शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

फी दरवाढ केल्यास शाळांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:09 IST

फीच्या संदर्भातील पालकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सत्रातील फी जमा करण्यासंदर्भात तसेच नवीन सत्रात शाळांची फी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशात शाळांनी गेल्या सत्रातील उर्वरित फी जमा करण्याबाबत पालकांना सक्ती करू नये, तसेच नवीन सत्रात कुठलीही फी वाढ करू नये, अन्यथा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. एस. एन. पटवे यांनी सर्व बोर्डाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फीच्या संदर्भातील पालकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सत्रातील फी जमा करण्यासंदर्भात तसेच नवीन सत्रात शाळांची फी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशात शाळांनी गेल्या सत्रातील उर्वरित फी जमा करण्याबाबत पालकांना सक्ती करू नये, तसेच नवीन सत्रात कुठलीही फी वाढ करू नये, अन्यथा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. एस. एन. पटवे यांनी सर्व बोर्डाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले आहे. जिल्ह्यातील सीबीएसई, आयजीसीएसई, आयसीएसई, आयबी व राज्य मंडळाच्याविनाअनुदानित/कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा/महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र पाठविले आहे. २०१९-२० व २०२०-२१ या सत्रातील फी जमा करण्याचा कालावधी शाळांनी पालकांना वाढवून द्यावा तसेच हप्तेही वाढवून देण्यात यावेत. फी दरवाढीसंदर्भात पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये (ईपीटीए) ठराव करून त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी. लॉकडाऊनच्या काळात घेण्यात आलेल्या आॅनलाईन वर्गाची स्वतंत्र फी आकारण्यात येऊ नये, शिक्षक पालक संघटना (पीटीए) व फी नियामक कार्यकारी समितीची स्थापना पारदर्शक पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून शाळा सुरू झाल्यानंतर करावी. विद्यार्थ्यांकडून ट्युशन फी व टर्म फीव्यतिरिक्त कुठलीही फी आकारण्यात येऊ नये. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या सुविधांचा वापर झालेला नाही त्या सुविधांची फी आकारण्यात येऊ नये. तसेच शासन आदेशाशिवाय कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू करू नये. तसेच विद्यार्थी, पालकांना शाळेत बोलावण्यात येऊ नये या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अन्यथा साथरोग अधिनियम १८९७ चा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल. शासन आदेशाचे पालन न केल्यामुळे शाळा मान्यता काढण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल, असाही उल्लेख शिक्षणाधिकारी यांनी पत्रात केला आहे.

 शालेय साहित्याची विक्री करू नयेअनेक शाळा विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेतून पाठ्यपुस्तके, वह्या, शालेय गणवेश, बूट व इतर शैक्षणिक साहित्याची विक्री करीत असते. शाळांनी अशाप्रकारच्या कुठल्याही साहित्याची विक्री शाळेतून करू नये, असे स्पष्ट निर्देश डॉ. पटवे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर