शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य राज कपूर; बाईकवरून जगभ्रमणाचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 10:25 IST

आदित्य राज कपूर. ३१० दिवसांपूर्वी ते बाईकवर जग भ्रमणासाठी निघाले. म्यानमारवरून ते कोलकाता अन् कोलकातावरून ते रायपूर मार्गाने नागपुरात पोहोचले.

ठळक मुद्देमानवतेचा शोध घेताना पूर्ण केल्या बालपणीच्या इच्छा३५ हजार किलोमीटरचा प्रवास करून आदित्य राज कपूर पोहोचले नागपुरात

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदित्य राज कपूर. वय ६१ वर्षे. हे अनेकांना नवे असलेले नाव आहे. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना मात्र सर्वच वयोगटातील नागरिक ओळखतात. ते दिवंगत चित्रपट अभिनेता शम्मी कपूर व अभिनेत्री गीता बाली कपूर यांचे सुपुत्र आहेत. ३१० दिवसांपूर्वी ते बाईकवर जग भ्रमणासाठी निघाले. म्यानमारवरून ते कोलकाता अन् कोलकातावरून ते रायपूर मार्गाने नागपुरात पोहोचले. ‘लोकमत’शी चर्चा करताना त्यांनी प्रवासातील अनुभव सांगून जग भ्रमणाच्या आठवणी ताज्या केल्या. त्यांचे कपूर परिवारातील इतर सदस्यांप्रमाणे चित्रपट क्षेत्राशी दृढ नाते नाही. परंतु त्यांनी मिळविलेले स्थान जगभरातील युवकांसाठी दिशादर्शक आहे.लहानपणापासून जग भ्रमणाला जाण्याची त्यांची इच्छा होती. विविध देशात जाऊन तेथील नागरिक, संस्कृतीला जवळून पहावे असे त्यांना वाटत होते. केवळ १० वी पर्यंत शिक्षण घेतलेले आदित्य राज कपूर यांनी १६ व्या वर्षातच काम करणे सुरू केले होते. त्यांनी आर. के. स्टुडिओत असिस्टंट डायरेक्टरच्या रुपाने करिअरची सुरुवात केली. दरम्यान बॉबी, धरम-करम आणि सत्यम शिवम सुंदरम सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या निर्देशनात दिवंगत अभिनेता, निर्माता, निर्देशक राज कपूर यांना मदत केली. एके दिवशी भोले बाबा (कौटुंबिक गुरु) घरी आले. त्यांनी हे काम तुमच्या योग्य नसून या कामाऐवजी दुसरे काम करण्याची सूचना केली. बाबांच्या सांगण्यानुसार चित्रपट क्षेत्र सोडून व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केले. अनेक कामे केली. चित्रपट तयार केले. चित्रपट, मालिकात काम केले. जीवनाच्या प्रवासात खूप काही बदलले होते. परंतु त्यांची जग भ्रमणाची इच्छा बदलली नव्हती. ६० वर्षे वयानंतर ते जग भ्रमणाची इच्छा पूर्ण करू इच्छित होते. ही इच्छा वेगळ्या अंदाजाने पूर्ण करण्याचे ठरविले. त्यांना बाईक चालविण्याचा छंद असल्यामुळे बाईकनेच जग भ्रमण करण्याचा विचार मनात आला. इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वर्षभर संशोधन केले. त्यानंतर ज्या देशात प्रवास करायचा त्याचा नकाशा तयार केला. यात सर्वात मोठे आव्हान निसर्गाचे होते. त्याकडे पाहून प्रवास करावयाच्या देशातील हवामानाची माहिती जाणून घेतली. खर्च, साहित्याबाबत धोरण ठरविले अन् रशियापासून प्रवासाला सुरुवात केली.

प्रवासात केली नाही घाईप्रवासात आदित्य राज कपूर यांनी कधीच घाई केली नाही. ते सकाळी ६.३० वाजता उठायचे. तयार होऊन १०.३० वाजता प्रवास सुरू करायचे. सायंकाळी ६ नंतर त्यांनी कधीच बाईक चालविली नाही. निर्मनुष्य रस्त्यावर बाईक चालविताना त्यांना प्रवास संपवून घरी जावे वाटायचे. घरची आठवण येत होती. परंतु प्रत्येक नवी सकाळ त्यांना प्रवास सुरू ठेवण्यासाठी प्रेरणा देत होती. त्यांनी प्रवासाबाबत प्रत्येक ठिकाणी कुटुंबीयांना माहिती दिली. याशिवाय वेबसाईटवरही प्रवासाची माहिती अपलोड केली.

मोठ्या शहरात गेलो नाहीआदित्य राज कपूर यांनी पार्किंगची, वाहतुकीची समस्या आणि राहण्याचा खर्च यामुळे मोठ्या शहरात जाण्याचे टाळल्याचे सांगितले. त्यांना मानव व मानवतेला पाहायचे होते. त्या देशाच्या संस्कृतीला जवळून जाणून घ्यायचे होते. जी शहरात आढळत नाही. प्रवासात स्थानिक नागरिकांची त्यांना साथ मिळाली. प्रवासात सर्वजण मदतीसाठी सरसावल्याचे त्यांनी सांगितले. प्रवास आकर्षक ठरला असून त्याच्या आठवणी डायरीत लिहून ठेवल्या आहेत. रशियात एका धाब्यावर भारतीय पदार्थाची आठवण आदी आठवणी त्यांनी संग्रहित करून ठेवल्या आहेत. त्यांना भाषेच्या समस्याचा सामना करावा लागला. त्यांनी काही देशातील शब्द वाचले होते. त्या प्रयत्नात त्यांना रशियन भाषा आली.

टॅग्स :tourismपर्यटन