शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘डीबीटी’तून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:21 IST

शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी थेट लाभ हस्तांतरण ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने ही डीबीटी त्वरित रद्द करावी अशी मागणी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी केली. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात बिरसा मुंडा यांची वेशभूषा करून विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे दिले.

ठळक मुद्देमनसेचे आमदार शरद सोनवणे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणासाठी थेट लाभ हस्तांतरण ‘डीबीटी’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने ही डीबीटी त्वरित रद्द करावी अशी मागणी मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनी केली. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात बिरसा मुंडा यांची वेशभूषा करून विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे दिले. राज्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचे वसतिगृहातील जेवण बंद करून सरकारने त्यांच्या खात्यात ३५०० रुपये जमा करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी पुण्यापासून ते नाशिकपर्यंत शांततेने पदयात्रा काढून आपल्या मागण्या आदिवासी कल्याण आयुक्तांपर्यंत पोचवण्यासंदर्भात नियोजन केले होते. पुण्यापासून सिन्नरपर्यंत हा मोर्चा अगदी शांततेत सुरू होता परंतु नांदूरला अचानक सिन्नर तालुक्यामध्ये ४०० विद्यार्थ्यांना ६०० पोलिसांनी घेराव घातला आणि त्याठिकाणी त्यांना थांबवण्यात आले. पोलीस गाड्यांमध्ये टाकून त्यांना पुण्याला हेडक्वार्टरला नेण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत घडलेला हा प्रकार कदापि खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशाराही सोनवणे यांनी सरकारला दिला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८agitationआंदोलन