शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर कृषी केंद्र चालकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:51 AM

bogus seeds खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देउगवणक्षमता तपासूनच करावी विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.

नुकताच कृषी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. बोगस बियाण्यांवर निर्बंध घालण्यासंदर्भात सदस्यांनी बैठकीत चर्चा केली. शेतकरी कृषी केंद्रावरून बियाण्यांची खरेदी करतात. या केंद्र चालकांना काही कंपन्या आमिष दाखवून बोगस बियाण्यांची विक्री करतात. परंतु शेतकऱ्यांनी बियाणे पेरल्यानंतर ते उगवतच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. त्याचा आगाऊचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व तक्रारी टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी आणि नंतरच विक्री करावी, असे विभागाला स्पष्ट बजावले आहे.

बैठकीत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती मोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी समन्वय साधून मार्गदर्शनाची मोहीम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.

 बेटारायझम बुरशी धान उत्पादक शेतकऱ्यांना पुरवावी

खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत वैद्य म्हणाले, धानपिकावर तुडतुड्याचा प्रकोप वाढून दरवर्षी धान उत्पादकाचे मोठे नुकसान होते. यंदा कृषी विद्यापीठाने बेटारायझम बुरशीची निर्मिती केली आहे. त्यामुळे तुडतुड्याचा प्रकोप नाहीसा होणार आहे. ही बेटारायझम बुरशी शेतकऱ्यांना पुरवावी. धानपिकावरील खोडकिडा टाळण्यासाठी ट्रायकोकार्ड वापरण्यासाठी जनजागृती करावी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी