शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर कंपन्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:17 IST

विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा उद्योगजगताचा दृष्टिकोन बदलेल अशी चर्चा आहे. मात्र या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.सोमवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षांवर बरेच आरोप झाले. परीक्षा घेणारच नाही असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. केवळ आताची स्थिती लक्षात घेता सध्या पदवी देऊ व ज्यांना गुणसुधार करायचा आहे, त्यांची नंतर परीक्षा घेऊन अशी आमची भूमिका होती. मी परीक्षा न घेण्याच्या माझ्या मतावर आजही ठाम आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे हे कर्तव्यच असून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे सामंत यांनी सांगितले. आयआयटीसह देशातील इतर राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या, तेव्हा ओरड का झाली नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.आम्ही तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेचे निकाल आल्यानंतर तेथील प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. सध्याची स्थिती पाहता शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरू होईल हे सांगता येत नाही, असे सामंत यांनी प्रतिपादन केले.नागपूर विद्यापीठात ७५ हजारांहून अधिक परीक्षार्थीनागपूर विद्यापीठात एमसीक्यू करायची की नाही अशी शंका होती. मात्र आता परीक्षेचे काम वेगाने सुरू आहे. मॉक टेस्ट घेतल्या जात आहे. नियमित व अनुत्तीर्ण मिळून ७५ हजार ९२५ विद्यार्थी १ हजार ८८२ विषयांच्या परीक्षा देणार आहेत. त्यातील ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज असून उर्वरित विद्यार्थ्यांचीदेखील सोय करण्यात येईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.अनुत्तीर्णांची दीड महिन्यात परीक्षाएखादा पेपर द्यायचा राहिला तर कसे होणार अशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती. मात्र अशा विद्यार्थ्यांची १५ दिवसांनी परत परीक्षा घेण्यात येईल. शिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षादेखील महिना दीड महिन्यात होईल, असे उच्च शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.आठ दिवसात सर्व विद्यापीठांचा दौराकोरोना काळात मी दौरा का करतो आहे याबाबत अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र राज्यातील विद्यापीठे प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा घेत आहेत. शासन या सर्व विद्यापीठांच्या पाठीशी आहे. यासाठीच मी नागपूर व गडचिरोलीचा दौरा केला. पुढील आठ दिवसांत सर्व विद्यापीठांचा दौरा करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.कोरोना संपल्यानंतर भरती प्रक्रियाकोरोनामुळे राज्यभरातील विद्यापीठांतील भरती प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. मात्र शासनाने भरती नेहमीसाठी थांबविलेली नाही. कोरोनाचा प्रकोप संपल्यानंतर परत भरती प्रक्रिया सुरू होईल, असा दावा सामंत यांनी केला.

टॅग्स :universityविद्यापीठUday Samantउदय सामंत