शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कौतुकास्पद; वाकडे हातपाय, व्यंगत्व दूर करत दिली आयुष्याला उमेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 07:30 IST

Nagpur News निराश जीवांच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरण्याचे कार्य नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान करीत आहे. या संस्थेने दुर्गम व गावखेड्यातील ३५०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे अपंगत्व दूर केले आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांत ३५०० बालकांचे अपंगत्व केले दूरनागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठानचे सेवाकार्य

सुमेध वाघमारे

नागपूर : जन्मत: पाय वाकडे असलेल्या लहान मुलांना नीट चालता येत नाही, तर हात वाकडे असलेल्या मुलांना साधी वस्तूही पकडता येत नाही. जेवणासाठीसुद्धा दुसऱ्यावर विसंबून रहावे लागते. अशा निराश जीवांच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरण्याचे कार्य नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान करीत आहे. या संस्थेने दुर्गम व गावखेड्यातील ३५०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे अपंगत्व दूर केले आहे. अपंगत्वामुळे हरविलेला आत्मश्विास त्यांना पुन्हा मिळवून दिला आहे. (Admirable; The crooked limbs, the disfigurement gave life hope)

मागासलेल्या व दुर्गम भागातील लहान मुलांमध्ये ही नवी ऊर्जा पेरण्याचे काम ही संस्था सलग १५ वर्षांपासून करीत आहे. गरीब व गरजू मुले जी न्यूरॉलॉजीकल कमकुवत व अस्थिव्यंगाच्या व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया, औषधोपचार व फिजिओथेरपी देऊन त्यांचे अपंगत्व दूर करणे व त्यांनी कोणावरही अवलंबून न राहता इतर सामान्य मुलांसारखे जीवन जगण्यासाठी समर्थ करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या कार्याची सुरूवात २००६ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातून झाली. त्यानंतर या कार्याची व्याप्ती महाराष्ट्रातील भंडारा, अमरावती, गोंदिया व नागपूर जिल्ह्यापर्यंत वाढविण्यात आली. आता या सेवाकार्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, छत्तीसगड व ओडिशा या राज्यातील गरजू लोकापर्यंत वाढविण्यात आला आहे.

-मुलांमधील हातपायाचा व्यंगापासून ते मानेचा तिरळेपणावर शस्त्रक्रिया

या संस्थेचे संचालक व लहान मुलांचे आर्थाेपेडीक सर्जन डॉ. विरज शिंगाडे म्हणाले, दुर्गम व गावखेड्यामधील सेरेब्रल पाल्सी व गतिमंद, क्लब फूट, कमी उंची, जळल्यामुळे आलेले हातपायाचे व्यंग, पाचपेक्षा जास्त बोटे, जन्मत: असलेले अस्थिव्यंग, हाडांचे इन्फेक्शन, मानेचा तिरळेपणा, हात पाय वाकडे, लहान हातपाय लहान, लंगडत चालणे, हिप जॉइंटचे डिसलोकेशन आदी आजारांच्या मुलांवर संस्थेच्यावतीने मोफत परंतु कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

-मुलांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची मदत

डॉ. शिंगाडे म्हणाले, शस्त्रक्रियेची गरज असलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी नागपुरातील ‘चिल्ड्रेन आर्थाेपेडीक केअर इन्स्टिट्यूट’चे एक पथक दुर्गम भागातील शाळांना भेटी देते. शिक्षकांच्या मदतीने शिबिर घेऊन मुलांची तपासणी करतात. ज्या मुलांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशा मुलांना नागपुरातील ‘चिल्ड्रेन आर्थाेपेडीक केअर इन्स्टिट्यूट’मध्ये आणून शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यांच्यासोबत येणाऱ्या पालकांची राहण्याची सोय व जेवणाचा खर्चही नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने केला जातो.

-१५ वर्षांपासून अखंडित सेवा

दानदात्यांच्या माध्यमातून हे सेवाकार्य गेल्या १५ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. कोरोनामुळे मागील वर्षी यात खंड पडला होता. परंतु आता पुन्हा ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्याने या उपक्रमाचे पुन्हा नियोजन केले जात आहे. उत्तमराव शिंगाडे व रत्नादेवी शिगांडे यांंच्या कल्पनेतील या सेवाकार्याला वास्तविकतेचे स्वरुप डॉ. विरज शिंगाडे यांनी दिले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य