शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपुरात अल्पवयीन मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:15 IST

१५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलगा तसेच त्याला घेऊन जाणारा आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय ३६, रा. न्यू बाबुळखेडा) याचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देआईची तक्रार, गुन्हा दाखल : पारडी पोलिसांकडून शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलगा तसेच त्याला घेऊन जाणारा आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय ३६, रा. न्यू बाबुळखेडा) याचा पोलीस शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरसंसार सोसायटीमध्ये दुर्गामाता मंदिराजवळ रिनाबाई तुकाराम शाहू (वय ३०) राहतात. त्यांचा १५ वर्षीय मुलगा विकास ऊर्फ पिंटू याला आरोपी चौधरी नेहमी कामाला घेऊन जायचा. १ जूनला त्याने पहाटेच्या वेळी त्यांच्या घरी येऊन पिंटूला कामावर नेतो, रात्रीपर्यंत परत घेऊन येईल, असे सांगून घरून नेले. मात्र आठ दिवस झाले तरी आरोपी चौधरी याने पिंटूला घरी आणून दिले नाही. आरोपीचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे घाबरलेल्या रिनाबाई शाहू यांनी पारडी पोलिसांकडे सोमवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी चौधरी तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या पिंटूचा पोलीस शोध घेत आहेत.विशेष म्हणजे, यापूर्वी अनेकदा आरोपीने पिंटूला कामाच्या बहाण्याने सोबत नेले आहे. मात्र नेहमी तो त्याला घरी परत आणायचा. यावेळी आठ दिवस झाले तरी त्याने पिंटूला परत आणले नाही आणि त्याचा मोबाईलही बंद आहे. आरोपी त्याच्या घरीदेखील नाही. त्यामुळे सर्वांच्या जीवाची धाकधूक वाढली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण