शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ साठी आपचं लक्ष्य ठरलं, केजरीवालांकडून नव्या आघाडीची घोषणा, देशवासियांना केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 17:35 IST

Arvind Kejriwal News: दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर केला आहे.

नागपूर - दिल्लीनंतर पंजाबमध्येही दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०२४च्या निवडणुकीसाठीचा अजेंडा जाहीर केला आहे. २०२४ च्या निवडणुका हे आमचं लक्ष्य नाही आहे. आमचं लक्ष्य देश आहे, भारतमाता आहे. कुणालाही हरवायचं हे आमचं लक्ष्य नाही, तर मला देशाला जिंकवायचं आहे. मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे, असे सूचक विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

आज लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते. त्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची भूमिका या मुद्द्यावर अरविंद केजरीवाल यांनी आपले विचार मांडले. केजरीवाल यांनी मातृदिनाचे स्मरण करत सांगितले की, आज मातृदिवस आहे. आपली एक आई असते. ही आई आपल्याला जन्म देते. तर आपली एक अजून माता आहे. ती म्हणजे आपली भारतमाता. आज मी भाषण सुरू करताना मी तिला अभिवादन करतो. भारता माता की जय!  इन्कलाब झिंदाबाद, वंदे मातरम. यावेळी संपूर्ण सभागृह भारत माता की जय या नाऱ्याने दणाणून केले.

२०२४ च्या राजकारणातीला आम आदमी पक्षाच्या भूमिकेबाबत केजरीवाल म्हणाले, २०२४ ची निवडणूक हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही आहे. निवडणुका हे लक्ष्य नाही. तर आमचं लक्ष्य भारत आहे. भारत माता आहे. आम्ही आपलं करिअर सोडून भारतमातेसाठी आलो आहोत. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा ४९ दिवसांत मुख्यमंत्री सोडलं. जगात असं दुसरं उदाहरण नसेल. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल कुणासोबत नॅशनल अलायन्स करणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण मला ह्या १० पक्षांची आघाडी २० पक्षांची आघाडी करणार यामधील काही कळत नाही. मला कुणालाही हरवायचं नाही आहे. मला देशाला जिंकवायचं आहे. २०२४ मध्ये मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे. मी देशातील डॉक्टर, सीए, पत्रकार, शेतकरी यांची आघाडी उभी करणार आहे. अशा १३० कोटी लोकांना पुढे न्यायचं आहे, असे सांगत केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी केजरीवाल यांनी केंद्रात सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली. ते म्हणाले आपल्याकडे एक मोठा पक्ष आहे. कुठेही गुंडगिरी झाली. दंगा झाला की, त्या लोकांना आपला सदस्य बनवण्यासाठी या पक्षाचे सदस्य पोहोचतात. संपूर्ण देशात गुंडगिरी करतात. बलात्काऱ्यांसाठी शोभायात्रा काढतात. माळा घालतात. अशाने देश कसा पुढे जाणार. अशाने देश पुढे जाणार नाही. तुम्हाला दंगा, गुंडगिरी पाहिजे तर भाजपासोबत जा आणि शाळा, रुग्णालये, प्रगती हवी असेल तर आमच्यासोबत या. जर भ्रष्टाचार हवा तर त्यांच्यासोबत जा आणि कट्टर इमानदारी, कट्टर इमानदारी हवी असेल, तर आमच्यासोबत या. आपण १३० कोटी लोकांची नवी आघाडी आघाडी बनवूया, अशी भूमिका केजरीवाल यांनी मांडली. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपLokmatलोकमतPoliticsराजकारण