शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गांधीविचारांवर कृती दूरच, साधी स्मृतीही जपली गेली नाही, १९२० च्या अधिवेशनाने दिले होते स्वातंत्र्य लढ्याला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:59 IST

Gandhi's ideology : काँग्रेसचे ३५ वे अधिवेशन २६ ते ३१ डिसेंबर १९२० दरम्यान नागपूर येथे झाले. सहापैकी चारच दिवस कामकाज झाले. दोन दिवस सुटी होती.

- योगेश पांडे

नागपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्याला असहकार आंदोलनाची देशव्यापी आक्रमक देणगी देणाऱ्या नागपूर येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनाचा सगळ्यांनाच विसर पडला आहे. याच अधिवेशनात देशाच्या राजकारणाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ते महात्मा गांधी असे ऐतिहासिक वळण मिळाले. पण शताब्दीच्या निमित्ताने विचारमंथन, कृतिशील स्मरण वगैरे दूर, अधिवेशनाची साधी स्मृतीही जपली गेली नसल्याचे  आढळून आले आहे. काँग्रेसचे ३५ वे अधिवेशन २६ ते ३१ डिसेंबर १९२० दरम्यान नागपूर येथे झाले. सहापैकी चारच दिवस कामकाज झाले. दोन दिवस सुटी होती. मद्रास प्रांतातील चक्रवर्ती विजय राघवाचारी अध्यक्ष, उद्योगपती जमनालाल बजाज स्वागताध्यक्ष, तर हिंदू महासभेचे नेते डॉ. बा.शि. मुंजे स्वागत समितीचे सरचिटणीस होते. नागपूरमध्ये भरलेले ते दुसरे अधिवेशन. १८९१ मधील सातवे अधिवेशन नागपूरमध्ये पनाबाक्कम आनंद चार्लू या दाक्षिणात्य नेत्यांच्याच अध्यक्षतेखाली झाले  होते. १९०७ मध्येही शहरात काँग्रेस अधिवेशन घेण्याचा प्रयत्न झाला, पण जहाल-मवाळ दुभंगामुळे यशस्वी झाला नाही. बंगालची फाळणी नुकतीच झाली होती.

देशभरात अस्वस्थता होती. जहाल पक्षाला अध्यक्षपदी लोकमान्य टिळक तर मवाळ पक्षाला रासबिहारी बोस हवे होते. बोस गटाला अधिवेशन नागपूरला हवे होते. जहाल गटाचा त्याला विरोध होता. परिणामी, ते अधिवेशन सुरतला झाले. तेथे गोंधळ झाला, पक्षात उभी फूट पडली. अधिवेशन गुंडाळावे लागले.

ना स्मृती, ना चिरा, ना पणती नागपूरमधील ज्या काँग्रेसनगर परिसरात हे अधिवेशन झाले, तेथे वसाहतीचे नाव वगळता इतक्या महत्त्वाच्या घटनेची कसलीही स्मृती नाही. इतिहासातील सर्वांत कठीण कालखंडातून जात असलेल्या काँग्रेस पक्षाला या अधिवेशनाच्या शताब्दीचे सोयरसुतक नाही. त्याचप्रमाणे, हे अधिवेशन यशस्वी करणाऱ्या बहुतेक सर्व शिलेदारांनी टिळकपर्वाची अखेर झाल्यामुळे, गांधींचा मार्ग न रुचल्याने किंवा आणखी काही कारणांनी पाच वर्षांनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भारतीय राजकारणात नवा सांस्कृतिक प्रवाह निर्माण झाला, पण या गंगेलाही आपल्या गंगोत्रीचे स्मरण करावे, असे वाटले नाही. 

देशाला मिळाली ‘गांधी टोपी’ - १९१९ मध्ये महात्मा गांधी यांनी वापरलेल्या टोपीला ‘गांधी टोपी’ असे नाव पडले. मात्र, नागपूरच्या अधिवेशनानंतर या टोपीची देशभरात मोठ्या प्रमाणावर ओळख झाली. - नागपूरच्या अधिवेशनात सर्वच प्रतिनिधी हे स्वदेशी पोशाखात आले होते व बहुतांश जणांच्या डोक्यावर गांधी टोपी होती. - यासाठी आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती. याच गांधी टोपीने राष्ट्रीय सेवेचे प्रतीक बनत इतिहास रचला. मात्र गांधी टोपीसाठी झटणाऱ्या प्रतिनिधींना इतिहासात स्थान मिळू शकले नाही.

नेतृत्व टिळकांकडून गांधींकडेअसहकार आंदोलनावर शिक्कामोर्तब, स्वराज्य हा काँग्रेसचा नवा हेतू आणि लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर लगेच महात्मा गांधींकडे राष्ट्रीय राजकारणाच्या बॅटनचे हस्तांतरण ही नागपूर अधिवेशनाची तीन वैशिष्ट्ये. टिळक हे देशाचे सर्वोच्च नेते असूनही त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाले नाही. राजद्रोहाच्या खटल्यातील शिक्षा मंडाले तुरुंगात भोगून परत आल्यानंतर १९१६ च्या लाहोर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी टिळकांची बिनविरोध निवड झाली खरी, परंतु सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या विरोधातील खटला लढण्यासाठी टिळक १८१८ पर्यंत इंग्लंडमध्ये अडकून पडले. लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविता आले नाही. १९१९ मध्ये ते परत येताच त्यांच्या विदर्भातील अनुयायांनी संधी साधण्याचे ठरविले. आधी अधिवेशन नागपूर की जबलपूर, असा वाद होता. अखेर नागपूरचा निर्णय झाला, पण टिळकांच्या नशिबी काँग्रेसचे अध्यक्षपद नव्हतेच. नागपूरकर मंडळी अधिवेशनाची तयारी जोमाने करीत असतानाच १ ऑगस्टला मुंबईत टिळकांचे निधन झाले. तयारी करणाऱ्या पाठीराख्यांवर जणू वज्राघात झाला.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी