शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 21:41 IST

कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

ठळक मुद्देवर्षभर पावसाची हजेरी फळाला, टँकरनेही पुरवठा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रकोपाने इतर गोष्टींचा उल्लेख गौण ठरला असला तरी नैसर्गिक घटकांच्या बदलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मे महिना सुरू झाला आणि उन्हाचा प्रकोप आता तीव्रतेने जाणवायला लागला आहे. अशावेळी वन्यजीवांसाठी जंगलात पाण्याची उपलब्धता कमी झालेली असते. मात्र जंगलातील पाणवठ्यावर पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. यावर्षी पावसाने वर्षभर मेहेरबानी केली असल्याने नैसर्गिक आणि कृ त्रिम पाणवठे फुल्ल असून प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.उन्हाळा आला की पाणीप्रश्न पेटतो. मानवाला जसा पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तसा तो वन्यजीवांच्या वाट्यालाही असतोच. आकाशात सूर्य आग ओकत असताना जंगलात पाणवठे कोरडे पडले असतात. अशावेळी प्राण्यांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. दरवर्षी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात आणि मानव- वन्यजीव संघर्ष निर्माण होतो. अनेक प्राणी पाण्याच्या शोधात विहिरी किंवा तलावात पडल्याच्या घटना समोर येतात. वनविभागाला टँकरद्वारे दरवर्षी जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकावे लागते. काही स्वयंसेवी संस्थाही या कामात विभागाची मदत करतात. यावर्षी मात्र अशी भीषण पाणीटंचाई दिसून येत नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वर्षभर झालेली वरुणराजाची हजेरी लाभदायक ठरली आहे.पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले, वनविभागाला दरवर्षी जंगलात पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करावे लागते. त्यानुसार कृ त्रिम पणावठ्यांची निर्मिती केली आहे. पेंच प्रकल्पात ११४ नैसर्गिक, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणारे १४५ कृ त्रिम आणि सौरऊर्जेवर चालणारे ६४ पाणवठे आहेत. बोर अभयारण्यात ३२ नैसर्गिक, ८२ कृ त्रिम व ४६ सौर पंप आहेत. दुसरीकडे टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यात २८ नैसर्गिक, १४ कृ त्रिम आणि ५० सौर पंप आहेत. या पाणवठ्यांवर पुरेसा पाणीसाठा असून सध्यातरी कमतरता नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातही पाणवठ्यावर मुबलक पाणीसाठा असून टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज पडली नाही. गरज पडल्यास तसे करण्यात येईल, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात असल्याचा विश्वास स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला.वणवे आणि नियंत्रणाकडे लक्षउन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जंगलसफारीकडे लोकांचा कल वाढतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे वन्य पर्यटन बंद असल्याने पर्यटकांची व्यवस्था करण्याचा कर्मचाऱ्यांचा ताण कमी झाला आहे. मात्र उन्हाळ्यात जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वणवे नियंत्रित करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांकडे कायम आहे. याशिवाय तस्करी रोखण्यासाठी गस्तही वाढविण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :forestजंगलWaterपाणी