऑक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचे आहेत.

दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या सहाव्या फेरीनंतर ५४,५६० जागांपैकी ३२,११९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २२,४४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या जवळपास ७० टक्के, वाणिज्य शाखेच्या ६० टक्के तर विज्ञान शाखेच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत.

कोणत्या शाखेच्या किती रिक्त?

  • शाखा       एकूण जागा         प्रवेश         रिक्त
  • कला         ८२००             ३३८२        ४८१८
  • वाणिज्य     १६०४०            ७८११        ८२२९
  • विज्ञान       २७०३०           १९७२२       ७३०८
  • एमसीव्हीसी  ३२९०             १२०४        २०८६ 
टॅग्स :nagpurनागपूरssc examदहावी