शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त

By निशांत वानखेडे | Updated: October 10, 2023 17:50 IST

दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  

नागपूर : दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  अशा एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या ७ व्या फेरीपासून सुरू करण्यात आली आहे. ही अंतिम फेरी आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्या आटोपल्या आहेत. 

अंतिम फेरी ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेशाचा भाग-२ म्हणजे महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरून लॉक करायचा आहे. भाग १ भरताना विद्यार्थ्यांनी सहा विषयाच्या ६०० पैकी मिळालेले गुण नोंदवायचे आहेत. याशिवाय आधी कॉलेज मिळाल्यानंतरही प्रवेश न केल्याने प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजतापर्यंत भाग २ भरून अर्ज लॉक करायचा आहे. १४ ऑक्टोबर  रोजी प्रवेश यादी तयार करून १६ ऑक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचे आहेत.

दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या सहाव्या फेरीनंतर ५४,५६० जागांपैकी ३२,११९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २२,४४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या जवळपास ७० टक्के, वाणिज्य शाखेच्या ६० टक्के तर विज्ञान शाखेच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत.

कोणत्या शाखेच्या किती रिक्त?

  • शाखा       एकूण जागा         प्रवेश         रिक्त
  • कला         ८२००             ३३८२        ४८१८
  • वाणिज्य     १६०४०            ७८११        ८२२९
  • विज्ञान       २७०३०           १९७२२       ७३०८
  • एमसीव्हीसी  ३२९०             १२०४        २०८६ 
टॅग्स :nagpurनागपूरssc examदहावी