शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:21 IST

नागपूर भंडारा मार्गावर असलेल्या मौदाजवळ शनिवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लग्न सोहळा आटोपून नागपूरकडे व-हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) उभ्या कंटेनरवर आदळल्याने ४ ठार तर १३ व-हाडी जबर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शनिवारी पहाटे ४. ४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यामध्ये वराच्या आजीचा देखिल समावेश आहे. या भीषण अपघाताने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपायी अमित प्रवीण झिलपे यांचा विवाह सोहळा शुक्रवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे पार पडला. वर-वधूला घेऊन त्यांचे नातेवाईक आणि व-हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने (एमएच ३१/ सीक्यू ८५४८) ने पहाटे २. ३० ला नागपूरकडे निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून बस वेगात नागपूरकडे येत होती. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोरी गावाजवळ एक कंटेनर (एमएच ४९/ एटी ३८५५) उभा होता. वेगात असलेली बस कंटेनरवर आदळली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या वराच्या आजी  विठाबाई तुकाराम झिलपे (वय ७२), करुणा विजय खोंडे (वय ५८), आनंद रमेश आठवले (वय २८, सर्व रा. नागपूर) आणि सतीश जांभुळकर (वय ३५, रा. गोंदिया) या चौघांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी होते. त्यातील  १३ प्रवासी जबर जखमी झाले.  ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी बहुतांश व-हाडी साखरझोपेत होती. अपघातानंतर मोठा आवाज होऊन जोरदार धक्का लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर पडल्याने नेमके काय झाले, हे काही क्षण अनेकांना कळलेच नाही. नंतर अपघात घडल्याचे लक्षात आले. वर अमित यांचे काका अरविंद तुकाराम झिलपे (वय ४९) हे नागपूरला पोलीस हवालदार आहेत. ते गुन्हेशाखेत सेवारत आहेत. त्यांनी तसेच सोबतच्या मंडळींनी लगेच १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती कळवली.अवघा गावच मदतीला धावलाअपघातामुळे एवढा मोठा आवाज झाला की सिंगोरीवासियांची झोपच उडाली. गावक-यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक रोखली गेली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. 

त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला आलेले भंडारा अन् मौदा पोलीस तसेच अ‍ॅम्बुलन्सही वाहनांच्या गर्दीत अडकली. बराच वेळ ईकडे तिकडे केल्यानंतर अ‍ॅम्बुलन्स डाव्या बाजुने काढून जखमीजवळ पोहचवण्यात आली. त्यानंतर तीन अ‍ॅम्बुलन्स मध्ये जखमींना आधी भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नागपूरला पाठविण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी येथे आणलेल्यांपैकी दोघांना मृत घोषित केले. 

बसचालक पळालाहा अपघात एवढा भीषण होता की बसची डावी बाजू कंटेनरमुळे कापत गेली. अपघातानंतर निर्माण झालेल्या गोंधळात बसचालक खाली उडी मारून पळून गेला. दुपारी २. ३० वाजेपर्यंत तो कुठे गेला, कसा आहे, त्याबाबत पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही. बसचालक दारूच्या नशेत होता का, ते देखिल स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याला झपकी आली असावी अन् त्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे.  

टॅग्स :Accidentअपघात