शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कंपन्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:17 IST

विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा उद्योगजगताचा दृष्टिकोन बदलेल अशी चर्चा आहे. मात्र या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.सोमवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षांवर बरेच आरोप झाले. परीक्षा घेणारच नाही असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. केवळ आताची स्थिती लक्षात घेता सध्या पदवी देऊ व ज्यांना गुणसुधार करायचा आहे, त्यांची नंतर परीक्षा घेऊन अशी आमची भूमिका होती. मी परीक्षा न घेण्याच्या माझ्या मतावर आजही ठाम आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे हे कर्तव्यच असून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे सामंत यांनी सांगितले. आयआयटीसह देशातील इतर राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या, तेव्हा ओरड का झाली नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.आम्ही तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेचे निकाल आल्यानंतर तेथील प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. सध्याची स्थिती पाहता शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरू होईल हे सांगता येत नाही, असे सामंत यांनी प्रतिपादन केले.नागपूर विद्यापीठात ७५ हजारांहून अधिक परीक्षार्थीनागपूर विद्यापीठात एमसीक्यू करायची की नाही अशी शंका होती. मात्र आता परीक्षेचे काम वेगाने सुरू आहे. मॉक टेस्ट घेतल्या जात आहे. नियमित व अनुत्तीर्ण मिळून ७५ हजार ९२५ विद्यार्थी १ हजार ८८२ विषयांच्या परीक्षा देणार आहेत. त्यातील ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज असून उर्वरित विद्यार्थ्यांचीदेखील सोय करण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.अनुत्तीर्णांची दीड महिन्यात परीक्षाएखादा पेपर द्यायचा राहिला तर कसे होणार अशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती. मात्र अशा विद्यार्थ्यांची १५ दिवसांनी परत परीक्षा घेण्यात येईल. शिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षादेखील महिना दीड महिन्यात होईल, असे उच्च शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.आठ दिवसात सर्व विद्यापीठांचा दौराकोरोना काळात मी दौरा का करतो आहे याबाबत अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र राज्यातील विद्यापीठे प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा घेत आहेत. शासन या सर्व विद्यापीठांच्या पाठीशी आहे. यासाठीच मी नागपूर व गडचिरोलीचा दौरा केला. पुढील आठ दिवसांत सर्व विद्यापीठांचा दौरा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.कोरोना संपल्यानंतर भरती प्रक्रियाकोरोनामुळे राज्यभरातील विद्यापीठांतील भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. मात्र शासनाने भरती नेहमीसाठी थांबविलेली नाही. कोरोनाचा प्रकोप संपल्यानंतर परत भरती प्रक्रिया सुरू होईल, असा दावा सामंत यांनी केला.

टॅग्स :universityविद्यापीठUday Samantउदय सामंत