शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

रंगभूमीशी प्रामाणिक असलेला कलावंत सोडून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 20:05 IST

रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीतरी चित्रपटातील मोठा कलावंत नाही तर आपला कलावंत वाटायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुणीतरी आपला माणूस हरविल्यागत शोकमय भावना झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे. आपला अहंकार, आपले व्यसन रंगभूमीपासून दूर ठेवून जगणारा रंगभूमीचा प्रामाणिक कलावंत हरविल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरमेश भाटकर यांच्या आठवणी : झाडीपट्टीच्या कलावंतांचा शोक अनावर

निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रमेश भाटकर मराठी चित्रपट व मालिकांच्या सृष्टीतील नावाजलेले कलावंत. पण झाडीपट्टीच्या नाटकासाठी आले की या मातब्बर कलावंतांचा मोठेपणा नाहिसा होऊन जायचा. ते त्या नाटकाशी आणि नाटकातील कलावंतांशी एकरूप होऊन जायचे. त्यामुळे झाडीपट्टीच्या माणसांनाही ते कुणीतरी चित्रपटातील मोठा कलावंत नाही तर आपला कलावंत वाटायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुणीतरी आपला माणूस हरविल्यागत शोकमय भावना झाडीपट्टीच्या कलावंतांमध्ये आहे. आपला अहंकार, आपले व्यसन रंगभूमीपासून दूर ठेवून जगणारा रंगभूमीचा प्रामाणिक कलावंत हरविल्याची भावना या कलावंतांनी व्यक्त केली.झाडीपट्टीची रंगभूमी दिवाळीपासून सुरू होते आणि साधारणत: मार्चच्या अखेरपर्यंत चालते. या काळात या नाटकांच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होते. या भागातील प्रेक्षकांना मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंतांची मोठी आवड. त्यावेळी रमेश भाटकर हे मराठी चित्रपट आणि मालिकांच्या सृष्टीचे मोठे नाव होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्याविषयी प्रेक्षकांमध्ये आकर्षण होतेच. हे आकर्षण लक्षात घेता २००९ मध्ये जयदुर्गा रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांचे झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये आगमन झाले. एक दोन नाटकांचे प्रयोग नव्हे तर संपूर्ण सिझन भाटकर यांनी नाटकांचे प्रयोग केले. पुढे दुसऱ्या वर्षी साई रंगभूमी आणि त्यानंतरचे दोन वर्ष त्यांनी श्री चक्रधर रंगभूमी संस्थेसोबत काम केले. श्री चक्रधर संस्थेचे यशवंत ढोरे आणि प्रल्हाद मेश्राम यांनी सांगितले की २०११-१२ या काळात त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीवर ४३ नाटकांचे प्रयोग केले. तीन वर्षात दीडशेच्या आसपास त्यांनी या भागात सातत्याने प्रयोग केले होते.त्यांनी सांगितले, चित्रपटसृष्टीचा मोठा कलावंत म्हणून ते कधीच वावरले नाहीत. सर्वांसोबत मिसळायचे आणि हसतमुख होते. यावेळी ते आपलाच झाडीपट्टीतला कलावंत आहेत असेच वाटायचे. मात्र एकदा मंचावर चढले की पात्रात घुसून जायचे. या काळात शेतकरी आत्महत्येवर आधारित ‘छळ, उद्ध्वस्त झाले घरटे सारे, हे चक्र जीवनाचे’ तर जयदुर्गा संस्थेसोबत ‘पैसा, पाझर’ आणि आक्रोश भारत मातेचा अशा कितीतरी नाटकांचे प्रयोग गावागावात केले. वेळेचे काटेकोर पालन करणारा हा कलावंत होता. सकाळी नाटकाची वेळ विचारायचे आणि वेळेच्या अर्धा तास आधी प्रयोगस्थळी पोहचत असत. एखादा कलावंत उशिरा आला की रमेश भाटकर त्याला झापणार हे निश्चित असायचे.एकदा रमेशजी यांच्याविषयीची भीती घालविण्यासाठी नाटकातील एक कलावंत दारू पिऊन आला तेव्हा त्याला प्रचंड रागविल्याची आणि नंतर समजाविल्याची आठवण ढोरे यांनी सांगितली.भाकरपार्टी खास आवडीचीया काळात त्यांचा मुक्काम वडसा येथील लॉजवर असायचा. मात्र ते लॉजवर थांबण्याऐवजी आमच्यासोबतच येऊन थांबायचे. नाटकाचा प्रयोग नसला की कुठेतरी शेतावर जाऊन भाकरपार्टी करणे त्यांना मनापासून आवडायचे. आम्हा सर्व कलावंतांना घेऊन ते कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळी जाऊन भाकरपार्टी करायचे. यावेळी लहानमोठे खर्च ते स्वत: करायचे. त्यामुळे आपला माणूस गेल्यासारखे वाटत असल्याचे आत्माराम खोब्रागडे यांनी सांगितले.अहंकार नसलेले उदार व्यक्तिमत्त्वझाडीपट्टीचे कलावंत चेतन राणे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. एकदा ‘झपाटलेला’ या नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना टपरीवरची भजी खाण्याची त्यांना इच्छा झाली. त्यांनी आमच्यासोबत टपरीवर भजी खाल्ली. १५० रुपये झाले होते, तेव्हा ५०० ची नोट काढून दुकानदाराला दिली आणि भजी आवडली म्हणून बाकीचे पैसे ठेवून घेण्यास सांगितले. मोठे कलावंत असूनही अहंकार नसलेला हा उदार माणूस होता. झाडीपट्टीच्या प्रत्येक कलावंतांशी, तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्यांशीही ते मिसळून गेले होते. नाटकांमधूनच माझा उगम झाल्याचे ते नेहमी सांगायचे. आमचे नाटक प्रेक्षक म्हणून पाहायचे. त्यामुळे आपलाच माणूस असल्यासारखी जाणीव होत होती. आमचा माणूस सोडून गेल्यासारखे वाटत असल्याची भावना राणे यांनी व्यक्त केली. यावेळी नांदेडची अभिनेत्री सीमा कुळकर्णी यांनी, आमच्या चुका सांगणारा, अभिनयाचे बारकावे आणि मार्गदर्शन करणारा जवळचा माणूस हरविल्याची शोकमय भावना व्यक्त केली.

 

टॅग्स :Ramesh Bhatkarरमेश भाटकरNatakनाटक