शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:21 IST

नागपूर भंडारा मार्गावर असलेल्या मौदाजवळ शनिवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लग्न सोहळा आटोपून नागपूरकडे व-हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) उभ्या कंटेनरवर आदळल्याने ४ ठार तर १३ व-हाडी जबर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शनिवारी पहाटे ४. ४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यामध्ये वराच्या आजीचा देखिल समावेश आहे. या भीषण अपघाताने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपायी अमित प्रवीण झिलपे यांचा विवाह सोहळा शुक्रवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे पार पडला. वर-वधूला घेऊन त्यांचे नातेवाईक आणि व-हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने (एमएच ३१/ सीक्यू ८५४८) ने पहाटे २. ३० ला नागपूरकडे निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून बस वेगात नागपूरकडे येत होती. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोरी गावाजवळ एक कंटेनर (एमएच ४९/ एटी ३८५५) उभा होता. वेगात असलेली बस कंटेनरवर आदळली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या वराच्या आजी  विठाबाई तुकाराम झिलपे (वय ७२), करुणा विजय खोंडे (वय ५८), आनंद रमेश आठवले (वय २८, सर्व रा. नागपूर) आणि सतीश जांभुळकर (वय ३५, रा. गोंदिया) या चौघांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी होते. त्यातील  १३ प्रवासी जबर जखमी झाले.  ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी बहुतांश व-हाडी साखरझोपेत होती. अपघातानंतर मोठा आवाज होऊन जोरदार धक्का लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर पडल्याने नेमके काय झाले, हे काही क्षण अनेकांना कळलेच नाही. नंतर अपघात घडल्याचे लक्षात आले. वर अमित यांचे काका अरविंद तुकाराम झिलपे (वय ४९) हे नागपूरला पोलीस हवालदार आहेत. ते गुन्हेशाखेत सेवारत आहेत. त्यांनी तसेच सोबतच्या मंडळींनी लगेच १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती कळवली.अवघा गावच मदतीला धावलाअपघातामुळे एवढा मोठा आवाज झाला की सिंगोरीवासियांची झोपच उडाली. गावक-यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक रोखली गेली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. 

त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला आलेले भंडारा अन् मौदा पोलीस तसेच अ‍ॅम्बुलन्सही वाहनांच्या गर्दीत अडकली. बराच वेळ ईकडे तिकडे केल्यानंतर अ‍ॅम्बुलन्स डाव्या बाजुने काढून जखमीजवळ पोहचवण्यात आली. त्यानंतर तीन अ‍ॅम्बुलन्स मध्ये जखमींना आधी भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नागपूरला पाठविण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी येथे आणलेल्यांपैकी दोघांना मृत घोषित केले. 

बसचालक पळालाहा अपघात एवढा भीषण होता की बसची डावी बाजू कंटेनरमुळे कापत गेली. अपघातानंतर निर्माण झालेल्या गोंधळात बसचालक खाली उडी मारून पळून गेला. दुपारी २. ३० वाजेपर्यंत तो कुठे गेला, कसा आहे, त्याबाबत पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही. बसचालक दारूच्या नशेत होता का, ते देखिल स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याला झपकी आली असावी अन् त्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे.  

टॅग्स :Accidentअपघात