शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गुरांचा अपघात झाल्यास रेल्वेकडून मालकावर कारवाई; वारंवार सूचना करूनही ‘नो रिस्पॉन्स’

By नरेश डोंगरे | Updated: March 1, 2024 23:36 IST

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला चारली जातात जनावरे

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वेच्या रुळाजवळ गुरे चारली जात असल्याने अनेक ट्रॅकवर गुरांचे अपघात होताहेत. गावागावांतील गुरांच्या मालकांना वारंवार सूचना, आवाहन करूनही ते प्रतिसाद देत नसल्याने आता त्यांच्याविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहरे आणि गावांच्या बाजूने रेल्वेची लाइन गेलेली आहे. गावातील अनेक गुरांचे मालक रेल्वे रुळाच्या बाजूला आणून आपली जनावरे चारतात. चारणाऱ्यांचे दुर्लक्ष होताच गुरे रेल्वे रुळावर येतात. त्याचवेळी एखादी रेल्वेगाडी आल्यास अपघात होतो आणि त्या जनावराचा जीव जातो. अपघात झाल्यानंतर रेल्वेगाडी थांबते. नंतर ते जनावर बाजूला केले जाते आणि नंतर गाडी पुढे निघते.

अपघातामुळे रेल्वेच्या वेळेपत्रकावर परिणाम होतो. ती गाडी विलंबाने पोहोचते अन् त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाडी येत असताना रेल्वे रुळावर जनावरे धावतात. त्यामुळे मोठ्या अपघाताचाही धोका निर्माण होत असतो. वेगवेगळ्या भागात वारंवार जनावरांचे अपघात होत असल्याने रेल्वेने वेळोवेळी विविध ठिकाणच्या गावकऱ्यांना रेल्वे रुळाजवळ गुरे नेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे जनावराचा जीव जातो आणि तुमचेही नुकसान होते. रेल्वेचे नेटवर्कही विस्कळीत होते, असे समजावून सांगितले आहे. मुक्या जनावरांना कळत नाही त्यामुळे ते रेल्वेच्या ट्रॅकवर जातात. मात्र, तुम्हाला कळते, तुम्ही हे अपघात रोखण्यास मदत करा, असे आवाहनही केले आहे. जनजागरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून त्यांच्याकडून वारंवार ज्या भागात जनावरांचे अपघात होतात, ते ठिकाण अधोरेखीत केली आहेत. नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी पत्रके आणि बॅनरही लावले आहेत. मात्र, अनेक ठिकाणच्या जनावरांच्या मालकांकडून त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, यापुढे ज्या गावाशेजारी, रेल्वे ट्रॅकवर जनावरांचा रेल्वेने अपघात झाला. त्या जनावराच्या मालकावर रेल्वे कायद्याच्या कलम १५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

आवाहन आणि इशारा

जनावरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या मालकांनी त्यांची जनावरे रेल्वे रुळाच्या बाजूला चारण्यासाठी आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी रुळांच्या बाजूला जनावरे चारली जात असताना दिसल्यास त्या जनावरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे