शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

अपघात की आत्मघात!

By admin | Updated: July 21, 2015 03:06 IST

साधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४

नागपूर होतेय ‘अपघात’पूर : वर्षभरात रस्ते अपघातात ३७२ बळी योगेश पांडे ल्ल नागपूरसाधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४ या वर्षात निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहेत. वर्षभरात शहरात विविध रस्ते अपघातांत ३७२ नागरिकांचा मृत्यू झाला. यापैकी निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांत जीव गमवाव्या लागलेल्या नागरिकांची संख्या चक्क ३५५ इतकी आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.२०१३ मध्ये रस्ते अपघातांचे बळी जाणाऱ्यांची संख्या २४१ इतकी होती. वर्षभरात वाढलेले हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे आहे.नागपूर शहरात १३४४ अपघात झाले. यात ३७२ नागरिकांचा बळी गेला तर १०९७ जण जखमी झाले. जर सरासरी काढली तर दिवसाला ३ हून अधिक अपघात झाले असून, यात दररोज एकाचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त ३५५ मृत्यू हे निष्काळजीपणाने वाहन चालविणे किंवा ‘ओव्हरटेकिंग’च्या नादात झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या तुलनेत या कारणामुळे झालेले मृत्यू हे सर्वाधिक आहेत. अतिवेगाने वाहन चालविण्याच्या उन्मादात ८४ अपघात झाले व यात १५ जणांचा बळी गेला. जर आकडेवारीकडे नजर टाकली तर अपघातास कारणीभूत असलेल्या ८७ जणांना जीव गमवावा लागला, तर काहीही चूक नसलेल्या २८५ जणांचे प्राण गेले.सायंकाळची घाई नडतेय‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार शहरात सर्वात जास्त अपघात हे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत झाले आहे. सायंकाळच्या काळात शहरातील विविध कार्यालये सुटतात. घरी जाण्याच्या घाईत अनेकदा निष्काळजीपणे वाहन चालविण्यात येते व यातूनच अपघात घडतात. या वेळेदरम्यान वर्षभरामध्ये ४९२ अपघात झाले. दुचाकीस्वार ‘रेड झोन’मध्येशहरातील अपघातांमध्ये सर्वात जास्त बळी दुचाकीस्वारांचे गेले आहेत. वर्षभरात १८६ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे ६८ तर कारमुळे ३८ जणांचा बळी गेला. वर्षभरात ३३ पादचारी मृत्युमुखी पडले. यातील २२ जणांची काहीच चूक नव्हती. २०१४ वर्षातील सर्वात जास्त अपघात हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान झाले आहेत. या महिन्यामध्ये १ हजार ३४४ पैकी ४७० अपघात झालेत. यातील अनेक अपघात हे प्राणांतिक होते