शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गुरांचा अपघात झाल्यास रेल्वेकडून मालकावर कारवाई; वारंवार सूचना करूनही ‘नो रिस्पॉन्स’

By नरेश डोंगरे | Updated: March 1, 2024 23:36 IST

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला चारली जातात जनावरे

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वेच्या रुळाजवळ गुरे चारली जात असल्याने अनेक ट्रॅकवर गुरांचे अपघात होताहेत. गावागावांतील गुरांच्या मालकांना वारंवार सूचना, आवाहन करूनही ते प्रतिसाद देत नसल्याने आता त्यांच्याविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहरे आणि गावांच्या बाजूने रेल्वेची लाइन गेलेली आहे. गावातील अनेक गुरांचे मालक रेल्वे रुळाच्या बाजूला आणून आपली जनावरे चारतात. चारणाऱ्यांचे दुर्लक्ष होताच गुरे रेल्वे रुळावर येतात. त्याचवेळी एखादी रेल्वेगाडी आल्यास अपघात होतो आणि त्या जनावराचा जीव जातो. अपघात झाल्यानंतर रेल्वेगाडी थांबते. नंतर ते जनावर बाजूला केले जाते आणि नंतर गाडी पुढे निघते.

अपघातामुळे रेल्वेच्या वेळेपत्रकावर परिणाम होतो. ती गाडी विलंबाने पोहोचते अन् त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाडी येत असताना रेल्वे रुळावर जनावरे धावतात. त्यामुळे मोठ्या अपघाताचाही धोका निर्माण होत असतो. वेगवेगळ्या भागात वारंवार जनावरांचे अपघात होत असल्याने रेल्वेने वेळोवेळी विविध ठिकाणच्या गावकऱ्यांना रेल्वे रुळाजवळ गुरे नेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे जनावराचा जीव जातो आणि तुमचेही नुकसान होते. रेल्वेचे नेटवर्कही विस्कळीत होते, असे समजावून सांगितले आहे. मुक्या जनावरांना कळत नाही त्यामुळे ते रेल्वेच्या ट्रॅकवर जातात. मात्र, तुम्हाला कळते, तुम्ही हे अपघात रोखण्यास मदत करा, असे आवाहनही केले आहे. जनजागरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून त्यांच्याकडून वारंवार ज्या भागात जनावरांचे अपघात होतात, ते ठिकाण अधोरेखीत केली आहेत. नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी पत्रके आणि बॅनरही लावले आहेत. मात्र, अनेक ठिकाणच्या जनावरांच्या मालकांकडून त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, यापुढे ज्या गावाशेजारी, रेल्वे ट्रॅकवर जनावरांचा रेल्वेने अपघात झाला. त्या जनावराच्या मालकावर रेल्वे कायद्याच्या कलम १५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

आवाहन आणि इशारा

जनावरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या मालकांनी त्यांची जनावरे रेल्वे रुळाच्या बाजूला चारण्यासाठी आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी रुळांच्या बाजूला जनावरे चारली जात असताना दिसल्यास त्या जनावरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे