शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नागपूर मनपा स्थायी समितीला प्रशासन जुमानेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:34 IST

महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापौर व स्थायी समितीला विशेष अधिकार आहेत. प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाची ठराविक कालावधीत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. गेल्या चार महिन्यात स्थायी समितीने शहरातील विकास कामांना मंजुरी देण्यासोबत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. परंतु प्रशासनाने याची अंमलजवणी केली नाही. एवढेच नव्हे तर ८ आॅगस्टच्या समितीच्या बैठकीत याबाबतचा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने स्थायी समितीकडे अद्याप कृती अहवाल पाठविलेला नाही. यावरून प्रशासन स्थायी समितीला जुमानत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनिर्देशानंतरही माहिती उपलब्ध होईना : पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार महापौर व स्थायी समितीला विशेष अधिकार आहेत. प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाची ठराविक कालावधीत अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. गेल्या चार महिन्यात स्थायी समितीने शहरातील विकास कामांना मंजुरी देण्यासोबत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. परंतु प्रशासनाने याची अंमलजवणी केली नाही. एवढेच नव्हे तर ८ आॅगस्टच्या समितीच्या बैठकीत याबाबतचा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने स्थायी समितीकडे अद्याप कृती अहवाल पाठविलेला नाही. यावरून प्रशासन स्थायी समितीला जुमानत नसल्याचे चित्र आहे.एप्रिल ते जुलै या कालावधीत स्थायी समितीच्या बैठकीत प्रभागातील विकास कामांना मंजुरी देण्यात आली. एवढेच नव्हे तर समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्र दिल्यानंतरही नगरसेवकांच्या फाईल प्रशासनाकडून मंजूर होत नसल्याच्या नगरसेवकांनी तक्रारी केल्या. त्यानतंर विद्यमान स्थायी समितीच्या आजवरच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली की नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश वीरेंद्र कुकरेजा यांनी ८ आॅगस्टला समितीच्या बैठकीत दिले. त्यानतंरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. यावरून प्रशासन स्थायी समितीला जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेत महापौर पद सर्वोच्च मानले जाते. त्यानंतर स्थायी समितीचे स्थान आहे. परंतु समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. एवढेच नव्हे तर याबाबतचा अहवालही प्रशासनाकडून सादर क रण्यात आलेला नाही. वास्तविक महापालिका कायद्यातील कलम ७३(ड) अन्वये २५ लाखापेक्षा कमी रकमेच्या निविदा मंजुरीनंतरच्या संविदा प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर १५ दिवसात ठेवणे आवश्यक आहे. परंतु आजवर एकही संविदा समितीच्या पटलावर ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता स्थायी समिती यासंदर्भात काय भूमिका घेणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.धोरणात्मक निर्णयाचीही अंमलजावणी नाहीमहापौर वा स्थायी समितीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची महापालिका प्रशासनाने दीड महिन्यात अंमलजवाणी करणे अपेक्षित आहे. मात्र महापौर वा स्थायी समितीने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार नियमानुसार चालतो की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. अधिकारीच स्थायी समितीच्या निर्देशांचे पालन करीत नसतील तर नगरसेवकांच्या फाईलचा निपटारा कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.स्थायी समितीत पुन्हा प्रस्ताव८ आॅगस्टच्या बैठकीत निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने समितीला अहवाल पाठविलेला नाही. त्यामुळे शुक्रवारी होणाºया समितीच्या बैठकीत पुन्हा हाच विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. त्यानंतरही प्रशासनाने निर्देशाचे पालन न केल्यास ५ सप्टेंबरला सभागृहात यावरून वादळ उठण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर