शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

पारंपरिक अभ्यासक्रमांमधील प्रवेश वाढणार?

By admin | Updated: June 4, 2014 01:10 IST

यंदा बारावीचा निकाल ‘छप्पर फाड के’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांंसोबतच महाविद्यालयांमध्येदेखील आनंदाचे वातावरण आहे. विशेषत: नागपूर विद्यापीठातील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमधील

नागपूर : यंदा बारावीचा निकाल ‘छप्पर फाड के’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांंसोबतच महाविद्यालयांमध्येदेखील आनंदाचे वातावरण  आहे. विशेषत: नागपूर विद्यापीठातील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांंची प्रवेशसंख्या वाढण्याची  शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर विभागाचा निकाल यंदा ८९.0७ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात चक्क १५.९७ टक्क्यांची  वाढ झाली आहे. मागील वर्षी अभियांत्रिकीसह बी.एस्सी., बी.कॉम. व बी.ए यासारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या जागा मोठय़ा  प्रमाणावर रिक्त होत्या. विशेषत: कला व वाणिज्य शाखेतील प्रवेशाचे चित्र असमाधानकारक होते. गेल्या वर्षी नागपूर विभागात जवळपास ९८ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परंतु यंदा नागपूर विभागात कला, वाणिज्य आणि  विज्ञान शाखेचे मिळून जवळपास १ लाख २६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंमध्ये विज्ञान  शाखेतील ५0,२१४ विद्यार्थी आहेत, तर कला शाखेत ५२, २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या केवळ  ३६,६१८ इतकी होती. कला शाखेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या ५२ हजार २६५ इतकी आहे. जवळपास सर्वच शाखांच्या  निकालात वाढ झालेली आहे.शिक्षणासाठी विभागाबाहेर जाणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या लक्षात घेतली तरी, महाविद्यालयांना यंदा प्रवेश वाढण्याची आशा निर्माण  झाली आहे. निकाल जाहीर होताच अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांंंनी आपल्याकडेच प्रवेश घ्यावेत, याकरिता निरनिराळे  प्रयोग करण्यात येत आहेत. बेसिक सायन्सला प्राधान्यसामान्यत: विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात अभियांत्रिकीकडे वळतात, असा अनुभव आहे. परंतु गेल्या तीन वर्षांंपासून  सातत्याने अभियांत्रिकीच्या रिक्त जागांची संख्या वाढीस लागली आहे. विद्यार्थ्यांंंमध्ये अभियांत्रिकीबद्दल फारशी क्रेझ राहिलेली  नाही. अनेक विद्यार्थी बेसिक सायन्सला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बी.एस्सी.ला यंदा चांगली मागणी राहील, अशी आशा  वर्तविण्यात येत आहे.(प्रतिनिधी)