शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

विद्यार्थी हितातूनच शैक्षणिक परिवर्तन

By admin | Updated: May 24, 2016 02:34 IST

राज्य सरकारकडून शिक्षण संस्थांना अनुदान दिले जाते. परंतु शिक्षण संस्था शिक्षकांसाठी चालविल्या जातात ...

देवेंद्र फडणवीस : भगवानदास पुरोहित सभागृहाचे उद्घाटननागपूर : राज्य सरकारकडून शिक्षण संस्थांना अनुदान दिले जाते. परंतु शिक्षण संस्था शिक्षकांसाठी चालविल्या जातात की विद्यार्थ्यांसाठी, असा प्रश्न पडतो. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे हित जपले तरच शिक्षण क्षेत्रात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. भारतीय विद्या भवनच्या सिव्हिल लाईन येथील शाळेच्या भगवानदास पुरोहित सभागृह व संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, भारतीय विद्या भवन ट्रस्टचे विश्वस्त व नागपूर केंद्राचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित यांच्यासह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते.भारतीय संस्कृती जगात सर्वात प्राचीन व श्रेष्ठ आहे. सहिष्णुतेमुळे आपल्या देशातील संस्कृती आजही जिवंत आहे. अज्ञानातून संघर्ष निर्माण होतो. ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करणे हा ज्ञानाचा भाव आहे. विश्व हे आपले कुटुंब आहे. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती जिवंत राहावी. दुसऱ्यांच्या संस्कृतीचाही सन्मान करण्यची भावना असली तर समाजात सामंजस्य निर्माण होते. स्वामी विवेकानंदांची हीच शिकवण होती. समाजाला आजही त्यांच्या विचाराची गरज असल्याचे फ डणवीस म्हणाले. भारत युवा राष्ट्र आहे. २०२० सालात भारत हा जगाचे नेतृत्व करेल. यात शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विचारानेच नाही तर हृदयानेही एकत्र आलेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचा विकास क ोणीही रोखू शकत नाही. भारतीय विद्या भवन विद्यार्जनासोबतच भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम करीत आहे. संस्थेच्या देशभरात ४०१ शाखा असून यात २ लाख २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती बनवारीलाल पुरोहित यांनी दिली. व्यासपीठावर एच.एन. दस्तूर, रूपा कुलक र्णी, सुनंदा सोनारीकर, के . एम. अग्रवाल, सी.जी. राघवन, क्यू.एच. जीवाजी, राजेंद्र पुरोहित, ए.के. मुखर्जी, राकेश पुरोहित, टी.जी.एल. अय्यर, राजेंद्र चांडक, विनय नांगिया, जिम्मी राणा, पद्मिनी जोग यांच्यासह पदाधिकारी व प्राचार्य उपस्थित होते. प्राचार्य अन्नपूर्णा शास्त्री यांनी आभार व्यक्त केले. (प्रतिनिधी)स्नेहांचल संस्थेला १० लाखांची मदतसामाजिक जाणिवेतून विद्या भवनच्या विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यातून गोळा केलेल्या १०,२८,४०० रुपयाच्या रकमेचा धनादेश देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मदत करणाऱ्या स्नेहांचल संस्थेचे जिम्मी राणा यांना सुपूर्द करण्यात आला.