शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर कृषी केंद्र चालकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:52 IST

bogus seeds खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देउगवणक्षमता तपासूनच करावी विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खते व बियाण्यांसाठी धावपळ सुरू झाली आहे. याचा फायदा घेत काही बियाण्याच्या कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या माध्यमातून बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. घेतलेले बियाणे उगवतच नसल्याच्या तक्रारी दरवर्षी विभागाकडे येतात. परंतु यंदा बोगस बियाण्यांची विक्री केल्यास कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकाने बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच विक्री करावी, असे निर्देश जि.प.चे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी दिले आहेत.

नुकताच कृषी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. खते आणि बियाण्यांच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. बोगस बियाण्यांवर निर्बंध घालण्यासंदर्भात सदस्यांनी बैठकीत चर्चा केली. शेतकरी कृषी केंद्रावरून बियाण्यांची खरेदी करतात. या केंद्र चालकांना काही कंपन्या आमिष दाखवून बोगस बियाण्यांची विक्री करतात. परंतु शेतकऱ्यांनी बियाणे पेरल्यानंतर ते उगवतच नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. त्याचा आगाऊचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व तक्रारी टाळण्यासाठी कृषी केंद्र चालकांनी बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी आणि नंतरच विक्री करावी, असे विभागाला स्पष्ट बजावले आहे.

बैठकीत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती मोहीम प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी समन्वय साधून मार्गदर्शनाची मोहीम राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.

 बेटारायझम बुरशी धान उत्पादक शेतकऱ्यांना पुरवावी

खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत वैद्य म्हणाले, धानपिकावर तुडतुड्याचा प्रकोप वाढून दरवर्षी धान उत्पादकाचे मोठे नुकसान होते. यंदा कृषी विद्यापीठाने बेटारायझम बुरशीची निर्मिती केली आहे. त्यामुळे तुडतुड्याचा प्रकोप नाहीसा होणार आहे. ही बेटारायझम बुरशी शेतकऱ्यांना पुरवावी. धानपिकावरील खोडकिडा टाळण्यासाठी ट्रायकोकार्ड वापरण्यासाठी जनजागृती करावी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी