शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वेगाड्यांमध्ये ज्वलनशिल पदार्थ नेणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहिम

By नरेश डोंगरे | Updated: November 17, 2023 21:37 IST

आगीच्या घटना टाळण्यासाठी उपाय : आरपीएफकडून विशेष तपासणी अभियान

 नागपूर: रेल्वेगाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाईचे विशेष अभियान चालविले जात आहे. त्यानुसार, विशेष तपासणी करून रेल्वेगाड्यांमध्ये ज्वलनशिल पदार्थ नेणाऱ्यांना हुडकून काढले जात असून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. 

नवी दिल्ली-दरभंगा एक्प्रेसमध्ये बुधवारी आगीची घटना घडली. यापूर्वीही विविध रेल्वेगाड्यांमध्ये अशा घटना घडून अनेकांना नुकसान झाले आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये आगीच्या घटना घडू नये यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या नेतृत्वात आरपीएफने विशेष तपासणी मोहिम गुरुवारपासून सुरू केले आहे. एक आठवडा हे विशेष तपासणी मोहिम सुरू राहणार आहे. सध्या छटपूजेसाठी वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून बिहार आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या गाड्यांवर नजर रोखण्यात आली आहे. प्रवाशांकडे असलेल्या बॅग, पिशव्या, पोती (बोरी) यांची रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वानांकडून विशेष तपासणी केली जात आहे.

रेल्वे स्थानकावरूल बॅग स्कॅनरच्या माध्यमातूनही तपासणी केली जात असून पब्लिक अनाऊंसमेंट (पीए) सिस्टममधूनही प्रवाशांना सूचना दिल्या जात आहे. गॅस सिलेंडर, विस्फोटक पदार्थ, पटाखे, पेंट, पेट्रोलियम पदार्थ, दारू, गन पाउडर, रसायण तसेच कोणतेही ज्वलनशील पदार्थ अथवा साहित्य सोबत नेण्यास प्रवाशांना मनाई केली जात आहे. स्वत:सह ईतरांच्या जानमालाला धोका निर्माण करू नका, असे आवाहनही केले जात आहे.

१५ व्यक्तींना अटकसूचना, माहिती देऊनही लपून छपून वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमधून फटाके, गॅस सिलिंडर सारखे ज्वलनशिल चिजवस्तू नेणाऱ्या १५ जणांविरुद्ध आरपीएफने कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध रेल्वे सुरक्षा कायद्याच्या कलम १६४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर