शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:23 IST

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून येत होती. दिवसभर एकमेकांना ‘ते आले का’ असाच प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस मावळत गेला, अस्वस्थता वाढत गेली. अचानक रात्री ९ च्या सुमारास ‘टीव्ही’वर त्याचे दर्शन झाले. त्याचा आविर्भाव, ताठ मान, नजरेतील भेदकता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नसानसात भिनलेली राष्ट्रसेवेची भावना हे पाहिले अन् बहुतांश जणांच्या अंगावर काटा आला. रोमांचित झालेल्या स्वरांतून आपोआप शब्द बाहेर निघाले, ‘भारताचा ढाण्या वाघ परतला’. सुमारे ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून सुखरुपपणे भारतात परतलेले वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री ९.१५च्या सुमारास भारतात परतल्यानंतर नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला.

ठळक मुद्देठिकठिकाणी झाले ‘सेलिब्रेशन’ : देशाचा वाघ परत आल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून येत होती. दिवसभर एकमेकांना ‘ते आले का’ असाच प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस मावळत गेला, अस्वस्थता वाढत गेली. अचानक रात्री ९ च्या सुमारास ‘टीव्ही’वर त्याचे दर्शन झाले. त्याचा आविर्भाव, ताठ मान, नजरेतील भेदकता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नसानसात भिनलेली राष्ट्रसेवेची भावना हे पाहिले अन् बहुतांश जणांच्या अंगावर काटा आला. रोमांचित झालेल्या स्वरांतून आपोआप शब्द बाहेर निघाले, ‘भारताचा ढाण्या वाघ परतला’. सुमारे ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून सुखरुपपणे भारतात परतलेले वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री ९.१५च्या सुमारास भारतात परतल्यानंतर नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला.शहरात सकाळपासूनच अभिनंदन यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. कुठे सायंकाळीच मिठाईचे वाटप झाले तर कुठे होमहवन करण्यात आले. सायंकाळनंतर नागरिकांमधील अस्वस्थता वाढली होती. घरांघरात, विविध कट्ट्यांवर तसेच ‘सोशल मीडिया’वर अभिनंदन यांच्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र ते सुखरूपपणे परतल्यानंतर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध संघटनांनी रात्रीच्या सुमारास ढोलताशांचा गजर केला. अनेक चौकात ‘भारत माता की जय’ व ‘अभिनंदन तू है देश का गौरव’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत आल्या.‘सोशल मीडिया’वर आनंदोत्सव‘सोशल मीडिया’वरदेखील नागपूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. कल्पनाशक्ती लढवत एकाहून एक सरस ‘पोस्ट’ तयार करण्यात येत होत्या. काही उत्साही तरुणांनी तर अभिनंदन देशात परत असताना शंखनाद करुन स्वागत केले व ते ‘व्हिडीओ’ अपलोड केले.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानnagpurनागपूर