शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

अचलपूर, परतवाड्यातील दंगलीचा अतिरेकी संघटनांशी संबंध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 21:00 IST

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे १७ एप्रिल २०२२ रोजी उसळलेली दंगल ही सुनियोजित होती. मात्र, या सगळ्या षड्यंत्राचा माग घेण्यात गुप्तचर विभाग अपयशी ठरला असल्याचा निष्कर्ष मैत्री परिवार संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे.

ठळक मुद्दे मैत्री परिवारच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे १७ एप्रिल २०२२ रोजी उसळलेली दंगल ही सुनियोजित होती. जिल्ह्यात अराजकता माजविण्याची संपूर्ण तयारी आधीच करण्यात आली होती. या घटनेच्या नियोजनात बंदी घातलेल्या अतिरेकी संघटनांचा सहभाग वेगळ्या बॅनरखाली होता. मात्र, या सगळ्या षड्यंत्राचा माग घेण्यात गुप्तचर विभाग अपयशी ठरला असून, पोलीस प्रशासनही बेमालूम असल्याचा निष्कर्ष मैत्री परिवार संस्थेच्या सत्यशोधन समितीने काढला आहे.

याबाबतची माहिती अचलपूर-परतवाडा घटनेच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली. या वेळी जनसंघर्ष समितीचे दत्ता शिर्के, माजी न्यायाधीश मीरा खडक्कार, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, दिलीप ठाकरे व प्रवीण मुधोळकर उपस्थित होते.

सहा सदस्यांची सत्यशोधन समिती

डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या सत्यशोधन समितीमध्ये माजी न्यायाधीश मीरा खडक्कार, माजी सहायक पोलीस आयुक्त अनिल बोबडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर व पत्रकार प्रवीण मुधोळकर यांचा समावेश होता. या समितीने २ ते ४ मे या तीन दिवसांत दंगल उसळलेल्या घटनास्थळी भेट देऊन व शंभरांहून अधिक पीडित लोकांना भेट देऊन हा अहवाल तयार केला.

विशेष समुदायाच्या चिथावणीवरूनच माजली अराजकता

अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर झेंडा लावल्याच्या वादावरून १७ एप्रिल रोजी रात्री दोन समुदायांत वाद झाला. वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. त्या अनुषंगाने विशेष समाजातील लोकांनी समाजाला शस्त्रासह गोळा होण्याचे आवाहन केले. त्यानंतर चिथावणी देऊन व सुनियोजित कट रचून दंगल घडविण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या विशेष समुदायाकडून अन्य समुदाय प्रचंड त्रस्त असून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याचे या अहवालात सांगितले आहे.

समितीला असहकार

सत्यशोधन समितीला प्रशासनाकडून पूर्णत: असहकार करण्यात आला असून, विशिष्ट समुदायासोबत चर्चा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. स्थानिक प्रशासन व पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, अशी माहितीही डॉ. उदय निरगुडकर यांनी या वेळी दिली.

अशा आहेत समितीच्या शिफारशी

* अचलपूर येथील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे.

* बंद असलेले सीसीटीव्ही तत्काळ कार्यान्वित करावे.

* अचलपूर येथे वाढलेल्या लोकसंख्येचा आढावा घेऊन, बाहेरून वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांची माहिती घ्यावी.

* अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना अटक करावी व वितरणाची साखळी तोडावी.

* बंदी घालण्यात आलेल्या संघटना पुन्हा वेगळ्या बॅनरखाली कार्यरत झाल्या आहेत. राज्य सरकारच्या गृह खात्याने संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

 

टॅग्स :Socialसामाजिक