शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुरांचा अपघात झाल्यास रेल्वेकडून मालकावर कारवाई; वारंवार सूचना करूनही ‘नो रिस्पॉन्स’

By नरेश डोंगरे | Updated: March 1, 2024 23:36 IST

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला चारली जातात जनावरे

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वेच्या रुळाजवळ गुरे चारली जात असल्याने अनेक ट्रॅकवर गुरांचे अपघात होताहेत. गावागावांतील गुरांच्या मालकांना वारंवार सूचना, आवाहन करूनही ते प्रतिसाद देत नसल्याने आता त्यांच्याविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शहरे आणि गावांच्या बाजूने रेल्वेची लाइन गेलेली आहे. गावातील अनेक गुरांचे मालक रेल्वे रुळाच्या बाजूला आणून आपली जनावरे चारतात. चारणाऱ्यांचे दुर्लक्ष होताच गुरे रेल्वे रुळावर येतात. त्याचवेळी एखादी रेल्वेगाडी आल्यास अपघात होतो आणि त्या जनावराचा जीव जातो. अपघात झाल्यानंतर रेल्वेगाडी थांबते. नंतर ते जनावर बाजूला केले जाते आणि नंतर गाडी पुढे निघते.

अपघातामुळे रेल्वेच्या वेळेपत्रकावर परिणाम होतो. ती गाडी विलंबाने पोहोचते अन् त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाडी येत असताना रेल्वे रुळावर जनावरे धावतात. त्यामुळे मोठ्या अपघाताचाही धोका निर्माण होत असतो. वेगवेगळ्या भागात वारंवार जनावरांचे अपघात होत असल्याने रेल्वेने वेळोवेळी विविध ठिकाणच्या गावकऱ्यांना रेल्वे रुळाजवळ गुरे नेऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे जनावराचा जीव जातो आणि तुमचेही नुकसान होते. रेल्वेचे नेटवर्कही विस्कळीत होते, असे समजावून सांगितले आहे. मुक्या जनावरांना कळत नाही त्यामुळे ते रेल्वेच्या ट्रॅकवर जातात. मात्र, तुम्हाला कळते, तुम्ही हे अपघात रोखण्यास मदत करा, असे आवाहनही केले आहे. जनजागरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच ऑपरेटिंग विभागातील कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून त्यांच्याकडून वारंवार ज्या भागात जनावरांचे अपघात होतात, ते ठिकाण अधोरेखीत केली आहेत. नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी पत्रके आणि बॅनरही लावले आहेत. मात्र, अनेक ठिकाणच्या जनावरांच्या मालकांकडून त्याला प्रतिसादच मिळत नसल्याने गुरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, यापुढे ज्या गावाशेजारी, रेल्वे ट्रॅकवर जनावरांचा रेल्वेने अपघात झाला. त्या जनावराच्या मालकावर रेल्वे कायद्याच्या कलम १५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

आवाहन आणि इशारा

जनावरांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या मालकांनी त्यांची जनावरे रेल्वे रुळाच्या बाजूला चारण्यासाठी आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी रुळांच्या बाजूला जनावरे चारली जात असताना दिसल्यास त्या जनावरांच्या मालकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे