शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीशी प्रामाणिक असलेला कलावंत सोडून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 20:05 IST

रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीतरी चित्रपटातील मोठा कलावंत नाही तर आपला कलावंत वाटायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुणीतरी आपला माणूस हरविल्यागत शोकमय भावना झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे. आपला अहंकार, आपले व्यसन रंगभूमीपासून दूर ठेवून जगणारा रंगभूमीचा प्रामाणिक कलावंत हरविल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरमेश भाटकर यांच्या आठवणी : झाडीपट्टीच्या कलावंतांचा शोक अनावर

निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीतरी चित्रपटातील मोठा कलावंत नाही तर आपला कलावंत वाटायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुणीतरी आपला माणूस हरविल्यागत शोकमय भावना झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे. आपला अहंकार, आपले व्यसन रंगभूमीपासून दूर ठेवून जगणारा रंगभूमीचा प्रामाणिक कलावंत हरविल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.झाडीपट्टीची रंगभूमी दिवाळीपासून सुरू होते आणि साधारणत: मार्चच्या अखेरपर्यंत चालते. या काळात या नाटकांच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होते. या भागातील प्रेक्षकांना मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांची मोठी आवड. त्यावेळी रमेश भाटकर हे मराठी चित्रपट आणि मालिकांच्या सृष्टीचे मोठे नाव होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये आकर्षण होतेच. हे आकर्षण लक्षात घेता २००९ मध्ये जयदुर्गा रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांचे झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये आगमन झाले. एक दोन नाटकांचे प्रयोग नव्हे तर संपूर्ण सिझन भाटकर यांनी नाटकांचे प्रयोग केले. पुढे दुसऱ्या वर्षी साई रंगभूमी आणि त्यानंतरचे दोन वर्ष त्यांनी श्री चक्रधर रंगभूमी संस्थेसोबत काम केले. श्री चक्रधर संस्थेचे यशवंत ढोरे आणि प्रल्हाद मेश्राम यांनी सांगितले की २०११-१२ या काळात त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर ४३ नाटकांचे प्रयोग केले. तीन वर्षात दीडशेच्या आसपास त्यांनी या भागात सातत्याने प्रयोग केले होते.त्यांनी सांगितले, चित्रपटसृष्टीचा मोठा कलावंत म्हणून ते कधीच वावरले नाहीत. सर्वांसोबत मिसळायचे आणि हसतमुख होते. यावेळी ते आपलाच झाडीपट्टीतला कलावंत आहेत असेच वाटायचे. मात्र एकदा मंचावर चढले की पात्रात घुसून जायचे. या काळात शेतकरी आत्महत्येवर आधारित ‘छळ, उद्ध्वस्त झाले घरटे सारे, हे चक्र जीवनाचे’ तर जयदुर्गा संस्थेसोबत ‘पैसा, पाझर’ आणि आक्रोश भारत मातेचा अशा कितीतरी नाटकांचे प्रयोग गावागावात केले. वेळेचे काटेकोर पालन करणारा हा कलावंत होता. सकाळी नाटकाची वेळ विचारायचे आणि वेळेच्या अर्धा तास आधी प्रयोगस्थळी पोहचत असत. एखादा कलावंत उशिरा आला की रमेश भाटकर त्याला झापणार हे निश्चित असायचे.एकदा रमेशजी यांच्याविषयीची भीती घालविण्यासाठी नाटकातील एक कलावंत दारू पिऊन आला तेव्हा त्याला प्रचंड रागविल्याची आणि नंतर समजाविल्याची आठवण ढोरे यांनी सांगितली.भाकरपार्टी खास आवडीचीया काळात त्यांचा मुक्काम वडसा येथील लॉजवर असायचा. मात्र ते लॉजवर थांबण्याऐवजी आमच्यासोबतच येऊन थांबायचे. नाटकाचा प्रयोग नसला की कुठेतरी शेतावर जाऊन भाकरपार्टी करणे त्यांना मनापासून आवडायचे. आम्हा सर्व कलावंतांना घेऊन ते कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळी जाऊन भाकरपार्टी करायचे. यावेळी लहानमोठे खर्च ते स्वत: करायचे. त्यामुळे आपला माणूस गेल्यासारखे वाटत असल्याचे आत्माराम खोब्रागडे यांनी सांगितले.अहंकार नसलेले उदार व्यक्तिमत्त्वझाडीपट्टीचे कलावंत चेतन राणे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. एकदा ‘झपाटलेला’ या नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना टपरीवरची भजी खाण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांनी आमच्यासोबत टपरीवर भजी खाल्ली. १५० रुपये झाले होते, तेव्हा ५०० ची नोट काढून दुकानदाराला दिली आणि भजी आवडली म्हणून बाकीचे पैसे ठेवून घेण्यास सांगितले. मोठे कलावंत असूनही अहंकार नसलेला हा उदार माणूस होता. झाडीपट्टीच्या प्रत्येक कलावंतांशी, तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्यांशीही ते मिसळून गेले होते. नाटकांमधूनच माझा उगम झाल्याचे ते नेहमी सांगायचे. आमचे नाटक प्रेक्षक म्हणून पाहायचे. त्यामुळे आपलाच माणूस असल्यासारखी जाणीव होत होती. आमचा माणूस सोडून गेल्यासारखे वाटत असल्याची भावना राणे यांनी व्यक्त केली. यावेळी नांदेडची अभिनेत्री सीमा कुळकर्णी यांनी, आमच्या चुका सांगणारा, अभिनयाचे बारकावे आणि मार्गदर्शन करणारा जवळचा माणूस हरविल्याची शोकमय भावना व्यक्त केली.

 

टॅग्स :Ramesh Bhatkarरमेश भाटकरNatakनाटक