शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘अभिनंदन’च्या जिगरीला नागपूरकरांचे वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 01:23 IST

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून येत होती. दिवसभर एकमेकांना ‘ते आले का’ असाच प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस मावळत गेला, अस्वस्थता वाढत गेली. अचानक रात्री ९ च्या सुमारास ‘टीव्ही’वर त्याचे दर्शन झाले. त्याचा आविर्भाव, ताठ मान, नजरेतील भेदकता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नसानसात भिनलेली राष्ट्रसेवेची भावना हे पाहिले अन् बहुतांश जणांच्या अंगावर काटा आला. रोमांचित झालेल्या स्वरांतून आपोआप शब्द बाहेर निघाले, ‘भारताचा ढाण्या वाघ परतला’. सुमारे ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून सुखरुपपणे भारतात परतलेले वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री ९.१५च्या सुमारास भारतात परतल्यानंतर नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला.

ठळक मुद्देठिकठिकाणी झाले ‘सेलिब्रेशन’ : देशाचा वाघ परत आल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून येत होती. दिवसभर एकमेकांना ‘ते आले का’ असाच प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र जसजसा दिवस मावळत गेला, अस्वस्थता वाढत गेली. अचानक रात्री ९ च्या सुमारास ‘टीव्ही’वर त्याचे दर्शन झाले. त्याचा आविर्भाव, ताठ मान, नजरेतील भेदकता, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि नसानसात भिनलेली राष्ट्रसेवेची भावना हे पाहिले अन् बहुतांश जणांच्या अंगावर काटा आला. रोमांचित झालेल्या स्वरांतून आपोआप शब्द बाहेर निघाले, ‘भारताचा ढाण्या वाघ परतला’. सुमारे ६० तास पाकिस्तानच्या तावडीत राहून सुखरुपपणे भारतात परतलेले वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री ९.१५च्या सुमारास भारतात परतल्यानंतर नागपूरकरांनी जोरदार जल्लोष केला.शहरात सकाळपासूनच अभिनंदन यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. कुठे सायंकाळीच मिठाईचे वाटप झाले तर कुठे होमहवन करण्यात आले. सायंकाळनंतर नागरिकांमधील अस्वस्थता वाढली होती. घरांघरात, विविध कट्ट्यांवर तसेच ‘सोशल मीडिया’वर अभिनंदन यांच्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र ते सुखरूपपणे परतल्यानंतर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विविध संघटनांनी रात्रीच्या सुमारास ढोलताशांचा गजर केला. अनेक चौकात ‘भारत माता की जय’ व ‘अभिनंदन तू है देश का गौरव’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत आल्या.‘सोशल मीडिया’वर आनंदोत्सव‘सोशल मीडिया’वरदेखील नागपूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. कल्पनाशक्ती लढवत एकाहून एक सरस ‘पोस्ट’ तयार करण्यात येत होत्या. काही उत्साही तरुणांनी तर अभिनंदन देशात परत असताना शंखनाद करुन स्वागत केले व ते ‘व्हिडीओ’ अपलोड केले.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानnagpurनागपूर