शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त

By निशांत वानखेडे | Updated: October 10, 2023 17:50 IST

दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  

नागपूर : दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.  अशा एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीच्या ७ व्या फेरीपासून सुरू करण्यात आली आहे. ही अंतिम फेरी आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश समितीतर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्या आटोपल्या आहेत. 

अंतिम फेरी ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांनी नोंदणी करून प्रवेशाचा भाग-२ म्हणजे महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरून लॉक करायचा आहे. भाग १ भरताना विद्यार्थ्यांनी सहा विषयाच्या ६०० पैकी मिळालेले गुण नोंदवायचे आहेत. याशिवाय आधी कॉलेज मिळाल्यानंतरही प्रवेश न केल्याने प्रतिबंधित केलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी १३ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजतापर्यंत भाग २ भरून अर्ज लॉक करायचा आहे. १४ ऑक्टोबर  रोजी प्रवेश यादी तयार करून १६ ऑक्टोबरला संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचे आहेत.

दरम्यान प्रवेश प्रक्रियेच्या सहाव्या फेरीनंतर ५४,५६० जागांपैकी ३२,११९ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. अद्यापही २२,४४१ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या जवळपास ७० टक्के, वाणिज्य शाखेच्या ६० टक्के तर विज्ञान शाखेच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत.

कोणत्या शाखेच्या किती रिक्त?

  • शाखा       एकूण जागा         प्रवेश         रिक्त
  • कला         ८२००             ३३८२        ४८१८
  • वाणिज्य     १६०४०            ७८११        ८२२९
  • विज्ञान       २७०३०           १९७२२       ७३०८
  • एमसीव्हीसी  ३२९०             १२०४        २०८६ 
टॅग्स :nagpurनागपूरssc examदहावी