शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

२०२४ साठी आपचं लक्ष्य ठरलं, केजरीवालांकडून नव्या आघाडीची घोषणा, देशवासियांना केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 17:35 IST

Arvind Kejriwal News: दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर केला आहे.

नागपूर - दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. २०२४ च्या निवडणुका हे आमचं लक्ष्य नाही आहे. आमचं लक्ष्य देश आहे, भारतमाता आहे. कुणालाही हरवायचं हे आमचं लक्ष्य नाही, तर मला देशाला जिंकवायचं आहे. मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे, असे सूचक विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

आज लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते. त्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची भूमिका या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांनी आपले विचार मांडले. केजरीवाल यांनी मातृदिनाचे स्मरण करत सांगितले की, आज मातृदिवस आहे. आपली एक आई असते. ही आई आपल्याला जन्म देते. तर आपली एक अजून माता आहे. ती म्हणजे आपली भारतमाता. आज मी भाषण सुरू करताना मी तिला अभिवादन करतो. भारता माता की जय!  इन्कलाब झिंदाबाद, वंदे मातरम. यावेळी संपूर्ण सभागृह भारत माता की जय या नाऱ्याने दणाणून केले.

२०२४ च्या राजकारणातीला आम आदमी पक्षाच्या भूमिकेबाबत केजरीवाल म्हणाले, २०२४ ची निवडणूक हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही आहे. निवडणुका हे लक्ष्य नाही. तर आमचं लक्ष्य भारत आहे. भारत माता आहे. आम्ही आपलं करिअर सोडून भारतमातेसाठी आलो आहोत. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा ४९ दिवसांत मुख्यमंत्री सोडलं. जगात असं दुसरं उदाहरण नसेल. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल कुणासोबत नॅशनल अलायन्स करणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण मला ह्या १० पक्षांची आघाडी २० पक्षांची आघाडी करणार यामधील काही कळत नाही. मला कुणालाही हरवायचं नाही आहे. मला देशाला जिंकवायचं आहे. २०२४ मध्ये मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे. मी देशातील डॉक्टर, सीए, पत्रकार, शेतकरी यांची आघाडी उभी करणार आहे. अशा १३० कोटी लोकांना पुढे न्यायचं आहे, असे सांगत केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी केजरीवाल यांनी केंद्रात सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले आपल्याकडे एक मोठा पक्ष आहे. कुठेही गुंडगिरी झाली. दंगा झाला की, त्या लोकांना आपला सदस्य बनवण्यासाठी या पक्षाचे सदस्य पोहोचतात. संपूर्ण देशात गुंडगिरी करतात. बलात्काऱ्यांसाठी शोभायात्रा काढतात. माळा घालतात. अशाने देश कसा पुढे जाणार. अशाने देश पुढे जाणार नाही. तुम्हाला दंगा, गुंडगिरी पाहिजे तर भाजपासोबत जा आणि शाळा, रुग्णालये, प्रगती हवी असेल तर आमच्यासोबत या. जर भ्रष्टाचार हवा तर त्यांच्यासोबत जा आणि कट्टर इमानदारी, कट्टर इमानदारी हवी असेल, तर आमच्यासोबत या. आपण १३० कोटी लोकांची नवी आघाडी आघाडी बनवूया, अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपLokmatलोकमतPoliticsराजकारण