शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

टंचाईग्रस्त गावांसाठी ४२ कोटी ४८ लक्ष रुपयाचा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:26 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.

ठळक मुद्दे१२८५ उपाययोजनांना मंजुरी : ३३ गावात ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूशुद्ध पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांसाठी ४२ कोटी ४८ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून एकूण १२८५ उपाययोजनांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या प्रत्येक गावात मंजूर कृत आराखड्यानुसार विंधन विहिरी व नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीला प्राधान्य दिल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होत नाही अशा सर्व गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना भूगर्भातील शुध्द पाणीपुरवठा होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय पाणीटंचाईचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता जितेंद्र्र तुरखेडे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल विकास यंत्रणा, गटविकास अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टाकळीकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यात ३३ गावांना ५४ टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असून यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ तर नागपूर ग्रामीणमध्ये २३ टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठा करताना जंतूविरहित पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची असून पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व टँकरवर जी.पी.आर.एस. यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर पुरवठादारांचे देयक अदा करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना ग्रामीण तसेच नगर परिषद क्षेत्रात पाण्याचा स्रोत निश्चित करताना भूगर्भातील पाणी निजंर्तुकीकरण केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. नगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई सातत्याने वाढत असल्यामुळे या नागरी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले वाडी, वानाडोंगरी, मोवाड, कळमेश्वर येथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात.वाडीसाठी वेण्णा धरणाच्या मृत जलसाठ्यातून काही भागाला पाणीपुरवठा होत आहे. तसेच १४ विहिरी व १४ कूपनलिकेव्दारे पाणीपुरवठा होत असून, अंबाझरी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची शुध्दता तपासणी केल्यानंतरच पाणीपुरवठा करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.वानाडोंगरी येथे बोरगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असून, वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी योजना म्हणून कान्होलीबारा प्रकल्पातून नवीन नळपाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. यासाठी ४२ हजार रुपये खर्च येणार आहे. ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कळमेश्वर शहरासाठी पेंचमधून पाणीपुरवठा होत असून, या शहराला कोच्छी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यासाठी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. ही योजना तीन महिन्यात मंजूर होईल. यासाठी मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले. मोवाड नगरपरिषदेला अधिग्रहित केलेल्या विंधन विहिरींमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, या दृष्टीने कृतिआराखड्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्राधान्य द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.टंचाईसाठी बीडीओ नोडल अधिकारी म्हणून नियुक्तीपिण्याच्या पाण्याच्या टंचाई आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी, नोडल अधिकारी राहणार आहेत तसेच नगर पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांचेवर संपूर्ण जबाबदारी आहे. उपविभागीय महसूल अधिकारी हे नियंत्रण अधिकारी असून, त्यांनी दर आठ दिवसांनी टंचाई आराखड्यानुसार अंमलबजावणीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.असा आहे कृती आराखडापाणीटंचाई कृतिआराखड्यानुसार ९९५ गावात १२८५ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे यासाठी २५ कोटी ९८ लक्ष रुपयांचा खर्च येणार आहे. मंजूर आराखड्यानुसार १० उपाययोजना लागू करण्यात आल्या असून, येत्या आठ दिवसात या योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. टंचाई कृतिआराखड्यानुसार ३७४ गावात ६२३ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार असून, यासाठी ८ कोटी ७० लक्ष रुपये, नळयोजनांसाठी विशेष दुरुस्ती ३७५ गावात करण्यात येणार आहे यासाठी १५ कोटी ५० लक्ष रुपये तर विहिरी खोल करणे व गाळ काढणे यासाठी १ कोटी ८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत खाजगी विहिरींचे अधिग्रहण तात्पुरत्या नळयोजनांची दुरुस्ती आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयwater scarcityपाणी टंचाई