शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अपघात की आत्मघात!

By admin | Updated: July 21, 2015 03:06 IST

साधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४

नागपूर होतेय ‘अपघात’पूर : वर्षभरात रस्ते अपघातात ३७२ बळी योगेश पांडे ल्ल नागपूरसाधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४ या वर्षात निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहेत. वर्षभरात शहरात विविध रस्ते अपघातांत ३७२ नागरिकांचा मृत्यू झाला. यापैकी निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांत जीव गमवाव्या लागलेल्या नागरिकांची संख्या चक्क ३५५ इतकी आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.२०१३ मध्ये रस्ते अपघातांचे बळी जाणाऱ्यांची संख्या २४१ इतकी होती. वर्षभरात वाढलेले हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे आहे.नागपूर शहरात १३४४ अपघात झाले. यात ३७२ नागरिकांचा बळी गेला तर १०९७ जण जखमी झाले. जर सरासरी काढली तर दिवसाला ३ हून अधिक अपघात झाले असून, यात दररोज एकाचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त ३५५ मृत्यू हे निष्काळजीपणाने वाहन चालविणे किंवा ‘ओव्हरटेकिंग’च्या नादात झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या तुलनेत या कारणामुळे झालेले मृत्यू हे सर्वाधिक आहेत. अतिवेगाने वाहन चालविण्याच्या उन्मादात ८४ अपघात झाले व यात १५ जणांचा बळी गेला. जर आकडेवारीकडे नजर टाकली तर अपघातास कारणीभूत असलेल्या ८७ जणांना जीव गमवावा लागला, तर काहीही चूक नसलेल्या २८५ जणांचे प्राण गेले.सायंकाळची घाई नडतेय‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार शहरात सर्वात जास्त अपघात हे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत झाले आहे. सायंकाळच्या काळात शहरातील विविध कार्यालये सुटतात. घरी जाण्याच्या घाईत अनेकदा निष्काळजीपणे वाहन चालविण्यात येते व यातूनच अपघात घडतात. या वेळेदरम्यान वर्षभरामध्ये ४९२ अपघात झाले. दुचाकीस्वार ‘रेड झोन’मध्येशहरातील अपघातांमध्ये सर्वात जास्त बळी दुचाकीस्वारांचे गेले आहेत. वर्षभरात १८६ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे ६८ तर कारमुळे ३८ जणांचा बळी गेला. वर्षभरात ३३ पादचारी मृत्युमुखी पडले. यातील २२ जणांची काहीच चूक नव्हती. २०१४ वर्षातील सर्वात जास्त अपघात हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान झाले आहेत. या महिन्यामध्ये १ हजार ३४४ पैकी ४७० अपघात झालेत. यातील अनेक अपघात हे प्राणांतिक होते