शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या आर्यनला पाळण्याचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 02:45 IST

आर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता.

मंगर कुटुंबीयांवर शोककळा : सोमलवाडा परिसरात घडली घटनानिशांत वानखेडे  नागपूरआर्यन आता एक वर्षाचा झाला होता. नुकताच ९ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवसही झाला. बोबडे शब्द बोलत घरात खेळणारा, बागळणारा तान्हा आर्यन सर्वांना हवाहवासा झाला होता. वडील त्याच्या भविष्यासाठी मेहनत घेत होते. पतीसोबत घराला आर्थिक आधार मिळावा म्हणून आर्यनची आईही घरकाम करायला जात होती. त्याही दिवशी ती नेहमीप्रमाणे अंगाईगीत गाऊन आर्यनला पाळण्यात झोपवून कामाला गेली, मात्र ज्या पाळण्यात टाकताच रडणारे बाळ शांत होते तोच पाळणा आपल्या बाळाला कायमचा शांत करेल हे त्या माऊलीला कुठे माहीत होते. परतली तेव्हा तिचे काळीजच फाटले होते. नियतीने याच पाळण्याला बांधलेला दुपट्टा फास बनवून चिमुकल्या आर्यनचे प्राण हरले.हृदयाला चटका लावणारी ही घटना सोमलवाड्याच्या राहुलनगर परिसरात घडली. आर्यन गोपाल मंगर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव. काळाने येथील मंगर कुटुंबीयावर मोठा घाव घातला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यनचे वडील गोपाल विठ्ठल मंगर एका कंपनीत मार्केटिंगच्या कामाला आहेत. लग्नाला सहा वर्षे झाली व संसाराला दोन फुलेही आली. मोठा अनिकेत व लहान आर्यन. त्यांच्या घरीच गोपालची बहीण आणि जिजा सोबत राहतात. तेही दररोज कामाला जातात. गोपालच्या कमाईसह मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक आधार मिळावा म्हणून गोपालची पत्नी सीमा आसपासच्या परिसरात घरकाम करायला जाते. बाळाला पाळण्यात झोपवायचे आणि कामाला जायचे, असा तिचा नित्यक्रम. शुक्रवारीही रोजच्या प्रमाणे सर्व कामावर निघून गेले होते. सीमानेही आर्यनला पाळण्यात झोपविले. सवयीप्रमाणे बाळ पाळण्यातून पडू नये म्हणून कमरेजवळ तिने दुपट्टा बांधला. मात्र हाच दुपट्टा आर्यनसाठी काळ ठरला. अचानक आर्यनला जाग आली आणि तो पाळण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडू लागला. निष्काळजीपणा की कुटुंबाची गरज?नागपूर : मात्र आर्यनचा हंबरडा ऐकायला तिथे कुणीही नव्हते. या प्रयत्नात पाळणा उलटा झाला आणि कमरेभोवतीचा सैल झालेला दुपट्टा गळ्यापर्यंत सरकला आणि त्यानेच फास लागला. घटना दुपारी १२ ते १२.३० वाजता घडल्याचे गोपाल यांनी सांगितले. १ वाजताच्या दरम्यान आर्यनची आत्या कामे आटोपून घरी पोहचली तेव्हा तिनेही हंबरडा फोडला. मात्र स्वत:ला सावरत तिने भाऊ गोपालला फोन केला आणि तातडीने आर्यनला जवळच्या रुग्णालयातही नेले. मात्र आर्यन कायमचा हरवला होता. आर्यन आता सोडून गेला. मात्र यात चूक कुणाची हा प्रश्न निर्माण होतो. पाळण्याला दुपट्टा बांधून आणि त्याहीपेक्षा बाळाला एकटे सोडून जायला नको होते. या निष्काळजीपणातूनच आर्यनचा मृत्यू झाला, असे चर्चिले जात आहे. मात्र हा त्या माऊलीचा निष्काळजीपणा की, कुटुंबाची गरज भागविण्याची धडपड हा प्रश्न आहे. कारण सायंकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी ती कामावर निघून गेली. घरी गेल्यावर तान्हुल्या आर्यनला चिऊचा घास देऊ, असे तिचे स्वप्नरंजन होते. मात्र नियतीला वेगळेच मंजूर होते.-आर्यनची आई सीमा निपचित पडली होती. बोलायची इच्छा नसतानाही वडील गोपाल यांनी घडलेली हकीकत सांगितली. मात्र हे सांगताना बापाच्या डोळ्यांच्या कडांचा ओलावा थांबत नव्हता. (प्रतिनिधी)