शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत उघडणार

By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असणार्‍या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून देण्यात येणार असून तेथे शासकीय मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच विशेष

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असणार्‍या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून देण्यात येणार असून तेथे शासकीय मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी ही माहिती दिली. अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून जाहीर केलेल्या मदतीचे वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केले जाते. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी नागपूर जिल्ह्याला आतापर्यंत १८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून मदतीचे वाटप टप्प्या टप्प्याने सुरू आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मात्र सध्या जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आहे. रिझर्व्ह बँकेने त्यावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना त्याची रक्कम काढता येत नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. दुसरीकडे सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांच्या खात्यातील शासकीय मदत कर्जाच्या मोबदल्यात परस्पर वळती केली जात आहे, अशाही तक्रारी आहेत. सहकार खात्याने मात्र तो आरोप फेटाळून लावला आहे. ही कोंडी फोडण्यासाठीच शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडून देण्यात येणार असून तेथे शासकीय मदतीची रक्कम जमा केली जाईल. जेणेकरून शेतकर्‍यांना ती काढता येईल. ज्यांनी पूर्वीच राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडली असेल त्यांच्या त्या बँकेच्या खात्यात शासकीय मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे आणि शेतकर्‍यांना पैशाची गरज आहे. अद्यापही काही गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदतीचे वाटप झाले नाही. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीतही प्रश्न उपस्थित झाला होता व पालकमंत्र्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सहकार खात्याच्या अधिकार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे कृष्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एक महिन्यात युद्धपातळीवर ही योजना राबवून शेतकर्‍यांना मदत केली जाईल. जिल्हा बँकेच्या वाट्याचे पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)