शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर, परतवाड्यातील दंगलीचा अतिरेकी संघटनांशी संबंध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 21:00 IST

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे १७ एप्रिल २०२२ रोजी उसळलेली दंगल ही सुनियोजित होती. मात्र, या सगळ्या षड्यंत्राचा माग घेण्यात गुप्तचर विभाग अपयशी ठरला असल्याचा निष्कर्ष मैत्री परिवार संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे.

ठळक मुद्दे मैत्री परिवारच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे १७ एप्रिल २०२२ रोजी उसळलेली दंगल ही सुनियोजित होती. जिल्ह्यात अराजकता माजविण्याची संपूर्ण तयारी आधीच करण्यात आली होती. या घटनेच्या नियोजनात बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनांचा सहभाग वेगळ्या बॅनरखाली होता. मात्र, या सगळ्या षड्यंत्राचा माग घेण्यात गुप्तचर विभाग अपयशी ठरला असून, पोलीस प्रशासनही बेमालूम असल्याचा निष्कर्ष मैत्री परिवार संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे.

याबाबतची माहिती अचलपूर-परतवाडा घटनेच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या वेळी जनसंघर्ष समितीचे दत्ता शिर्के, माजी न्यायाधीश मीरा खडक्कार, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, दिलीप ठाकरे व प्रवीण मुधोळकर उपस्थित होते.

सहा सदस्यांची सत्यशोधन समिती

डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या सत्यशोधन समितीमध्ये माजी न्यायाधीश मीरा खडक्कार, माजी सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर व पत्रकार प्रवीण मुधोळकर यांचा समावेश होता. या समितीने २ ते ४ मे या तीन दिवसांत दंगल उसळलेल्या घटनास्थळी भेट देऊन व शंभरांहून अधिक पीडित लोकांना भेट देऊन हा अहवाल तयार केला.

विशेष समुदायाच्या चिथावणीवरूनच माजली अराजकता

अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा लावल्याच्या वादावरून १७ एप्रिल रोजी रात्री दोन समुदायांत वाद झाला. वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. त्या अनुषंगाने विशेष समाजातील लोकांनी समाजाला शस्त्रासह गोळा होण्याचे आवाहन केले. त्यानंतर चिथावणी देऊन व सुनियोजित कट रचून दंगल घडविण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या विशेष समुदायाकडून अन्य समुदाय प्रचंड त्रस्त असून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याचे या अहवालात सांगितले आहे.

समितीला असहकार

सत्यशोधन समितीला प्रशासनाकडून पूर्णत: असहकार करण्यात आला असून, विशिष्ट समुदायासोबत चर्चा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. स्थानिक प्रशासन व पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, अशी माहितीही डॉ. उदय निरगुडकर यांनी या वेळी दिली.

अशा आहेत समितीच्या शिफारशी

* अचलपूर येथील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे.

* बंद असलेले सीसीटीव्ही तत्काळ कार्यान्वित करावे.

* अचलपूर येथे वाढलेल्या लोकसंख्येचा आढावा घेऊन, बाहेरून वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची माहिती घ्यावी.

* अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना अटक करावी व वितरणाची साखळी तोडावी.

* बंदी घालण्यात आलेल्या संघटना पुन्हा वेगळ्या बॅनरखाली कार्यरत झाल्या आहेत. राज्य सरकारच्या गृह खात्याने संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

 

टॅग्स :Socialसामाजिक